शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
3
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
4
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
5
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
6
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
7
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
8
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
9
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
10
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
11
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
12
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
13
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
14
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
15
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
16
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
17
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
18
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
19
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
20
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती

स्मार्टच्या कामांसह सीसीटीव्हीवरून ठामप-केडीएमसीची झाडाझडती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2021 04:51 IST

ठाणे : ठाणे महापालिकेने दिवा परिसरात स्मार्ट सिटीतून एकही काम न घेतल्याबद्दल आणि कल्याण-डोंबिवली महापालिकेने स्मार्ट सिटी योजनेतून ...

ठाणे : ठाणे महापालिकेने दिवा परिसरात स्मार्ट सिटीतून एकही काम न घेतल्याबद्दल आणि कल्याण-डोंबिवली महापालिकेने स्मार्ट सिटी योजनेतून १४८ कोटी रुपयांच्या सीसीटीव्हींच्या दर्जाहीन कामाबद्दल बुधवारी दिशा समितीच्या बैठकीत केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी संताप व्यक्त करून प्रशासनाची झाडाझडती घेतली.

स्मार्ट सिटी योजनेतून कल्याण-डोंबिवली महापालिकेने आतापर्यंत ७५३ ठिकाणी सीसीटीव्ही बसविल्याची माहिती बैठकीत देण्यात आली. परंतु, त्यांचा जनतेला काय फायदा झाला, असा प्रश्न पाटील यांनी केला. त्यावेळी पूर नियंत्रण व गुन्हेगारी नियंत्रणासाठी फायदा झाल्याचा दावा आयुक्त विजय सूर्यवंशी यांनी केला. मात्र, त्याची ठोस आकडेवारी अधिकारी देऊ शकले नाहीत. २७ गावांच्या परिसरात सीसीटीव्ही बसवले नसल्याचे बैठकीत उघड झाले. त्यावेळी केंद्र सरकारने जनतेचाच पैसा स्मार्ट सिटी योजनेसाठी उपलब्ध केला. गावे वगळली म्हणून सीसीटीव्हींचे काम थांबवू नये, असे पाटील म्हणाले. त्यावेळी पुन्हा सर्वेक्षण करणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितल्यावर त्यांनी डीपीआरनुसार महिनाभरात सीसीटीव्ही बसविण्याची सूचना केली.

त्याचबरोबर ठाणे महापालिकेने स्मार्ट सिटी योजनेतून दिवा परिसरात कोणतीही कामे न केल्याबद्दल तीव्र संताप व्यक्त करून सापत्न वागणुकीबद्दल प्रशासनाला खडेबोल सुनावले.

केंद्र सरकारच्या योजनांमधून दिव्यांगांना लाभ मिळवून देण्यासाठी लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत तालुका स्तरावर शिबिरे भरवावीत, मुंबई-ठाण्यातील जनतेची भाजीपाला-फळांची गरज ठाणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांमार्फत भागविण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व यंत्रणांशी समन्वय साधून समिती बनवावी, कोईम्बतूर भात बियाण्यांचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांना उत्पादनाच्या किमतीएवढी भरपाई देण्याचा प्रयत्न करावा, ट्रान्सफॉर्मरमध्ये बिघाड झालेल्या गावात तत्काळ ट्रान्सफॉर्मर पोहोचवावा, शालेय पोषण आहारात निकृष्ट दर्जाचा तांदूळ पुरविणाऱ्या ठेकेदाराला बिल अदा करू नये, आदी सूचनाही पाटील यांनी सरकारी यंत्रणांना केल्या.