शहरं
Join us  
Trending Stories
1
युपीतील निवडणुकीत भाजपा ५ व्या क्रमांकावर, अपक्षांनाही जास्त मते; सपाचा दणदणीत विजय
2
“सरन्यायाधीश भूषण गवई यांना हात जोडून विनंती आहे की...”; उद्धव ठाकरेंचे साकडे, प्रकरण काय?
3
ICICI बँकेचा यु-टर्न; अकाऊंटमध्ये ५० हजार रुपये नाही तर 'इतकी' रक्कम ठेवावी लागणार
4
इन्फोसिसचा ऑस्ट्रेलियात मोठा व्यवहार! १३०० कोटी रुपयांमध्ये खरेदी केली 'ही' कंपनी
5
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये भारताची मिसाईल ताकद पाहून घाबरला पाकिस्तान; आता उचललं 'हे' मोठं पाऊल!
6
७९ वर्षांत असे दोन पंतप्रधान होऊन गेले, ज्यांच्या भाग्यात लाल किल्ल्यावरील स्वातंत्र्य दिन आलाच नाही...
7
नवाब मलिकांवर मोठी जबाबदारी; मुंबई महापालिका निवडणुकीबाबत अजित पवारांचा महत्त्वाचा निर्णय
8
Viral Video : काय म्हणावं यांना! लाबुबू डॉलची पूजा करू लागली महिला, म्हणाली "ही बाहुली नाही, तर..."
9
Stock Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात; Nifty २४,६०० च्या वर, IT-फार्मा शेअर्समध्ये मोठी खरेदी
10
राष्ट्रवादीमध्ये नव्या 'दादां'चा उदय! रोहित पवार अजितदादांची पोकळी भरून काढत आहेत का?
11
'फुले' सिनेमाच्या अपयशावर प्रतीक गांधीने पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया; म्हणाला, "जितकी अपेक्षा..."
12
पाकिस्तानचं स्वातंत्र्यदिनी हे कसलं सेलिब्रेशन... हवेत गोळीबार, तिघांचा मृत्यू, ६० जखमी
13
मतदार यादी कायमसाठी एकसारखीच राहू शकत नाही, पुनरीक्षण आवश्यक; सर्वोच्च न्यायालयाचे निरीक्षण
14
शिल्पा शिरोडकरच्या कारला बसची धडक, अभिनेत्रीने केली तक्रार; तर बस मालकांनी केली अरेरावी
15
आजचे राशीभविष्य : गुरुवार १४ ऑगस्ट २०२५; या ४ राशीच्या लोकांना अचानक धनलाभ संभवतो, काहींना मित्रांकडूनही लाभ होतील
16
लंडनच्या भूमीत १८ ऑगस्टला होणार ऐतिहासिक 'लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन'
17
मंत्रालयामधील मोकळ्या जागेवर मंत्र्यांचेच अतिक्रमण; सामान्यांना बसण्यासाठीच्या जागा व्यापल्या
18
फडणवीस, शिंदे, ठाकरे आज एका व्यासपीठावर..?; बीडीडीवासीयांचे पाऊल आज नव्या घरात
19
वसई-विरारचे माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांना अटक; ४१ अवैध इमारती भोवल्या, ईडीची कारवाई
20
मुनीर यांचा बाष्कळ थयथयाट, भारताविषयी वक्तव्ये करण्याआधी 'आका'ची परवानगी घेतली का?

ठाणे जिल्ह्यात स्वातंत्र्य दिन उत्साहात

By admin | Updated: August 15, 2015 23:22 IST

भारताच्या ६९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त जिल्ह्यातील प्रत्येक शासकीय कार्यालयात सूर्योदयापूर्वीच ध्वजारोहण सोहळा संपन्न झाला. या वेळी जिल्ह्यात सारे जहाँ से अच्छा, ए मेरे वतन के लोगो...

ठाणे : भारताच्या ६९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त जिल्ह्यातील प्रत्येक शासकीय कार्यालयात सूर्योदयापूर्वीच ध्वजारोहण सोहळा संपन्न झाला. या वेळी जिल्ह्यात सारे जहाँ से अच्छा, ए मेरे वतन के लोगो... या देशभक्तीपर गीतांचे सूर निनादत होते. प्रत्येक जण एकमेकांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा देत होते. ठाणे शहरातील काही तरुणांनीही राष्ट्रध्वज हातात घेऊन मोटारसायकलवरून रॅली काढण्यात आली होती. छोट्या मुलांनीही स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या नेत्यांची तसेच भारतीय जवानांची वेशभूषा करून देशावरचे प्रेम व्यक्त केले.ठाणे जिल्हाधिकारी कार्यलयात ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण समारंभ पार पडला. या वेळी शासनाने दुष्काळाचा फटका बसलेल्या १४ जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेत सामावून घेण्याचा निर्णय झाला असून वैद्यकीय सेवा पुरवण्याचा निर्णयही शासनाने घेतला असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच नव्याने एक लाख विहिरी आणि ५० हजार शेततळी निर्माण करण्याचा कार्यक्रमही आजपासून सुरू झाल्याचे त्यांनी जाहीर केले.जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात एक इको टुरिझम स्पॉट विकसित करण्याच्या सूचना वन विभागाला दिल्याचे त्यांनी नमूद केले. या वेळी खासदार श्रीकांत शिंदे, राजन विचारे, आमदार सुभाष भोईर, प्रताप सरनाईक, संजय केळकर, महापौर संजय मोरे, जिल्हाधिकारी अश्विनी जोशी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी उदय चौधरी, ठाणे महापालिका आयुक्त संजय जैस्वाल, पोलीस आयुक्त परमवीर सिंह उपस्थित होते. अधिक वृत्त/४