शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताविरोधात बायो केमिकल शस्त्राचा वापर; गुजरातच्या दहशतवाद्याकडून 'रिसिन' जप्त, किती खतरनाक?
2
कोण आहे डॉक्टर आदिल अहमद राठर? ज्याच्या खुलाशातून जप्तकरण्यात आली 350 किलो स्फोटकं अन् AK-47
3
हाफिज सईदबाबत मोठी माहिती समोर आली; ऑपरेशन सिंदूरनंतर भारतावर नव्या मार्गाने हल्ला करण्याच्या तयारीत...
4
"हे निर्लज्ज लोक तुमच्या यशातही..." गावसकरांनी विश्वविजेत्या लेकींसोबत शेअर केला आपला वाईट अनुभव
5
मनसे-मविआची दिलजमाई! ‘या’ ठिकाणी एकत्र निवडणूक लढणार; नेते म्हणाले, “महायुतीला आता शह...”
6
...म्हणून महामुंबईच्या ९ महापालिका भाजपला हव्यात
7
Video - अबब! थारमधून नोटांचा पाऊस, पैसे गोळा करायला लोकांची मोठी झुंबड
8
अनेक ठिकाणी भीषण केमिकल हल्ल्याची योजना; गुजरात ATS ने ISKP संघटनेचा कट उधळला
9
जिओ-एअरटेलमध्ये खळबळ! BSNL लवकरच आपली ५जी सेवा सुरू करणार, 'या' शहरांपासून सुरुवात
10
भूतकाळातील गूढ, थरारक घटना; मराठीतील रहस्यपट 'असंभव'चा ट्रेलर चुकवू नका
11
“मनसे काँग्रेससाठी समविचारी पक्ष नाही, त्यामुळे सोबत घेण्याचा प्रश्नच नाही”; कोणी केला दावा?
12
सर्व गुन्हेगारी प्रवृत्ती थार आणि बुलेटवरच फिरतात; हरियाणाच्या डीजीपींचं खळबळजनक विधान
13
कलंकित अन् काळा भूतकाळ असलेले विश्वास ठेवण्यालायक नाहीत, काँग्रेस-राजद जोडी...! बिहारमध्ये CM योगींची तुफान फटकेबाजी
14
४२ फेऱ्या, ५९ हजार प्रवासी अन् ६.२१ कोटींची कमाई; ‘या’ वंदे भारत ट्रेनची रेकॉर्डब्रेक कामगिरी
15
माली देशात पाच भारतीय नागरिकांचे अपहरण; केंद्र सरकारने दिली महत्वाची माहिती...
16
IND vs SA 1st Test : 'ध्रुव' तारा चमकला! टीम इंडियात ३९ वर्षांनी पहिल्यांदाच असं चित्र दिसणार?
17
Kitchen Hack: गॅस बर्नरवर काळे, चिकट थर जमा झालेत? 'या' दोन वस्तूंनी मिनिटांत करा चकाचक 
18
५०० रुपये उधार घेतले, ११ कोटी जिंकले... भाजीवाल्याला आल्या धमक्या, बंद करावा लागला फोन
19
मोठा अनर्थ टळला! AK 47 ते ३०० किलो RDX जप्त; डॉक्टरच्या मुखवट्यात लपला होता क्रूर दहशतवादी
20
अखंड भारताची 'ही' बॉर्डर, तालिबान-पाकिस्तानच्या वादाचं मूळ कारण; १३२ वर्षांनीही धगधगती आग कायम

ठाणे शहराची पाणी कपात तुर्तास रद्द, ठाणेकरांसाठी आनंद वार्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2019 16:28 IST

मागील काही दिवसापासून पडत असलेल्या सततच्या पावसामुळे ठाणेकरांची पाणी कपात तुर्तास रद्द करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. त्यामुळे ठाणेकरांसाठी ही एक आनंदाची बातमी ठरली आहे.

ठळक मुद्देबुधवारी केली जात होती कपातपावसाने पाठ फिरविल्यास पुन्हा कपात

ठाणे - मागील काही महिने ठाणेकरांचे पाण्याविना हाल सुरु होते. परंतु आता पावसाने ठाण्यासह जिल्ह्यात जोरदार हजेरी लावल्याने ठाणे शहराची पाणी कपात तुर्तास रद्द करण्यात आल्याची माहिती पालिका सुत्रांनी दिली आहे. परंतु पावसाने पाठ फिरविल्यास पुन्हा पाणी कपात केली जाईल असेही पालिकेने स्पष्ट केले आहे. असे असले तरी ठाणेकरांना जोपर्यंता पाऊस आहे, तो पर्यंत पाणी कपातीचा सामना करावा लागणार नाही.              ठाणे महापालिकेच्या माध्यमातून शहरातील पाणी पुरवठा हा बुधवार ते गुरुवार असा २४ ते ३० तास बंद ठेवण्यात येत होता. यंदा तर ही पाणी कपात सप्टेंबर २०१८ पासूनच लागू करण्यात आली होती. सुरवातीला १४ टक्के त्यानंतर २० टक्के आणि आता तब्बल ३० टक्के पाणी कपात ठाणे शहरात केली जात होती. परंतु त्यानंतर पुढील दोन ते तीन दिवस कमी दाबाने पाणी पुरवठा केला जात होता. पाण्याच्या या कपातीवरुन महासभेतही अनेक वेळा आवाज उठविण्यात आला होता. पाण्यासाठी आंदोलनही झाल्याचे पहावयास मिळाले होते.दरम्यान आता मागील काही दिवसापासून ठाण्यासह जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. पाऊस असा पडत राहिला तर धरणांच्या पातळीतही लवकरच वाढ होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. परंतु मागील काही दिवसापासून पावसाने लावलेल्या सततच्या हजेरीमुळे शहरातील पाणी कपात तुर्तास रद्द करण्यात आल्याची माहिती पालिकेच्या सुत्रांनी दिली आहे. जो पर्यंत पावसाची अशीच कृपा राहिल तो पर्यंत कपात होणार नसल्याचेही पालिकेच्या सुत्रांचे म्हणने आहे. अद्याप धरणांच्या पातळीत वाढ झालेली नाही, तलावांमध्येही पुरेसा पाणी साठा नाही. परंतु सलग पडणाऱ्या पावसामुळे हा दिलासा दिला जात असल्याचे पालिकेचे म्हणने आहे. परंतु पावसाने पाठ फिरविल्यास पुन्हा पाणी कपात करावी लागेल असेही पालिकेने स्पष्ट केले. 

टॅग्स :thaneठाणेtmcठाणे महापालिकाWaterपाणी