शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा राबविणार रूरबन अभियान, पिंपरीसह १४ गावांचे रूप पालटणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2019 21:01 IST

कल्याण तालुक्यातील पिंपरीसह १४ गावांचे रूप येत्या ३ वर्षात पूर्णपणे बदलून टाकणाऱ्या रूरबन अभियानाचे सादरीकरण आज जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा आणि सिडकोने केले.

ठाणे  - कल्याण तालुक्यातील पिंपरीसह १४ गावांचे रूप येत्या ३ वर्षात पूर्णपणे बदलून टाकणाऱ्या रूरबन अभियानाचे सादरीकरण आज जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा आणि सिडकोने केले. या अभियानामुळे पिंपरीसह इतर ४ ग्रामपंचायतीच्या हद्दीतील मिळून १४ गावांमध्ये आर्थिक विकासाचे विविध उपक्रम, तसेच पायाभूत सुविधा आणि डिजिटल साक्षरता कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर राबविण्यात येणार आहेत. यासाठी सुमारे ६० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. या गावांमध्ये परिवर्तन आणणारी ही योजना कालबध्द रीतीने पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी यंत्रणांना दिले. प्रारंभी प्रकल्प संचालक रुपाली सातपुते यांनी या अभियानाची माहिती सादरीकरणातून दिली.

रूरबन अभियान काय आहे?

ग्रामीण भागातील गावांच्या समुहाचा आर्थिक, भौतिक, सामाजिक विकास करणे आणि याठिकाणी शहरांप्रमाणे पायाभूत सुविधा उपलब्ध करून देणे, कृषी व कृषीशी संलग्न उपक्रम, व्यवसाय सुरु करणे आणि सर्वात महत्वाचे म्हणजे कौशल्य विकासावर आधारित विविध क्षेत्रात प्रशिक्षण देऊन स्थानिक तरुणांना रोजगार उपलब्ध करून देणे हा या केंद्र सरकारच्या अभियानाचा उद्देश आहे. आदिवासी आणि बिगर आदिवासी अशा दोन्ही क्षेत्रांसाठी गावांचा समूह निवडून याठिकाणी हे अभियान राबविण्यात येते. यासाठी नेमण्यात आलेल्या शिखर समितीचे अध्यक्ष पालकमंत्री असून नियामक समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी आहेत. याशिवाय इतर समित्या देखील आहेत.

यासाठी लागणारा निधी राज्य व केंद्र शासनाच्या विविध योजनांतून खर्च केला जाईल आणि अतिरिक्त निधी क्रिटीकल गॅप फंडिंग मधून दिला जाईल अशी माहिती रुपाली सातपुते यांनी याप्रसंगी दिली.

पिंपरीचा कायापालट

या अभियानात कल्याण तालुका आणि जिल्हा परिषदेच्या खोणी गटातील पिंपरी या आदिवासी गाव समूहाची निवड करण्यात आली. या १४ गावांमध्ये लोकांचे सर्वाधिक स्थलांतर आहे तसेच मुंबई व ठाणे लगतची ही गावे आहेत. याठिकाणी १५ हजार ६२३ लोकसंख्या असून स्त्री-पुरुष प्रमाण चांगले म्हणजे १०२१ इतके आहे. याठिकाणी साक्षरतेचे प्रमाणही ६४ टक्के आहे. या ग्रुप ग्रामपंचायतीत पिंपरी, दहिसर, नागाव, वाकळण, नारिवली या ग्रामपंचायती येतात.

असा होणार विकास ?

याठिकाणी प्रामुख्याने १०० पेक्षा जास्त बचत गट असून त्यांना तसेच तेथील स्थानिक युवकांना रोजगाराच्या दृष्टीने कौशल्य विकास प्रशिक्षण दिले जाईल. ही गावे महामार्गालगत आहेत तसेच हॉटेल्स व इतर व्यवसाय जवळ असल्याने विविध समारंभ कायम होत असतात. याठिकाणी मोठ्या प्रमाणावर तांदळाच्या भाकऱ्या तयार करून देणारे महिलांचे गट आहेत. या भाकऱ्या आजूबाजूच्या हॉटेल्स, धाबे, लग्न समारंभ आदि कारणांसाठी पुरविण्यात येतात. त्यातून त्यांचे अर्थार्जन होते. या महिलांना यादृष्टीने कायमस्वरूपी अशी खाद्य उत्पादने तयार करण्यासाठी केंद्रे स्थापन करता येतील का याचे नियोजन करण्यात येईल. याशिवाय शेतकऱ्यांच्या गटांच्या मदतीने कृषी प्रक्रिया, कुक्कुटपालन, पॉलिमर हाऊस, शीतगृहे उभारणी करण्यात येईल, याशिवाय नळाद्वारे पाणी पुरवठा, स्वच्छता, रस्ते, रस्त्यावरील दिवे, आरोग्य सुविधा, सार्वजनिक वाहतूक, घन आणि कचरा व्यवस्थापन, नागरिक सेवा केंद्रे या सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील. डिजिटल साक्षरता वाढण्यासाठी उपक्रम याठिकाणी राबविण्यात येतील.  

ग्रामीण आणि शहरी भागातील विकासाचा असमतोल दूर करणे असा या अभियानाचा मुख्य उद्देश असून ग्रामीण भागातील गुंतवणूक देखील वाढविण्यात येईल असे यावेळी जिल्हा नियोजन अधिकारी अमोल खंडारे यांनी सांगितले. सिडकोचे उप नगररचनाकार अमोल पंडित यांनीही याप्रसंगी सादरीकरण केले. बैठकीस कृषी विकास अधिकारी डॉ. प्रफुल्ल बनसोडे, कृषी अधिकारी सावंत, सहायक संचालक, कौशल्य विकास श्रीमती जावळे, ग्रामसेवक, सरपंच, आदींची उपस्थिती होती.

टॅग्स :thaneठाणे