शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
3
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
4
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
5
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
6
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
7
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
8
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
9
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
10
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
11
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
12
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
13
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
14
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
15
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
16
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
17
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
18
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
19
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
20
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका

ठाणे पालिकेत २०८५ पदे रिक्त , एका अधिका-याच्या डोईवर पाच विभागांचा कार्यभार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2017 05:49 IST

स्मार्ट सिटीची स्वप्ने पाहणाºया ठाणे शहरातील महापालिकेच्या प्रत्येक विभागातील अधिकारी आणि कर्मचाºयांची सेवानिवृत्ती होत असल्याने आणि रिक्त पदे भरली जात नसल्याने अनेक विभागांमध्ये एका अधिका-याकडे पाचपाच विभागांचा कार्यभार सोपवण्यात आला आहे

ठाणे : स्मार्ट सिटीची स्वप्ने पाहणाºया ठाणे शहरातील महापालिकेच्या प्रत्येक विभागातील अधिकारी आणि कर्मचाºयांची सेवानिवृत्ती होत असल्याने आणि रिक्त पदे भरली जात नसल्याने अनेक विभागांमध्ये एका अधिकाºयाकडे पाचपाच विभागांचा कार्यभार सोपवण्यात आला आहे. आजघडीला तब्बल २०८५ पदे रिक्त असल्याची माहिती उघड झाली आहे. जादा कामामुळे अधिकारीही मेटाकुटीला आले आहेत.ठाणे शहराची लोकसंख्या २२ लाखांच्या घरात गेली आहे. त्यामुळे पालिकेचा पसारा वाढला आहे. स्मार्ट सिटीच्या माध्यमातून विविध प्रकल्प राबवले जात आहेत. परंतु, या योजनांची पूर्तता करण्यासाठी अधिकाºयांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांनादेखील कामासाठी हेलपाटे घालावे लागत आहेत. काही अधिकाºयांकडे उपअभियंते, कार्यकारी अभियंते, सहायक आयुक्त, उपायुक्त यांच्यावर पाचपाच विभागांचा कार्यभार आहे. काहींना तर प्रभारी कार्यभारही सोपवला आहे.त्यातही सध्या दरमहिन्याला निवृत्त होणाºया अधिकारी, कर्मचाºयांची संख्या १५ ते २० च्या घरात असून हे असेच सुरू राहिले तर २०२० पर्यंत पालिकेतील अर्ध्याहून अधिक पदे रिक्त असतील. काही पदे भरण्यासाठी पालिकेने २०११ मध्ये शासनाकडे प्रस्ताव पाठवला आहे. परंतु, त्यावर अद्यापही निर्णय झालेला नाही. त्यामुळे आहे त्याच कर्मचारी, अधिकाºयांच्या बळावर कामे करावी लागत आहेत. तसेच काही ठिकाणी कंत्राटी स्वरूपात कर्मचारी उपलब्ध करून घेतले जात आहेत.पालिकेत मागील सात वर्षांत कर्मचारी, अधिकाºयांची २ हजार ८५ पदे रिक्त झाली. शिवाय अनेक अधिकारी, कर्मचाºयांची पदोन्नतीदेखील थांबली आहे. कर्मचारी, अधिकाºयांच्या भरती आणि प्रमोशनची नियमावली व प्रस्ताव मंजूर असला, तरी शासनाच्या आडमुठ्या धोरणामुळे त्याची अंमलबजावणी पालिकेला करता आलेली नाही. त्यामुळे कर्मचाºयांसह सहायक आयुक्त, उपायुक्त आदींसह इतर प्रमुख पदे रिक्त आहेत.महापालिकेतील कर्मचारी संघटनेने वारंवार ही बाब प्रशासनाच्या निदर्शनास आणूनही आर्थिक अडचणी आणि ढिसाळ कारभारामुळे निर्णय झालेला नाही.व्यवस्थाच होतेय खिळखिळीमहापालिकेच्या म्हणण्यानुसार काही ठिकाणी विभागीय पदोन्नती, तर काही ठिकाणी नवीन पदांची सरळसेवेने भरती करण्यात आली आहे. त्यामुळे सध्या अस्तित्वात असलेल्या कायद्यांनादेखील यामुळे पालिकेने बगल दिल्याचे बोलले जात आहे. त्यातही शासनाच्या २०११ च्या नियमानुसार एखाद्या अधिकाºयाचा अतिरिक्त कार्यभार दोन वर्षांपेक्षा अधिक काळ दिला असेल, तर त्यासाठी शासनाची पूर्वपरवानगी आवश्यक असते. परंतु, त्यालादेखील तिलांजली दिल्याचे दिसून येत आहे. एकूणच टप्प्याटप्प्याने सेवानिवृत्त होत असलेल्या अधिकारी, कर्मचाºयांमुळे पालिका येत्या काळात खिळखिळी होणार आहे.

टॅग्स :Thane Municipal Corporationठाणे महानगरपालिका