शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

ठाणे जिल्ह्यालादेखील कुपोषणाचा विळखा

By admin | Updated: November 14, 2016 04:19 IST

नागरी, सागरी आणि डोंगरी या भूप्रदेशांत विभागलेल्या ठाणे जिल्ह्यात १५ लाख १६ हजार २९५ बालके ४ हजार ४५३ प्राथमिक, माध्यमिक आणि कनिष्ठ

सुरेश लोखंडे / ठाणेनागरी, सागरी आणि डोंगरी या भूप्रदेशांत विभागलेल्या ठाणे जिल्ह्यात १५ लाख १६ हजार २९५ बालके ४ हजार ४५३ प्राथमिक, माध्यमिक आणि कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये बागडत असून त्यात ८ हजार १९२ बालके शाळाबाह्य आहेत. ११ हजार मुले कुपोषण पीडित असून ८९३ बालके तीव्र कुपोषणामुळे जीव मुठीत घेऊन जगत असल्याचे उघड झाले आहे. भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू अर्थात मुलांचे चाचा नेहरू यांच्या जन्मदिनानिमित्त ‘बालदिन’ साजरा होत असताना जिल्ह्यातील बालकांची ही अवस्था समोर आली आहे.जिल्ह्यात ५२ कनिष्ठ महाविद्यालयांसह प्राथमिक व उच्च माध्यमिक, माध्यमिक असलेल्या एकूण १३०७ इंग्रजी माध्यमाच्या शाळा आहेत. या शाळांत सोयीसुविधा उत्तम आहेत. मराठी माध्यमाच्या दोन हजार ५२४ शाळांपैकी उच्च माध्यमिक १४ शाळा, प्राथमिक एक हजार १९६, माध्यमिक २८६, प्राथमिकसह माध्यमिक ८३० शाळा जिल्ह्यात आहेत. यातील अनेक शाळांतील मुले सोयीसुविधेपासून वंचितच राहिले आहेत. पाचवीपर्यंतच्या प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी १०० गॅ्रम सकस व पोषण आहार देण्यासाठी प्रतिविद्यार्थी तीन रुपये ८६ पैसे, तर सहावी व आठवीच्या विद्यार्थ्यांना १५० ग्रॅमच्या आहारासाठी पाच रुपये ७८ पैसेयाप्रमाणे प्रत्येक दिवसाकरिता शासन अनुदान दिले जात आहे. दोन हजार ७४५ प्राथमिक व माध्यमिक शाळांतील पाच लाख २९ हजार १८२ विद्यार्थ्यांना हा पोषण आहार दिला जातो. तरीही, बालके कुपोषणाने पीडित असल्याचे वास्तव नजरेआड करता येत नाही.

11,000बालकांना कुपोषणाची पिडा-ग्रामीण, आदिवासी, दुर्गमभागात एक लाख १८ हजार ६५६ बालके आहेत. यातील सहा वर्षेवयोगटाचे एक लाख पाच हजार ८५४ बालके सर्वसाधारण श्रेणीचे आहेत. तर, ११ हजार बालके कुपोषणाने पीडित आहेत. यामध्ये ८९३ बालके तीव्र कुपोषणाने जर्जर झाले आहेत. त्यांना सशक्त करण्यासाठी ‘व्हीसीडीसी’ केंद्राद्वारे सतत पोषण आहार देणे गरजेचे आहे.

वर्षभरात ८१९३ शाळाबाह्य बालकांचा शोध -‘शिक्षणाचा हक्क’ मिळवून देण्याच्या नावाखाली केवळ सर्वेक्षण करून मुलांच्या संख्यांनी केवळ रकाने भरले जात आहेत. या वर्षभरात आठ हजार १९३ शाळाबाह्य मुलांचा शोध घेतल्याचा दावा प्रशासनाने केला आहे. यापैकी महापालिकांकडून दोन हजार ३८८ मुलांना शाळेत दाखल केल्याचे सांगितले जात आहे. तर, जिल्हा परिषदेकडून एक हजार २०४ मुलांना शाळेत घेतल्याचा दावा केला आहे; पण चौकशीअंती बहुतांश ठिकाणी या मुलांची नोंद आढळून येत नाही. सहा महापालिकांमध्ये सहा हजार ७७५ मुले शाळाबाह्य आहेत. यामध्ये तीन हजार ७२० मुलांसह तीन हजार ५५ मुलींचा समावेश आहे. गावखेड्यांत एक हजार ४१८ बालके शाळाबाह्य आहेत. यात ७०१ मुलींचा समावेश आहे.