शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
3
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
4
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
5
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
6
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
7
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
8
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
9
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
10
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
11
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
12
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
13
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
14
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
15
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
16
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
17
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
18
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
19
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
20
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार

Thane: सायबरचे गुन्हे खुनापर्यंत पोहोचू लागले आहेत, ॲड.निर्मला सामंत-प्रभावळकर यांनी व्यक्त केली खंत

By प्रज्ञा म्हात्रे | Updated: August 28, 2023 17:51 IST

Thane: आर्थिक फसवणूक केली जात आहे, अनेक खुनाच्या घटना घडल्या आहेत अशी माहिती राज्य महिला आयोग्याच्या माजी अध्यक्षा ॲड.निर्मला सामंत-प्रभावळकर यांनी दिली.

ठाणे - सायबर गुन्हयांच्या घटनांमध्ये वाढ झाली असून हे गुन्हे अब्रुनुकसानीपासून खुनापर्यंत घडत आहे. मोबाईलमधूनही गुन्हे घडत आहेत, आर्थिक फसवणूक केली जात आहे, अनेक खुनाच्या घटना घडल्या आहेत अशी माहिती राज्य महिला आयोग्याच्या माजी अध्यक्षा ॲड.निर्मला सामंत-प्रभावळकर यांनी दिली.

यशवंतराव चव्हाण सेंटर,मुंबईच्या ठाणे जिल्हा केंद्र आणि आम्ही सिद्ध लेखिका आयोजित महिलांचे हक्क व अधिकार याविषयीच्या जनजागृती सत्रात ॲड. निर्मला सामंत-प्रभावळकर म्हणाल्या की, तंत्रज्ञानाचा गैरवापर होत जे गुन्हे घडतात त्याला सायबर गुन्हे म्हटले जाते. यात मुलींच्या फोटोंचे मॉर्फींग करणे, स्टॉकींग करणेपासून खुनापर्यंतच्या घटना घडल्या आहेत. मॅट्रीमोनीसाईट्सवरुन फसवणूकीच्या अनेक घटना घडत आहेत. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानंतरही महिलांना समानतेसाठी लढा द्यावा लागतोय ही चिंताजनक बाब असल्याचे त्यांनी सांगितले.

हुंडा देणे आणि घेणे दोन्ही गुन्हा आहे. हुंडाबळीचे प्रमाण शहरी भागात कमी आहे. आता जोडप्यांमध्ये ॲडजेंस्टमेंट होत नसल्याने विवाह मोडण्याच्या घटना घडत आहे. शिक्षणाचा खरा अर्थ समजून घेतला पाहिजे. झटकन निर्णय घेऊ नये असा सल्ला त्यांनी दिला. आता विवाह करताना विचार करावा लागत आहे, स्वतंत्र जगण्याला प्राधान्य दिले जात आहे. घटस्फोटाबद्द्ल पुर्वी जाहीरपणे बोलले जात नव्हते, तेव्हा प्रमाण देखील कमी होते, परंतू आता घटस्फोटच्या घटना साधारण झाल्या आहेत.

घटस्फोटामागची पुर्वी असणारी कारणे आता बदलेली आहे. त्यामुळे आता दोन्ही कुटुंबाचे समुपदेशन गरजेचे झाले आहे. कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंध कायद्याची यावेळी त्यांनी माहिती दिली.

टॅग्स :thaneठाणेcyber crimeसायबर क्राइमdowryहुंडा