शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसचा 'हात' सोडला, आता 'धनुष्यबाण' उचलणार; निरुपमांच्या शिवसेना प्रवेशाचा मुहूर्त ठरला!
2
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार
3
"केंद्र सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी संकटात, पण PM मोदी याकडे ढुंकूनही पाहायला तयार नाहीत"
4
“TMCला मतदान करण्यापेक्षा BJPला मत देणे चांगले”; काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरींचे विधान
5
ऋतुराज गायकवाडने इतिहास घडविला! MS Dhoni चा ११ वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम मोडला 
6
Kirit Somaiya: "याला मी आयुष्यात कधीच..."; यामिनी जाधव, रवींद्र वायकरांच्या उमेदवारीवरील प्रश्नावर किरीट सोमय्या गरजले!
7
BANW vs INDW: मालिका एकतर्फी जिंकण्याची टीम इंडियाला सुवर्णसंधी; बांगलादेशात भारताचा दबदबा
8
सलमान गोळीबार प्रकरण: चौकशी अर्धवट असताना आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम
9
पाकिस्तानला करायचीय भारताची बोरोबरी, या दिवशी लॉन्च करणार 'चंद्रयान'! असं असेल संपूर्ण मिशन
10
मुंबई लोकलमधून पडून आणखी एका तरुणाचा बळी; सात दिवसात तिघांचा मृत्यू
11
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
12
मराठमोळ्या अभिनेत्रीचा तुतारीला पाठिंबा, शरद पवारांसोबत स्टेजवर येत केला प्रचार
13
सिद्धू मुसेवाला हत्येचा मास्टरमाईंड गोल्डी ब्रारची अमेरिकेत हत्या: रिपोर्ट
14
सीएसएमटी स्थानकात आज पुन्हा लोकल रुळावरुन घसरली, हार्बर रेल्वे सेवा ठप्प!
15
बाळासाहेब रागावले तर माँसाहेब जवळ करायच्या, याउलट उद्धव ठाकरेंकडे...; शिंदेचे शिलेदार थेटच बोलले
16
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
17
पाकिस्तानात पीठ ८०० रूपये किलो; खाद्यपदार्थांचे दर गगनाला भिडले, का वाढली महागाई?
18
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
19
“मोदींना सहन होत नाही, महाराष्ट्रात येऊन माझ्यावर, उद्धव ठाकरेंवर बोलतात”: शरद पवार
20
'दिलदार' बुमराहने चिमुरड्याला दिली 'पर्पल कॅप', छोट्या फॅनचा आनंद गगनात मावेना.., पाहा Video

ठाण्यात ६०६ विस्थापितांना मिळाले हक्काचे घर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2021 5:20 AM

ठाणे : २०१६ सालापासून रेंटलच्या घरांत वास्तव्यास असलेल्या शहरातील तब्बल ६०६ विस्थापितांना अखेर हक्काची घरे मिळण्यास सुरुवात झाली आहे. ...

ठाणे : २०१६ सालापासून रेंटलच्या घरांत वास्तव्यास असलेल्या शहरातील तब्बल ६०६ विस्थापितांना अखेर हक्काची घरे मिळण्यास सुरुवात झाली आहे. ठाण्यातील ब्रह्मांड, कासारवडवली आणि पडलेगाव, दिवा-शीळ येथे बीएसयूपीच्या माध्यमातून उभारलेल्या घरांमध्ये त्यांना हक्काचा निवारा मिळाला आहे. यामध्ये कळव्यातील बुधाजीनगर येथील ८५ रहिवाशांचादेखील समावेश आहे. लॉटरी पद्धतीने ही घरे दिल्याची माहिती महापालिकेने दिली. डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात महापौर नरेश म्हस्के यांच्या उपस्थितीत शनिवारी ही लॉटरी काढण्यात आली.

२०१६ सालापासून शहरातील घोडबंदर, जोगिला तलाव परिसर, कळव्यातील शास्त्रीनगर, बुधाजीनगर, लोकमान्यनगर भागातील शास्त्रीनगर ते हत्तीपूल आदी भागांतील रहिवाशांची रस्ते रुंदीकरणात घरे गेली होती. या सर्व रहिवाशांना पालिकेने रेंटलच्या घरात वास्तव्यास ठेवले होते. परंतु, अखेर या ६०६ रहिवाशांच्या हक्काच्या घरांचा प्रश्न शनिवारी संपुष्टात आला. डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात झालेल्या कार्यक्रमात या रहिवाशांना लॉटरी पद्धतीने हक्काच्या घरांचे वाटप करण्यात आले. या वेळी महापौर नरेश म्हस्के, उपमहापौर पल्लवी कदम, विरोधी पक्षनेते अशरफ पठाण, माजी विरोधी पक्षनेत्या प्रमिला केणी आदींसह पालिकेचे पदाधिकारी आणि इतर मान्यवर उपस्थित होते. तत्कालीन आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या कार्यकाळात शहरातील विविध रस्त्यांचे रुंदीकरण केले होते. त्यामुळे अनेक रहिवासी विस्थापित झाले होते.

आठ दिवसांत हक्काच्या घरांत प्रवेश

या रहिवाशांच्या घरांची लॉटरी काढली असून यामध्ये त्यांना इमारत, त्यांचा फ्लॅट क्रमांक दिला आहे. त्यानंतर, आता पुढील आठ दिवसांत त्यांना त्यांच्या हक्काच्या घरांत जाता येणार असल्याचे महापालिकेने स्पष्ट केले. तर, पहिल्या टप्प्यानंतर आता शिल्लक २०२ घरेही दुसऱ्या टप्प्यात लवकरच वितरित केली जाणार आहेत.