शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन व्होटर आयडींच्या आपल्याच दाव्यामुळे तेजस्वी अडचणीत, निवडणूक आयोगाची नोटीस; तपशील मागितला
2
"युक्रेनविरुद्धच्या युद्धासाठी भारत रशियाला निधी पुरवतोय"; डोनाल्ड ट्रम्पच्या जवळच्या सहकाऱ्याचा मोठा आरोप!
3
आंध्र प्रदेशातील ग्रॅनाइट खाणीत मोठी दुर्घटना, ६ स्थलांतरित कामगारांचा मृत्यू, ३ जखमी
4
सुरक्षित गुंतवणुकीसह जबरदस्त रिटर्न! कमाईची उत्तम संधी आहेत या ५ स्कीम; मिळेल ८% पेक्षा जास्त व्याज
5
मनसे, उद्धवसेना, शेकाप, राष्ट्रवादी एकत्र आले म्हणजे..?
6
विमान उड्डाण करणारच होतं अन् केबिन तापलं; एअर इंडियाची 'ही' फ्लाइट झाली रद्द 
7
‘झोपु’ योजनेत ८० कोटींचा घोटाळा; विकासकांवर गुन्हा; आशापुरा ग्रुपच्या ७ जणांविरोधात टिळक नगर पोलिसांकडून तपास सुरू
8
आजचे राशीभविष्य, ०४ ऑगस्ट २०२५: ६ राशींना शुभ फलदायी दिवस, अचानक धनलाभ योग; कार्यात यश
9
पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचे खळ्ळखट्याक, १५ ते २० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल
10
अजेंटिक AI : ते काम करेलच, विचारही स्वत:च करेल!
11
स्पाइसजेट कर्मचाऱ्यांवर लष्करी अधिकाऱ्याचा हल्ला; मणका मोडला, जबडा तोडला, ४ जखमी 
12
एकाच कुटुंबातील तीन पिढ्या जपतायत गोविंदाची परंपरा, लालबागच्या पथकातील ६ जणांचा प्रेरणादायी प्रवास
13
पीयूसीसाठी लवकरच नवीन दर, विविध राज्यांच्या अभ्यासासाठी परिवहन विभागाकडून समिती स्थापन
14
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
15
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
16
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
17
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
18
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
19
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
20
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले

Thane: आनंद हरपला नाही ‘परतला’; पण कुणासाठी?

By अजित मांडके | Updated: August 29, 2022 09:49 IST

Thane: ‘शिवसेना’ या चार शब्दांसाठी शेवटच्या श्वासापर्यंत जगलेल्या दिघे यांच्यासाठी शिवसेनेतील उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे गटात जोरदार चढाओढ सुरू आहे.

- अजित मांडके   सध्या ठाण्यासह जिल्ह्यात एकच धून वाजत आहे. ‘माझा आनंद हरपला... माझा आनंद हरपला...’, मात्र खरंच आनंद हरपला की आनंद परतला, याची चर्चा सध्या जिल्ह्यात सर्वत्र सुरू आहे. मागील काही दिवसांत राज्यात घडलेल्या राजकीय घडामोडींनतर ठाण्यात आनंद दिघे या नावाची चर्चा पुन्हा एकदा जोर धरू लागली आहे. ‘शिवसेना’ या चार शब्दांसाठी शेवटच्या श्वासापर्यंत जगलेल्या दिघे यांच्यासाठी शिवसेनेतील उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे गटात जोरदार चढाओढ सुरू आहे. त्यामुळे ‘आनंद हरपला नाही, तर परतला’ असेच काहीसे चित्र पहायला मिळत आहे. मात्र, आनंद कोणाचा शिंदेंचा की ठाकरेंचा हा वाद इतक्या लवकर मिटणारा नाही. शिवसैनिक या वादामुळे दु:खी आहे. खरंच आनंद ठाण्यात परतला तर आपल्यावरून सुरू असलेला संघर्ष पाहून गुदमरून जाईल, अशी भावना निष्ठावान शिवसैनिक व्यक्त करत आहेत.

