शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
2
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
3
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
4
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
5
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
6
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
7
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
8
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
9
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
10
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
11
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
12
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
14
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
15
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
16
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
17
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!
18
सणासुदीच्या तोंडावर सोन्या-चांदीचे दर घसरले! तुमच्या शहरात आज एका तोळ्याची किंमत किती?
19
POKमध्ये पाकचे अत्याचार, भारताची पहिली प्रतिक्रिया; असीम मुनीर यांचा घेतला खरपूस समाचार
20
'आता संयम ठेवणार नाही; पाकिस्तानला जगाच्या नकाशावरुन मिटवू...', लष्करप्रमुखांचा पाकला थेट इशारा

ठाणे जिल्ह्यालादेखील कुपोषणाचा विळखा

By admin | Updated: November 14, 2016 04:19 IST

नागरी, सागरी आणि डोंगरी या भूप्रदेशांत विभागलेल्या ठाणे जिल्ह्यात १५ लाख १६ हजार २९५ बालके ४ हजार ४५३ प्राथमिक, माध्यमिक आणि कनिष्ठ

सुरेश लोखंडे / ठाणेनागरी, सागरी आणि डोंगरी या भूप्रदेशांत विभागलेल्या ठाणे जिल्ह्यात १५ लाख १६ हजार २९५ बालके ४ हजार ४५३ प्राथमिक, माध्यमिक आणि कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये बागडत असून त्यात ८ हजार १९२ बालके शाळाबाह्य आहेत. ११ हजार मुले कुपोषण पीडित असून ८९३ बालके तीव्र कुपोषणामुळे जीव मुठीत घेऊन जगत असल्याचे उघड झाले आहे. भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू अर्थात मुलांचे चाचा नेहरू यांच्या जन्मदिनानिमित्त ‘बालदिन’ साजरा होत असताना जिल्ह्यातील बालकांची ही अवस्था समोर आली आहे.जिल्ह्यात ५२ कनिष्ठ महाविद्यालयांसह प्राथमिक व उच्च माध्यमिक, माध्यमिक असलेल्या एकूण १३०७ इंग्रजी माध्यमाच्या शाळा आहेत. या शाळांत सोयीसुविधा उत्तम आहेत. मराठी माध्यमाच्या दोन हजार ५२४ शाळांपैकी उच्च माध्यमिक १४ शाळा, प्राथमिक एक हजार १९६, माध्यमिक २८६, प्राथमिकसह माध्यमिक ८३० शाळा जिल्ह्यात आहेत. यातील अनेक शाळांतील मुले सोयीसुविधेपासून वंचितच राहिले आहेत. पाचवीपर्यंतच्या प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी १०० गॅ्रम सकस व पोषण आहार देण्यासाठी प्रतिविद्यार्थी तीन रुपये ८६ पैसे, तर सहावी व आठवीच्या विद्यार्थ्यांना १५० ग्रॅमच्या आहारासाठी पाच रुपये ७८ पैसेयाप्रमाणे प्रत्येक दिवसाकरिता शासन अनुदान दिले जात आहे. दोन हजार ७४५ प्राथमिक व माध्यमिक शाळांतील पाच लाख २९ हजार १८२ विद्यार्थ्यांना हा पोषण आहार दिला जातो. तरीही, बालके कुपोषणाने पीडित असल्याचे वास्तव नजरेआड करता येत नाही.

11,000बालकांना कुपोषणाची पिडा-ग्रामीण, आदिवासी, दुर्गमभागात एक लाख १८ हजार ६५६ बालके आहेत. यातील सहा वर्षेवयोगटाचे एक लाख पाच हजार ८५४ बालके सर्वसाधारण श्रेणीचे आहेत. तर, ११ हजार बालके कुपोषणाने पीडित आहेत. यामध्ये ८९३ बालके तीव्र कुपोषणाने जर्जर झाले आहेत. त्यांना सशक्त करण्यासाठी ‘व्हीसीडीसी’ केंद्राद्वारे सतत पोषण आहार देणे गरजेचे आहे.

वर्षभरात ८१९३ शाळाबाह्य बालकांचा शोध -‘शिक्षणाचा हक्क’ मिळवून देण्याच्या नावाखाली केवळ सर्वेक्षण करून मुलांच्या संख्यांनी केवळ रकाने भरले जात आहेत. या वर्षभरात आठ हजार १९३ शाळाबाह्य मुलांचा शोध घेतल्याचा दावा प्रशासनाने केला आहे. यापैकी महापालिकांकडून दोन हजार ३८८ मुलांना शाळेत दाखल केल्याचे सांगितले जात आहे. तर, जिल्हा परिषदेकडून एक हजार २०४ मुलांना शाळेत घेतल्याचा दावा केला आहे; पण चौकशीअंती बहुतांश ठिकाणी या मुलांची नोंद आढळून येत नाही. सहा महापालिकांमध्ये सहा हजार ७७५ मुले शाळाबाह्य आहेत. यामध्ये तीन हजार ७२० मुलांसह तीन हजार ५५ मुलींचा समावेश आहे. गावखेड्यांत एक हजार ४१८ बालके शाळाबाह्य आहेत. यात ७०१ मुलींचा समावेश आहे.