शहरं
Join us  
Trending Stories
1
कुख्यात दहशतवादी सैफुल्लाह खालिद ठार, भारतात झालेल्या तीन हल्ल्यांमागे होता हात, पाकिस्तानमध्ये अज्ञातांनी झाडल्या गोळ्या  
2
आणखी एका पाकिस्तानी हेराला ठोकल्या बेड्या, ISIला भारताची गोपनीय माहिती पुरवणारा अरमान अटकेत  
3
IPL 2025: मोठी बातमी! SRHचा स्टार क्रिकेटर कोरोना पॉझिटिव्ह; काव्या मारनची डोकेदुखी वाढली!
4
ज्योती मल्होत्राचा पहलगाम दहशतवादी हल्ल्याशी काय संबंध? पोलिसांनी केला मोठा खुलासा...
5
Spying for Pakistan: ज्योती मल्होत्रानंतर यु ट्यूबर प्रियांका सेनापती रडारवर! केंद्रीय गुप्तचर ब्युरोने केली चौकशी
6
एकच आंबा तीन किलोंचा! शेतकऱ्याने दिलेलं गिफ्ट बघून शरद पवार भारावले; फोटो शेअर करत म्हणाले...
7
IPL 2025 खेळण्यासाठी PSL सोडून आला, पण किटबॅग पाकिस्तानात राहिली, मेंडिसने पुढे काय केलं?
8
इंडोनेशिया, थायलंड, दुबई... पाकिस्तानी लष्करी अधिकाऱ्यांसोबत कोणकोणते देश फिरली Youtuber ज्योती?
9
Viral Video : कांदा कापताना डोळ्यांतून येणार नाही पाणी! सोशल मीडियावरचा व्हायरल देसी जुगाड बघाच
10
'या' अभिनेत्याला डेट करतीये राधिका मदन? रिलेशनशिपवर म्हणाला, "मी खूप चिपकू बॉयफ्रेंड..."
11
रशियाचा युक्रेनवर सर्वात मोठा ड्रोन हल्ला! एकाच वेळी २७३ ड्रोन्स सोडले अन्...
12
RR vs PBKS : शशांक सिंहचा परफेक्ट फिनिशिंग टच! पंजाब किंग्जनं उभारली विक्रमी धावसंख्या
13
सोलापूर आग दुर्घटना; मृतांचा आकडा पोहचला आठवर; बेडरूममध्ये सापडले पाच जणांचे मृतदेह 
14
Nehal Wadhera नं फिफ्टीसह सावरला डाव; मग प्रीती झिंटानं संघाच्या हिरोला अशी दिली दाद
15
'हा' मराठमोळा स्टार टीव्ही इंडस्ट्रीत सर्वांत महागडा! दिलीप जोशी, रुपाली गांगुलीही मागे पडले!
16
जगात 'मेड इन इंडिया'चा बोलबाला; स्मार्टफोन निर्यातीत भारताची मोठी झेप, 24 अब्ज डॉलर्स...
17
"चिंदबरम यांनी जो कायदा आणला, त्याला मी विरोध केला, मात्र..."; शरद पवारांनी सांगितली आठवण
18
व्हाईट हाऊसचे सल्लागार बनले २ जिहादी; एक लश्कर ए तोयबा तर दुसरा अल कायदाशी लिंक
19
“ज्योतीला फसवले जातेय, सामान्य व्यक्तीप्रमाणे महिन्याला १५-२०-२५ हजार कमावते”; वडिलांचा दावा
20
ही गुंडगिरी संपुष्टात आणण्यासाठी मीच पुढाकार घेणार; मनोज जरांगेंनी घेतली शिवराज दिवटेची भेट

ठाणे जिल्ह्यालादेखील कुपोषणाचा विळखा

By admin | Updated: November 14, 2016 04:19 IST

नागरी, सागरी आणि डोंगरी या भूप्रदेशांत विभागलेल्या ठाणे जिल्ह्यात १५ लाख १६ हजार २९५ बालके ४ हजार ४५३ प्राथमिक, माध्यमिक आणि कनिष्ठ

