शहरं
Join us  
Trending Stories
1
"संतोष देशमुखांच्या खुनाचा बदला होणार..."; कसा होणार? मनोज जरांगे यांनी स्पष्टच सांगितलं!
2
मोठी घडामोड! अमेरिकेविरोधात युद्धास तयार झाला हा देश; ३७ लाखांच्या सैन्याला तयारीचे आदेश, रशियाचेही समर्थन...
3
डोनाल्ड ट्रम्प यांना धक्का! 'भारतातून मालाची आयात वाढवण्याचे पुतिन यांचे आदेश; पंतप्रधान मोदींचे कौतुकही केले
4
डॉक्टरांच्या खराब हँडरायटिंगवर हायकोर्टचा 'स्ट्राँग' डोस! म्हणाले, रुग्णांच्या आयुष्याशी खेळ...
5
टाटा मोटर्सचा IPO... दोन दिवसांनी कमाईची संधी, लिस्टिंग कधी, प्राईज बँड काय, सर्वकाही जाणून घ्या
6
"'युद्ध का डर...!'; आम्ही कागदी वाघ, तर मग नाटो कोण?" पुतिन यांचा अमेरिकेवर तगडा प्रहार, भारतासंदर्भातही स्पष्टच बोलले!
7
VIDEO : केएल राहुलनं शिट्टी मारत साजरी केली सेंच्युरी; जाणून घ्या त्यामागचं कारण
8
त्या' 11 संशयितांची कसून चौकशी अकोला, मुंबईचे पोलीस पथक परतवाड्यात दाखल, इंट्रोगेशन सुरू
9
अमेरिकेनंतर आणखी एका मोठ्या देशात शटडाऊन; कर्मचारीच गेले संपावर, पर्यटन स्थळेही झाली बंद...
10
"तसेही आज तेच करावे लागले ना?"; भाजपने उद्धव ठाकरेंना डिवचले, दसरा मेळाव्यावरून हल्ला
11
Mirabai Chanu : मीराबाई चानूने वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये रचला इतिहास; १९९ किलो वजन उचलून जिंकलं सिल्व्हर मेडल
12
धक्कादायक! मुंबईतील २६/११ मधील हल्ल्यात NSG कमांडोने शौर्य दाखवले; आता गांजा तस्करीच्या आरोपाखाली अटक
13
"रावण वाईट नव्हता, थोडा खोडकर...", अभिनेत्रीची वादग्रस्त पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
14
Tragedy in Bihar: हृदयद्रावक घटना! वंदे भारत एक्सप्रेसच्या धडकेत ४ ठार; २ जण गंभीर जखमी
15
पुणे हादरले! टीव्ही बंद करण्यावरुन वाद, बापाची मुलाकडून हत्या; कोथरुडमधील घटना
16
टाटा मोटर्स वगळता विक्रीचा दबाव; जागतिक बाजारातील संमिश्र संकेतामुळे भारतीय बाजार रेड झोनमध्ये
17
मला पुरस्कार द्या...! पठ्ठ्याने फास्टॅग पास आल्यापासून २५ दिवसांत ११,००० किमी थार चालविली, वाचले एवढे रुपये...
18
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडेसाठी अभिषेक शर्मा-तिलक वर्माची टीम इंडियात एन्ट्री
19
"सुशांतबद्दल सांगायचं तर आम्ही ३ वर्ष...", अभिनेत्याच्या मृत्यूनंतर पहिल्यांदाच व्यक्त झाल्या सविता प्रभुणे
20
IT क्षेत्रासाठी मोठा धक्का! TCS मधून १२,००० जणांना काढणार, कर्मचाऱ्यांसमोर दोनच पर्याय

ब्रिटीशकालीन सात पुलांच्या वाहतुकीसाठी ठाणो जिल्हा प्रशासन सतर्क !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2017 21:11 IST

इंग्रज राजवटीतील सुमारे सात पूल आजही जिल्ह्यात तग धरून उभे आहेत. एक शतकापेक्षा अधिक काळापासून असलेल्या या पुलांवर आजही रहदारी आहे. मात्र, तीन पूल अवजड वाहनांसह हलक्या वाहनांसाठीदेखील बंद केले आहेत. परंतु, तरीही लोकांची त्यावरून येजा सुरूच आहे.

