शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
आजचे राशीभविष्य- १६ सप्टेंबर २०२५: मित्रांचा सहवास लाभेल, पण घरातील वातावरण बिघडण्याची शक्यता
3
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
4
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
5
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
6
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
7
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
8
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
9
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
10
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
11
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
12
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
13
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
14
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
15
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
16
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
17
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
18
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
19
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
20
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र

ठाणे जिल्ह्यातील जि.प.च्या २६७ शाळांचे होणार स्थलांतर ; ४४ शाळा कायमच्या बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2017 18:51 IST

ठाणे जिल्ह्यात सुमारे ४४ शाळा बंद करण्याचे निश्चित झाले असून उर्वरित सुमारे २६७ शाळां व त्यातील विद्यार्थ्यांचे जवळच्याच शाळांमध्ये स्थलांतर करण्याचा मार्ग काढण्यात आला आहे.

ठळक मुद्देशाळा बंदचे संकट तुर्तास टळले असले तरी स्थलांतर म्हणजेच संबंधीत गावातील शाळा गावक-यांसाठी बंद होणारराजकीय पक्षांच्या प्रचाराकाना या शाळांच्या मुद्यावर गावक-यांकडून जाब विचारला जाणार

ठाणे : जिल्ह्यात वीसपेक्षा कमी विद्यार्थी संख्येच्या ३११ प्राथमिक शाळा ठाणे जिल्हा परिषदेच्या (जि.प.) आहेत. यातील केवळ ४४ शाळा कायमच्या बंद होणार आहेत. तर उर्वरित २६७ शाळांचे जवळच्या शाळांमध्ये स्थलांतर करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र शाळा बंद व काहींचे स्थलांतर करण्याच्या मुद्यावरून गावकऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. जि.प. व पंचायत समित्यांच्या (पं.स.) निवडणूक प्रचारा दरम्यान गावकऱ्यांकडून जाब विचारला जाणार आहे.जि.प. व पं. स.च्या निवडणुकीसाठी जिल्ह्यात प्रचार रंगात येत आहे. कमी पटसंख्येच्या शाळा बंद करण्याच्या हालचाली राज्यात प्रथमच ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ तालुक्यातून सुरू झाल्या. या विषयी ‘ जिल्ह्यातील शेकडो विद्यार्थी वाऱ्यांवर’ या मथळ्याखाली लोकमतने १९ नोव्हेंबर रोजी वृत्त प्रसिध्द  करून  हा विषय उघडकीस केला आहे. त्याची वेळीच दखल घेत शिक्षण विभागाने दहापेक्षा कमी विद्यार्थी संख्येच्या शाळांचे सर्वेक्षण केले. त्यात ठाणे जिल्ह्यात सुमारे ४४ शाळा बंद करण्याचे निश्चित झाले असून उर्वरित सुमारे २६७ शाळां व त्यातील विद्यार्थ्यांचे जवळच्याच शाळांमध्ये स्थलांतर करण्याचा मार्ग काढण्यात आला आहे.जिल्ह्यातील शहापूरच्या १०९ शाळांसह भिवंडीच्या ५१ शाळा, कल्याणच्या १६, मुरबाडच्या १२० आणि अंबरनाथच्या १७ शाळांची पटसंख्या २० पेक्षा कमी आहेत. यातील दहा पेक्षा कमी पटसंख्येच्या ४४ शाळांचा शोध घेऊन त्या बंद होणार आहे. तर २६७ शाळांचे अन्यत्र स्थलांतरण होणार आहे. या शाळा बंदचे संकट तुर्तास टळले असले तरी स्थलांतर म्हणजेच संबंधीत गावातील शाळा गावक-यांसाठी बंद होणार असल्याची चर्चा जिल्ह्यात आहे. यामुळे राजकीय पक्षांच्या प्रचाराकाना या शाळांच्या मुद्यावर गावक-यांकडून जाब विचारला जाणार आहे. यासाठी जिल्ह्यातील काही सामाजिक संघटनांच्या नेतृत्वाखाली गावकरी एकत्र येऊन उमेदवारांना वेठीस धरणार आहेत.

टॅग्स :thaneठाणेcollectorतहसीलदार