ठाण्याला किंबहुना जिल्ह्यातील प्रत्येक तळागाळातल्या कार्यकर्त्यापर्यंत शिवसेना पोहोचविण्याचे काम शिवसेनेचा ‘ढाण्या वाघ’  अशी ओळख असलेल्या आनंद दिघे यांनी केले. काही वर्षांपूर्वी काळाने त्यांच्यावर घाला घातला आणि त्यांचे निधन झाले. ठाण्यातील शिवसेना पोरकी झाली. असे असले तरी आजही प्रत्येक निवडणुकीत दिघेंच्या आठवणी जागविल्या जातात. त्यांच्या नावाने मतांचा जोगवा मागण्याचे काम मागील कित्येक वर्षांपासून सुरू आहे. शिवसेनेला पहिली सत्ता ठाण्यानेच दिली. त्यामुळे शिवसेनेचा हा बालेकिल्ला मानला जातो. मात्र, मागील दीड महिन्यांची परिस्थिती पाहिल्यास शिवसेनेचेच दोन तुकडे झाले असून, खरी शिवसेना कोणाची, यावरून संघर्ष सुरू आहे. शिंदे गटाकडून आमचीच शिवसेना खरी असल्याचा दावा केला जात आहे. तसाच दावा ठाकरे हेही करत आहेत. बाळासाहेबांचे विचार आणि दिघेंची शिकवण घेऊन आम्ही हिंदुत्वाचा नारा देत असल्याचे सांगितले जाते. 

शिवसेनेचे दोन गट पडल्यानंतर त्याचे ठाण्यात पडसाद उमटले. ठाण्यातील शिवसेनेचे ६७ पैकी ६६ नगरसेवक शिंदे गटात सामील झाले, अशीच परिस्थिती जिल्ह्यातील इतर महापालिका आणि नगरपालिकेत दिसून आली. शिंदे गट जिल्ह्यात वरचढ ठरू पाहत आहे. त्यामुळे शिवसेनेचा हा बालेकिल्ला ताब्यात घेण्यासाठी दोन गटांत चढाओढ सुरू आहे. शिंदे गटाकडून दिघे कार्ड बाहेर काढण्यात आले आहे. दिघे यांच्या जीवनावर आधारित ‘धर्मवीर’ हा चित्रपट अलीकडेच प्रदर्शित केला गेला. जिल्ह्यात चित्रपट पोहोचविण्याचे काम  करण्यात आले. गुरुपौर्णिमा उत्सवात, १५ ऑगस्ट रोजी, दहीहंडी उत्सवात आणि शुक्रवारी दिघे यांच्या पुण्यतिथीनिमित्ताने ठाकरे आणि शिंदे यांच्याकडून दिघे हेच आमचे गुरु असल्याचा दावा करण्यात आला. ठाण्याचा मुख्यमंत्री व्हावा, ही दिघे यांची इच्छा आम्ही पूर्ण केल्याचा दावा खुद्द मुख्यमंत्र्यांकडून करण्यात आला. त्यामुळे येणाऱ्या महापालिका, विधानसभा निवडणुकीत ठाणे जिल्ह्यात दिघे कार्ड चालवून मतांचा जोगवा मागण्याचाच प्रयत्न केला जाणार हे स्पष्ट दिसते.

दिघेंचे स्वप्न काय होते?दिघे यांच्या पुण्यतिथीनिमित्ताने दिघे काय होते, कसे होते, त्यांची इच्छा काय होती, स्वप्न काय होते, हे शिवसैनिकांच्या व मतदारांच्या मनावर बिंबविण्याचा प्रयत्न दोन्ही गटांकडून केला जात आहे. आमचा आनंद हरपला म्हणता म्हणता आमचा आनंद पुन्हा परतला असल्याचेच दाखविण्याचा प्रयत्न दोन्ही गटांकडून होत आहे. मात्र, आनंद निवडणुकीत कुणाला खराखुरा विजयाचा आनंद मिळवून देणार ते महत्त्वाचे आहे.  

टॅग्स :thaneठाणेPoliticsराजकारण