शहरं
Join us  
Trending Stories
1
लईराई जत्रोत्सवात चेंगराचेंगरी, CM प्रमोद सावंतांची प्रतिक्रिया; म्हणाले, “५० हजार लोक...”
2
Charanjit Singh Channi : "सर्जिकल स्ट्राईक कुठेही दिसला नाही, जर बॉम्ब पडला तर…"; काँग्रेस नेत्याने मागितले पुरावे
3
लईराई देवी यात्रा चेंगराचेंगरी: यात्रेला आले अन् काकू-पुतण्याने गमावला जीव, मृतांची नावे आली समोर
4
Pune Crime: 'कोयता काढला अन्...'; पुण्यातील बिबवेवाडीत भररस्त्यात थरकाप उडवणारी घटना, व्हिडीओ व्हायरल
5
IPO आणण्याची तयारी करतेय कंपनी; बुमराह, रोहित शर्मा, आमिर खान यांनीही केली गुंतवणूक; जाणून घ्या 
6
लईराई देवीच्या जत्रोत्सवात चेंगराचेंगरी; ६ भाविकांचा मृत्यू, ४० जण जखमी, उत्सवाला गालबोट
7
अक्षय्य तृतीयेला येणार होते, पण अजून ‘लाडकी बहीण’चे पैसे आले नाहीत; नेमका का होतोय उशीर?
8
"हेच कारण आहे पहलगाममध्ये जे झालं ते..," असं काय म्हणाला सोनू निगम; दाखल झाला FIR
9
५०० वर्षांनी गुरु अतिचारी गोचर: ६ राशींना लाभ, गुरु करेल मालामाल; अच्छे दिन येणार, शुभ घडणार!
10
मस्क यांच्या स्टारलिंक कंपनीचं पाकिस्तान-बांगलादेश कनेक्शन; भारतानं मागवली कामकाजाची माहिती, प्रकरण काय?
11
दहशतवाद्यांना पोसल्याचा पाकला त्रास; माझ्या आईला त्यांनीच गोळ्या घातल्या
12
पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या यु ट्यूब चॅनलवर भारतात बंदी, मंत्र्याचे X अकाऊंटही ब्लॉक
13
Home Loan: १५ लाखही वाचतील आणि ६० महिने आधीच होम लोनचं टेन्शन संपेल, कसं? जाणून घ्या
14
पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड पाकच; लष्कर, आयएसआय व आर्मीने रचला कट; एनआयएच्या अहवालात दावा
15
भारतीय सैन्यदलामध्ये व्यापक फेरबदल; पाकिस्तानला धडकी
16
Today Horoscope: आजचे राशीभविष्य, ३ मे २०२५: धनलाभ होऊन उत्पन्नात होईल वाढ
17
पाकला उत्तर देण्यासाठी गंगा एक्स्प्रेस-वेवरून झेपावतील लढाऊ विमाने; लँडिंग ड्रिल यशस्वी : देशाच्या संरक्षण तयारीत ऐतिहासिक टप्पा
18
विझिनजम बंदरामुळे आर्थिक प्रगती; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले उद्घाटन
19
चोंडीत ६०० व्हीव्हीआयपी, दोन हजार पाहुण्यांचा खास पाहुणचार; ६ मे रोजी मंत्रिमंडळाची पहिल्यांदा हाेणार बैठक
20
भारताविरुद्ध पाकिस्तानचे सायबर युद्ध, आठवडाभरात १० लाख हल्ले

ठाणे जिल्ह्यात होणार दोन लाख मूर्तींची प्राणप्रतिष्ठा

By admin | Updated: September 16, 2015 23:50 IST

महाराष्ट्राचे आराध्यदैवत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गणरायाचे गुरु वारी आगमन होत आहे. या वर्षी ठाणे जिल्ह्यातील शहरी आणि ग्रामीण भागात सुमारे दोन लाख गणेशमूर्तींची

