शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

Thane: आनंद हरपला नाही ‘परतला’; पण कुणासाठी?

By अजित मांडके | Updated: August 29, 2022 09:49 IST

Thane: ‘शिवसेना’ या चार शब्दांसाठी शेवटच्या श्वासापर्यंत जगलेल्या दिघे यांच्यासाठी शिवसेनेतील उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे गटात जोरदार चढाओढ सुरू आहे.

- अजित मांडके   सध्या ठाण्यासह जिल्ह्यात एकच धून वाजत आहे. ‘माझा आनंद हरपला... माझा आनंद हरपला...’, मात्र खरंच आनंद हरपला की आनंद परतला, याची चर्चा सध्या जिल्ह्यात सर्वत्र सुरू आहे. मागील काही दिवसांत राज्यात घडलेल्या राजकीय घडामोडींनतर ठाण्यात आनंद दिघे या नावाची चर्चा पुन्हा एकदा जोर धरू लागली आहे. ‘शिवसेना’ या चार शब्दांसाठी शेवटच्या श्वासापर्यंत जगलेल्या दिघे यांच्यासाठी शिवसेनेतील उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे गटात जोरदार चढाओढ सुरू आहे. त्यामुळे ‘आनंद हरपला नाही, तर परतला’ असेच काहीसे चित्र पहायला मिळत आहे. मात्र, आनंद कोणाचा शिंदेंचा की ठाकरेंचा हा वाद इतक्या लवकर मिटणारा नाही. शिवसैनिक या वादामुळे दु:खी आहे. खरंच आनंद ठाण्यात परतला तर आपल्यावरून सुरू असलेला संघर्ष पाहून गुदमरून जाईल, अशी भावना निष्ठावान शिवसैनिक व्यक्त करत आहेत.

ठाण्याला किंबहुना जिल्ह्यातील प्रत्येक तळागाळातल्या कार्यकर्त्यापर्यंत शिवसेना पोहोचविण्याचे काम शिवसेनेचा ‘ढाण्या वाघ’  अशी ओळख असलेल्या आनंद दिघे यांनी केले. काही वर्षांपूर्वी काळाने त्यांच्यावर घाला घातला आणि त्यांचे निधन झाले. ठाण्यातील शिवसेना पोरकी झाली. असे असले तरी आजही प्रत्येक निवडणुकीत दिघेंच्या आठवणी जागविल्या जातात. त्यांच्या नावाने मतांचा जोगवा मागण्याचे काम मागील कित्येक वर्षांपासून सुरू आहे. शिवसेनेला पहिली सत्ता ठाण्यानेच दिली. त्यामुळे शिवसेनेचा हा बालेकिल्ला मानला जातो. मात्र, मागील दीड महिन्यांची परिस्थिती पाहिल्यास शिवसेनेचेच दोन तुकडे झाले असून, खरी शिवसेना कोणाची, यावरून संघर्ष सुरू आहे. शिंदे गटाकडून आमचीच शिवसेना खरी असल्याचा दावा केला जात आहे. तसाच दावा ठाकरे हेही करत आहेत. बाळासाहेबांचे विचार आणि दिघेंची शिकवण घेऊन आम्ही हिंदुत्वाचा नारा देत असल्याचे सांगितले जाते. 

शिवसेनेचे दोन गट पडल्यानंतर त्याचे ठाण्यात पडसाद उमटले. ठाण्यातील शिवसेनेचे ६७ पैकी ६६ नगरसेवक शिंदे गटात सामील झाले, अशीच परिस्थिती जिल्ह्यातील इतर महापालिका आणि नगरपालिकेत दिसून आली. शिंदे गट जिल्ह्यात वरचढ ठरू पाहत आहे. त्यामुळे शिवसेनेचा हा बालेकिल्ला ताब्यात घेण्यासाठी दोन गटांत चढाओढ सुरू आहे. शिंदे गटाकडून दिघे कार्ड बाहेर काढण्यात आले आहे. दिघे यांच्या जीवनावर आधारित ‘धर्मवीर’ हा चित्रपट अलीकडेच प्रदर्शित केला गेला. जिल्ह्यात चित्रपट पोहोचविण्याचे काम  करण्यात आले. गुरुपौर्णिमा उत्सवात, १५ ऑगस्ट रोजी, दहीहंडी उत्सवात आणि शुक्रवारी दिघे यांच्या पुण्यतिथीनिमित्ताने ठाकरे आणि शिंदे यांच्याकडून दिघे हेच आमचे गुरु असल्याचा दावा करण्यात आला. ठाण्याचा मुख्यमंत्री व्हावा, ही दिघे यांची इच्छा आम्ही पूर्ण केल्याचा दावा खुद्द मुख्यमंत्र्यांकडून करण्यात आला. त्यामुळे येणाऱ्या महापालिका, विधानसभा निवडणुकीत ठाणे जिल्ह्यात दिघे कार्ड चालवून मतांचा जोगवा मागण्याचाच प्रयत्न केला जाणार हे स्पष्ट दिसते.

दिघेंचे स्वप्न काय होते?दिघे यांच्या पुण्यतिथीनिमित्ताने दिघे काय होते, कसे होते, त्यांची इच्छा काय होती, स्वप्न काय होते, हे शिवसैनिकांच्या व मतदारांच्या मनावर बिंबविण्याचा प्रयत्न दोन्ही गटांकडून केला जात आहे. आमचा आनंद हरपला म्हणता म्हणता आमचा आनंद पुन्हा परतला असल्याचेच दाखविण्याचा प्रयत्न दोन्ही गटांकडून होत आहे. मात्र, आनंद निवडणुकीत कुणाला खराखुरा विजयाचा आनंद मिळवून देणार ते महत्त्वाचे आहे.  

टॅग्स :thaneठाणेPoliticsराजकारण