शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

ठाणे जिल्ह्यात होणार दोन लाख मूर्तींची प्राणप्रतिष्ठा

By admin | Updated: September 16, 2015 23:50 IST

महाराष्ट्राचे आराध्यदैवत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गणरायाचे गुरु वारी आगमन होत आहे. या वर्षी ठाणे जिल्ह्यातील शहरी आणि ग्रामीण भागात सुमारे दोन लाख गणेशमूर्तींची

- पंकज रोडेकर, ठाणेमहाराष्ट्राचे आराध्यदैवत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गणरायाचे गुरु वारी आगमन होत आहे. या वर्षी ठाणे जिल्ह्यातील शहरी आणि ग्रामीण भागात सुमारे दोन लाख गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. यात शहर पोलीस आयुक्तालयात सुमारे १ लाख ६९ हजार ४७२ तर ग्रामीण भागातील २४ हजार ४३२ बाप्पांचा समावेश आहे.या वर्षी शहरी भागात घरगुती गणेशाची संख्या ४१ हजार ३८४, सार्वजनिक ४८ ने वाढली आहे. तर, ग्रामीणमध्ये ३१ सार्वजनिक बाप्पांमध्ये वाढ झाली आहे. दरम्यान, गणेशमूर्तींची संख्या वाढली असली तरी न्यायालयीन तिढ्यामध्ये मंडपांचा आकार अडकल्यामुळे अनेक सार्वजनिक मंडळांचे मंडप अद्यापही अपूर्णावस्थेत असल्याचे दिसून येत आहे. बाप्पांच्या स्वागतासाठी गणेशभक्त सज्ज झाले असून गेल्या काही दिवसांपासून सार्वजनिक मंडळांच्या भव्यदिव्य गणेशमूर्ती जल्लोषात आणल्या जात आहेत. भिवंडीमध्ये १३९ सार्वजनिक गणपतीभिवंडीमध्ये १३९ सार्वजनिक, ९५१० घरगुती, ४४० गौरी; कल्याणमध्ये २९९ सार्वजनिक, ४२ हजार २५० घरगुती, २ हजार ५५० गौरी; उल्हासनगर-अंबरनाथमध्ये ३०८ सार्वजनिक, ४५ हजार ७० घरगुती, ५ हजार ५७५ गौरी आणि वागळे परिमंडळामध्ये २१६ सार्वजनिक, २४ हजार ७५७ घरगुती व एक ५३८ गौरींची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. मागील वर्षीच्या तुलनेत गणेशमूर्ती तसेच शहरी भागात यंदा गौरार्इंची संख्या ७६८ ने वाढली आहे. ठाणे जिल्ह्याचे विभाजन झाल्याने ठाणे ग्रामीण पोलीस अधीक्षकाच्या हद्दीत यंदा सार्वजनिक ९६८ आणि घरगुती २३ हजार ४८४ बाप्पांचे आगमन होणार आहे. तसेच तीन हजार १८६ गौराई माहेरी येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.११ हजार ७७६ घरांमध्ये गौरी - मागील वर्षी ठाणे पोलीस आयुक्तालयामध्ये १ लाख २८ हजार ८८ घरगुती तर १ हजार ५३ सार्वजनिक गणेशमूर्तींची स्थापना झाली होती. तसेच गेल्या वर्षी ११ हजार ८ गौराई माहेरवासाला आल्या होत्या. - या वर्षी त्यामध्ये वाढ झाली आहे. यंदा ११ हजार ७७६ घरांमध्ये गौरी माहेरवासाला येणार आहेत. त्यामध्ये ठाणे शहरातील १४४ सार्वजनिक, १६ हजार ७७९ घरगुती आणि १६७३ गौरींचा समावेश आहे. नऊ हजार पोलिसांसह आठ कंपन्यासध्याची दहशतवादी पार्श्वभूमी लक्षात घेऊन ठाणे शहर पोलीस आयुक्तालय हद्दीत ९ हजार पोलीस आणि होमगार्ड यांची फौज तैनात केली आहे. यामध्ये राज्य राखीव दल, सीमा सुरक्षा दल अशा ८ कंपन्या ठाण्यात दाखल झाल्या आहेत. यंदा त्या-त्या पोलीस ठाण्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत स्थानिक मंडळ कार्यकर्त्यांना विशेष प्रशिक्षण दिले आहे. विशेष म्हणजे सोशल मीडियावरील (फेसबुक किंवा व्हॉट्सअ‍ॅप) भावना भडकवणाऱ्या मेसेजला बळी पडू नये, असे मेसेज आल्यास पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन करून असे मेसेज पाठवणाऱ्याचा शोध घेण्यात येणार असल्याची माहिती ठाणे शहर सहपोलीस आयुक्त व्ही.व्ही. लक्ष्मीनारायण यांनी दिली.