- पंकज रोडेकर, ठाणेमहाराष्ट्राचे आराध्यदैवत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गणरायाचे गुरु वारी आगमन होत आहे. या वर्षी ठाणे जिल्ह्यातील शहरी आणि ग्रामीण भागात सुमारे दोन लाख गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. यात शहर पोलीस आयुक्तालयात सुमारे १ लाख ६९ हजार ४७२ तर ग्रामीण भागातील २४ हजार ४३२ बाप्पांचा समावेश आहे.या वर्षी शहरी भागात घरगुती गणेशाची संख्या ४१ हजार ३८४, सार्वजनिक ४८ ने वाढली आहे. तर, ग्रामीणमध्ये ३१ सार्वजनिक बाप्पांमध्ये वाढ झाली आहे. दरम्यान, गणेशमूर्तींची संख्या वाढली असली तरी न्यायालयीन तिढ्यामध्ये मंडपांचा आकार अडकल्यामुळे अनेक सार्वजनिक मंडळांचे मंडप अद्यापही अपूर्णावस्थेत असल्याचे दिसून येत आहे. बाप्पांच्या स्वागतासाठी गणेशभक्त सज्ज झाले असून गेल्या काही दिवसांपासून सार्वजनिक मंडळांच्या भव्यदिव्य गणेशमूर्ती जल्लोषात आणल्या जात आहेत. भिवंडीमध्ये १३९ सार्वजनिक गणपतीभिवंडीमध्ये १३९ सार्वजनिक, ९५१० घरगुती, ४४० गौरी; कल्याणमध्ये २९९ सार्वजनिक, ४२ हजार २५० घरगुती, २ हजार ५५० गौरी; उल्हासनगर-अंबरनाथमध्ये ३०८ सार्वजनिक, ४५ हजार ७० घरगुती, ५ हजार ५७५ गौरी आणि वागळे परिमंडळामध्ये २१६ सार्वजनिक, २४ हजार ७५७ घरगुती व एक ५३८ गौरींची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. मागील वर्षीच्या तुलनेत गणेशमूर्ती तसेच शहरी भागात यंदा गौरार्इंची संख्या ७६८ ने वाढली आहे. ठाणे जिल्ह्याचे विभाजन झाल्याने ठाणे ग्रामीण पोलीस अधीक्षकाच्या हद्दीत यंदा सार्वजनिक ९६८ आणि घरगुती २३ हजार ४८४ बाप्पांचे आगमन होणार आहे. तसेच तीन हजार १८६ गौराई माहेरी येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.११ हजार ७७६ घरांमध्ये गौरी - मागील वर्षी ठाणे पोलीस आयुक्तालयामध्ये १ लाख २८ हजार ८८ घरगुती तर १ हजार ५३ सार्वजनिक गणेशमूर्तींची स्थापना झाली होती. तसेच गेल्या वर्षी ११ हजार ८ गौराई माहेरवासाला आल्या होत्या. - या वर्षी त्यामध्ये वाढ झाली आहे. यंदा ११ हजार ७७६ घरांमध्ये गौरी माहेरवासाला येणार आहेत. त्यामध्ये ठाणे शहरातील १४४ सार्वजनिक, १६ हजार ७७९ घरगुती आणि १६७३ गौरींचा समावेश आहे. नऊ हजार पोलिसांसह आठ कंपन्यासध्याची दहशतवादी पार्श्वभूमी लक्षात घेऊन ठाणे शहर पोलीस आयुक्तालय हद्दीत ९ हजार पोलीस आणि होमगार्ड यांची फौज तैनात केली आहे. यामध्ये राज्य राखीव दल, सीमा सुरक्षा दल अशा ८ कंपन्या ठाण्यात दाखल झाल्या आहेत. यंदा त्या-त्या पोलीस ठाण्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत स्थानिक मंडळ कार्यकर्त्यांना विशेष प्रशिक्षण दिले आहे. विशेष म्हणजे सोशल मीडियावरील (फेसबुक किंवा व्हॉट्सअ‍ॅप) भावना भडकवणाऱ्या मेसेजला बळी पडू नये, असे मेसेज आल्यास पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन करून असे मेसेज पाठवणाऱ्याचा शोध घेण्यात येणार असल्याची माहिती ठाणे शहर सहपोलीस आयुक्त व्ही.व्ही. लक्ष्मीनारायण यांनी दिली.