- सुरेश लोखंडे ठाणे -  इंग्रज राजवटीतील सुमारे सात पूल आजही जिल्ह्यात तग धरून उभे आहेत. एक शतकापेक्षा अधिक काळापासून असलेल्या या पुलांवर आजही रहदारी आहे. मात्र, तीन पूल अवजड वाहनांसह हलक्या वाहनांसाठीदेखील बंद केले आहेत. परंतु, तरीही लोकांची त्यावरून येजा सुरूच आहे. यामुळे खबरदारीची उपाययोजना म्हणून ही रहदारीदेखील बंद करावी की काय, हा विचारविनिमय बांधकाम विभागात जोरदारपणो सुरू आहे.एल्फिन्स्टनच्या दुर्घटनेमुळे ब्रिटिशकालीन पुलांकडे बांधकाम खात्याने लक्ष केंद्रित केले आहे. जिल्ह्यात आजमितीस सात पूल आहेत. यामध्ये भिवंडी तालुक्यात दोन, शहापूर तालुक्यातील कसारा गावात दोन, कल्याणमधील दोन आणि वाडा-मनोर-पालघर रस्त्यावरील सूर्या नदीवरील पूल ब्रिटिशकालीन असल्याची नोंद बांधकाम विभागाकडे आहे. यातील तीन पुलांवरून आजही वाहतूक सुरळीत सुरू आहे. यामध्ये भिवंडीतील कामवारी नदीवरील पुलासह सूर्या नदीवरील पूल आणि उल्हास नदीवरील रायता पुलावरून सर्व प्रकारची वाहतूक सुरू आहे. खबरदारीची उपाययोजना म्हणून वाहतुकीसाठी सुरू असलेल्या या पुलांकडे बांधकाम विभागाने आता लक्ष केंद्रित केले असून जिल्हा प्रशासनातही त्यावर जोरदार चर्चा ऐकायला मिळत आहे. भिवंडीला लागून असलेला सैतानी पूल हा सर्व प्रकारच्या वाहतुकीस बंद केला आहे. राष्ट्रीय महामार्ग 621 वर तो आहे. कर्जत, कल्याण व भिवंडीजवळून हा महामार्ग जव्हारच्या दिशेने पुढे जातो. भिवंडीलाच लागून असलेला कामवारी नदीवरील पूल ब्रिटिशकालीन आहे. 1929 मध्ये बांधलेला हा पूल वाहतुकीस योग्य आहे, पण लवकरच त्यावरील वाहतूक बंद करावी लागणार आहे. त्याला लागूनच नवीन पूल बांधण्यात येत आहे. या पुलाच्या प्रस्तावास मंजुरी मिळाल्याचे कार्यकारी अभियंता जिभाऊ गांगुर्डे यांनी लोकमतला सांगितले. कल्याण खाडीवरील दुर्गाडी किल्ल्यास लागूून असलेला पत्रीपूल काही वर्षापासून सर्वच प्रकारच्या वाहतुकीस बंद केला आहे. बाजूलाच नवा पूल तयार केला असून त्यावरून वाहतूक सुरू आहे. तर, उल्हास नदीवर रायते गावाजवळील पूल 1947 मध्ये बांधलेला आहे. कल्याण-नगर राष्ट्रीय महामार्गावरील हा पूल सुस्थितीत असून वाहतूक सुरू आहे. सूर्या नदीवर वाडा-पालघर-मनोर महामार्गावरील पूल 1941 मध्ये बांधलेला आहे. त्यावरील अवजड वाहतूक बंद करून नवीन पुलावरून ती सुरू आहे.     शहापूर तालुक्यातील कसारा गावात दोन काँक्रिटचे ब्रिटिशकालीन पूल आहेत. कमानीचे बांधकाम असलेल्या या दोन पुलांपैकी एका पुलाची मुदत सुमारे 1क् वर्षापूर्वीच संपलेली आहे. त्यावरील अवजड वाहतूक काही वर्षाआधीच बंद केली होती. आता हलक्या वाहनांसाठीदेखील हा पूल एक वर्षापासून बंद केला आहे. दुसरा पूल सुस्थितीत असल्यामुळे त्यावरून सुरळीत वाहतूक सुरू असल्याचे कार्यकारी अभियंता दिनेश महाजन यांनी सांगितले. त्या सर्वच पुलांचे पुन्हा स्ट्ररल ऑडिट करण्याच्या मानसिकतेत बांधकाम विभाग असून त्यादृष्टीने जिल्हा प्रशासन विचारविनिमय करत आहे.