शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

ठाणेकरांनो मोफत वायफायसाठी ५ दिवसानंतर मोजा पैसे, प्रायोगिक तत्त्वावर झाली दोन लाख ग्राहकांची नोंदणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2018 17:37 IST

दोन लाख ग्राहकांनी ठाणे महापालिकेच्या प्रायोगिक तत्वावरील मोफत वायफाय सेवेचा फायदा घेतल्यानंतर आता खऱ्या अर्थाने ही सेवा पुढील पाच दिवसात प्रत्यक्षात सुरु करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. त्यानुसार ही सेवा हवी असल्यास ठाणेकरांना पैसे मोजावे लागणार आहेत.

ठळक मुद्देठेकेदाराबरोबर पालिका उघडणार एस्क्रो अकाऊंट८०० केबीपीएसनंतरचे दर मात्र गुलदस्त्यात

ठाणे : ठाणे शहर वायफायने कनेक्ट करण्यासाठी ठाणे महापालिकेने पावले उचलली असून स्मार्ट सिटीचा एक भाग म्हणून आता संपूर्ण शहर हे वायफायने कनेक्ट केले जाणार आहे. त्यानुसार प्रायोगिक तत्त्वावर सुरू केलेल्या या सेवेअंतर्गत आतापर्यंत दोन लाखांचा टप्पा ओलांडला आहे. परंतु, आता या सेवेचा लाभ घ्यायचा असेल तर पुढील चार दिवसानंतर ठाणेकरांना पैसे मोजावे लागणार आहेत. मात्र, ही सेवा मार्केट रेटपेक्षा कमी दरात उपलब्ध असेल असा दावा महापालिकेने केला असला तरी हे दर किती असतील हे मात्र गुलदस्त्यात ठेवले आहे.महापालिकेमार्फत वायफायचा हा प्रकल्प पीपीपी म्हणजेच खाजगी लोकसहभगातून राबविला जात आहे. त्यामुळे यासाठी पालिकेला एकही पैसा खर्च न करता, उलट खाजगी ठेकदाराकडून पालिकेला वार्षिक ६१ लाख ९९ हजार ९९९ रुपयांचा आर्थिक फायदा होणार आहे. स्मार्टसिटी एक भाग म्हणून आणि ठाणेकरांना इंटरनेटशी कनेक्ट करण्यासाठी मागील वर्षी पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी हे पाऊल उचलले होते. वायफायची यंत्रणा बसविण्यासाठी महापालिकेच्या ३२ हजार ५०० विद्युत पोलचा वापर केला जात आहे. वायफाय सिस्टममध्ये महापालिकेला एकही पैसा खर्च करावा लागणार नसून महापालिका संबधींत एजेन्सीला विद्युत पोल उपलब्ध करुन देणार आहे. त्यानुसार ज्यांना या वायफायची सुविधा घ्यायची असेल त्यांना सुरुवातीला १०० रुपये तेही एकदाच मोजावे लागणार आहेत. यामध्ये ८०० केबीपीएसपर्यंत इंटरनेट मोफतअसून त्यापुढील वापरासाठी चार्जेस द्यावे लागणार आहेत. यातून जे उत्पन्न मिळणार आहे. त्यातील १४.२३ टक्के हिस्सा अथवा ६१ लाख ९९ हजार ९९९ रुपये हा पालिकेला मिळणार आहेत. त्यानुसार मागील काही महिन्यांपासून प्रायोगिक तत्त्वावर ही सेवा मोफत दिली असून आतापर्यंत २ लाख ठाणेकरांनी याचा फायदा घेतल्याची माहिती महापालिकेने दिली आहे.परंतु आतापुढील चार दिवसानंतर महापालिका संबधींत ठेकेदाराबरोबर एस्क्रो अकाऊंट ओपन करणार आहे. त्यावर महापालिकेचे हक्क असणार आहेत. म्हणजेच जे ग्राहक या वायफाय सेवेचा लाभ घेणार आहेत. त्याची नोंदणी या अकाऊंटमधून होणार आहे. तसेच येणारे पैसेदेखील याच अकाऊंटमध्ये जमा होणार आहेत. त्यानंतर संबधींत ठेकेदाराला त्याचा हिस्सा देणार असल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे. त्यानुसार हे अकाऊंट ओपन झाल्यानंतर येत्या चार ते पाच दिवसात प्रत्यक्षात या सेवेला सुरुवात होणार असून ग्राहकांची नोंदणी केली जाणार आहे. तसेच नवे प्लॅनही जाहीर केले जाणार आहेत. परंतु, हे प्लॅन अद्यापही गुलदस्त्यातच ठेवले आहेत. त्यामुळे ८०० केबीपीएसनंतर ठाणेकरांच्या खिशाला किती भुर्दंड पडणार हे मात्र अद्यापही निश्चित झालेले नाही. असे असले तरी ही सेवा मार्केटमधील इतर कंपन्यांच्या तुलनेत कमी दर आकारणार असल्याचा दावा पालिकेने केला आहे. 

टॅग्स :thaneठाणेtmcठाणे महापालिकाWiFiवायफाय