शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
3
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
4
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
5
१२४ वर्षांनंतर अक्षय तृतीया-चतुर्थी-रोहिणी नक्षत्र अन् बुधवारचा दुर्मीळ योग!
6
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
7
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
8
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
9
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
10
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
11
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
12
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
13
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
14
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
15
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
16
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
17
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
18
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
19
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
20
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...

ठाणे लोकन्यायालयात ६९७२ खटले निकाली

By admin | Updated: February 15, 2017 23:27 IST

ठाणे जिल्हा सत्र न्यायालयातील जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाने ठाणे व पालघर जिल्ह्यांतील सर्व न्यायालयांमध्ये घेतलेल्या राष्ट्रीय लोकन्यायालयात

सुरेश लोखंडे / ठाणेठाणे जिल्हा सत्र न्यायालयातील जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाने ठाणे व पालघर जिल्ह्यांतील सर्व न्यायालयांमध्ये घेतलेल्या राष्ट्रीय लोकन्यायालयात सहा हजार ९७२ प्रलंबित घटले निकाली काढले आहेत. तर, विविध खटल्यांतील १३ कोटी सात लाख ७७ हजार रुपयांची भरपाई व नुकसानभरपाई देणारे दावे मंजूर केले आहेत. या प्रकरणांवरील निर्णयाविरोधात मात्र कोणत्याही पक्षकाराला कोणत्याही न्यायालयात आता दाद मागता येणार नाही.येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.एम. गव्हाणे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे व पालघर जिल्ह्यातील सर्व तालुका न्यायालये, कौटुंबिक, कामगार, सहकार न्यायालयांमध्ये राष्ट्रीय लोकन्यायालय शनिवारी आयोजित करण्यात आले होते. या दोन्ही जिल्हा न्यायालयांमध्ये विविध स्वरूपांचे प्रलंबित व दावा दाखल होण्यापूर्वीचे ३० हजार ७५६ खटले होते. यातील सहा हजार ९७२ खटले दोन्ही पक्षकारांच्या सहमतीने, तडजोडीने व सलोख्याने निकाली काढण्यात आले आहेत. उर्वरित २३ हजार ७८४ खटल्यांची तडजोड व सहमती पक्षकारांमध्ये होऊ शकली नाही. यामुळे हे खटले अद्याप प्रलंबित आहेत. या राष्ट्रीय लोकन्यायालयांमध्ये सामंजस्याने निकाली काढलेल्या या खटल्यांमध्ये दिवाणी स्वरूपाची, तडजोडीस पात्र फौजदारी स्वरूपाची, वैवाहिक स्वरूपाची, १३८ एनआय कायद्यासंबंधीची (धनादेशांची), मोटार अपघात नुकसानभरपाई, भूसंपादन, वीज व पाणीबिल देयके, इत्यादी स्वरूपाची ही सहा हजार ९७२ प्रकरणे दोन्ही जिल्ह्यांत निकाली काढली आहेत. यामुळे न्यायालयांवरील सुनावणीचा मोठा ताण कमी झाला आहे. तसेच प्रलंबित खटल्यांची संख्याही कमी झाली आहे. याबाबत वकील व पक्षकारांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.यासाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव डी.एन. खेर यांच्या नियंत्रणात दोन्ही जिल्ह्यांतील वकील, लीगल एडचे प्रशिक्षित स्वयंसेवक, समाजसेवक आदींनी परिश्रम घेतले.