सुरेश लोखंडे / ठाणेनागरी, सागरी आणि डोंगरी या भूप्रदेशांत विभागलेल्या ठाणे जिल्ह्यात १५ लाख १६ हजार २९५ बालके ४ हजार ४५३ प्राथमिक, माध्यमिक आणि कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये बागडत असून त्यात ८ हजार १९२ बालके शाळाबाह्य आहेत. ११ हजार मुले कुपोषण पीडित असून ८९३ बालके तीव्र कुपोषणामुळे जीव मुठीत घेऊन जगत असल्याचे उघड झाले आहे. भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू अर्थात मुलांचे चाचा नेहरू यांच्या जन्मदिनानिमित्त ‘बालदिन’ साजरा होत असताना जिल्ह्यातील बालकांची ही अवस्था समोर आली आहे.जिल्ह्यात ५२ कनिष्ठ महाविद्यालयांसह प्राथमिक व उच्च माध्यमिक, माध्यमिक असलेल्या एकूण १३०७ इंग्रजी माध्यमाच्या शाळा आहेत. या शाळांत सोयीसुविधा उत्तम आहेत. मराठी माध्यमाच्या दोन हजार ५२४ शाळांपैकी उच्च माध्यमिक १४ शाळा, प्राथमिक एक हजार १९६, माध्यमिक २८६, प्राथमिकसह माध्यमिक ८३० शाळा जिल्ह्यात आहेत. यातील अनेक शाळांतील मुले सोयीसुविधेपासून वंचितच राहिले आहेत. पाचवीपर्यंतच्या प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी १०० गॅ्रम सकस व पोषण आहार देण्यासाठी प्रतिविद्यार्थी तीन रुपये ८६ पैसे, तर सहावी व आठवीच्या विद्यार्थ्यांना १५० ग्रॅमच्या आहारासाठी पाच रुपये ७८ पैसेयाप्रमाणे प्रत्येक दिवसाकरिता शासन अनुदान दिले जात आहे. दोन हजार ७४५ प्राथमिक व माध्यमिक शाळांतील पाच लाख २९ हजार १८२ विद्यार्थ्यांना हा पोषण आहार दिला जातो. तरीही, बालके कुपोषणाने पीडित असल्याचे वास्तव नजरेआड करता येत नाही.

11,000बालकांना कुपोषणाची पिडा-ग्रामीण, आदिवासी, दुर्गमभागात एक लाख १८ हजार ६५६ बालके आहेत. यातील सहा वर्षेवयोगटाचे एक लाख पाच हजार ८५४ बालके सर्वसाधारण श्रेणीचे आहेत. तर, ११ हजार बालके कुपोषणाने पीडित आहेत. यामध्ये ८९३ बालके तीव्र कुपोषणाने जर्जर झाले आहेत. त्यांना सशक्त करण्यासाठी ‘व्हीसीडीसी’ केंद्राद्वारे सतत पोषण आहार देणे गरजेचे आहे.

वर्षभरात ८१९३ शाळाबाह्य बालकांचा शोध -‘शिक्षणाचा हक्क’ मिळवून देण्याच्या नावाखाली केवळ सर्वेक्षण करून मुलांच्या संख्यांनी केवळ रकाने भरले जात आहेत. या वर्षभरात आठ हजार १९३ शाळाबाह्य मुलांचा शोध घेतल्याचा दावा प्रशासनाने केला आहे. यापैकी महापालिकांकडून दोन हजार ३८८ मुलांना शाळेत दाखल केल्याचे सांगितले जात आहे. तर, जिल्हा परिषदेकडून एक हजार २०४ मुलांना शाळेत घेतल्याचा दावा केला आहे; पण चौकशीअंती बहुतांश ठिकाणी या मुलांची नोंद आढळून येत नाही. सहा महापालिकांमध्ये सहा हजार ७७५ मुले शाळाबाह्य आहेत. यामध्ये तीन हजार ७२० मुलांसह तीन हजार ५५ मुलींचा समावेश आहे. गावखेड्यांत एक हजार ४१८ बालके शाळाबाह्य आहेत. यात ७०१ मुलींचा समावेश आहे.