शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
2
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
3
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
4
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
5
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
6
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
7
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
8
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
9
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
10
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
11
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
12
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
13
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
14
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
15
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

ठाण्यात १९ ऐवजी ६७ झाडे तोडली; लक्ष्मी नारायण रेसिडेन्सीच्या रहिवाशांची तक्रार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2020 00:01 IST

आर्किटेक्ट म्हणतो २६ झाडे छाटली

n  लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : लक्ष्मी नारायण रेसिडेन्सीच्या मागील प्लॉटवरील १९ झाडे तोडण्यास परवानगी दिलेली असताना प्रत्यक्षात ६७ झाडे तोडली असल्याने त्याला जबाबदार असणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवर महापालिका आयुक्तांनी कठोर कारवाई करावी, अशी मागणी या सोसायटीच्या रहिवाशांनी केली आहे. गुरुवारी येथील रहिवाशांनी आयुक्तांना निवेदन दिले व वृक्षतोड करताना ५० वर्षे जुने झाड तोडल्याचा आरोप केला.मनपाने एका खासगी शाळेसाठी लक्ष्मी नारायण रेसिडेन्सीमागील प्लॉट विकण्याआधी तेथे हिरवीगार झाडी होती. ज्या शहरात मोकळ्या जागेची तीव्र कमतरता आहे, अशा शहरात आपण वृक्षतोड करण्यास परवानग्या देता कशा, याबद्दल नागरिकांनी आश्चर्य व्यक्त केले. आज, हा प्लॉट झाडे तोडल्याने मोकळा झाला आहे, असे रहिवाशांनी निवेदनात म्हटले आहे.  वृक्षतोड होत असल्याचे लक्षात आले तेव्हा रहिवासी मंजुषा पवार यांनी पालिकेला झाडे तोडण्यास विरोध केला. मात्र मनपाने दिलेल्या परवानगीचे पत्र त्यांनी वाचले. त्यात परवानगी दिली त्यापेक्षा अधिक झाडे तोडली आहेत, असे त्यांच्या लक्षात आले.  संबंधित अधिकाऱ्यांना ही झाडे तोडू नका, अशा वारंवार विनवण्या केल्या, पण त्यांनी माझे ऐकले नाही. तसेच, या झाडांचे पुनर्रोपण कुठे केले जाणार यासंदर्भात स्पष्टता नसल्याचे पवार म्हणाल्या. मनपाच्या परवानगीनुसार, १९ झाडे तोडायची व ४९ झाडांचे पुनर्रोपण करावे लागेल, पण छाटलेले वृक्ष व असलेले वृक्ष यांचा मेळ जुळत नाही. प्लॉटवरील ९१ झाडांपैकी सध्या फक्त २४ झाडे उरली आहेत. म्हणजे ६७ वृक्ष छाटले. मात्र आर्किटेक्ट आपण २६ झाडे तोडल्याचे सांगत आहे. म्हणजे परवानगी दिलेल्या १९ झाडांपेक्षा जास्त झाडे कापली आहेत, असे निवेदनात म्हटले आहे.त्या प्लॉटवर वृक्षतोड नियमानुसार केली जात आहे. आज त्यांनी लेखी कळविले असल्याने वृक्षतोडीचे काम थांबविले आहे. लक्ष्मी नारायण सोसायटीच्या रहिवाशांच्या शंकांचे निरसन झाल्यावरच पुढील कामास सुरुवात केली जाईल.    - अलका खैरे,        वृक्ष प्राधिकरण अधिकारी, ठामपा