शहरं
Join us  
Trending Stories
1
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
2
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
3
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
4
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
5
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
6
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
7
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
8
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
9
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
10
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
11
काश्मीरमध्ये ‘चिल्ला-ए-कलां’ प्रारंभ; प्रचंड थंडीच्या मोसमाची सुरुवात
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यात सौरऊर्जेवरील रिक्षेला सुरूवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2018 02:42 IST

ठाणे महापालिकेने सौरऊर्जेवर धावणा-या रिक्षाला प्राधान्य दिले असून महिला बालकल्याण तसेच इतर योजनांच्या माध्यमातून गरजू नागरिकांना व्यवसायासाठी यापुढे सौरऊर्जेवर चालणारी रिक्षा उपलब्ध करून दिली जाणार आहे.

ठाणे : ठाणे महापालिकेने सौरऊर्जेवर धावणा-या रिक्षाला प्राधान्य दिले असून महिला बालकल्याण तसेच इतर योजनांच्या माध्यमातून गरजू नागरिकांना व्यवसायासाठी यापुढे सौरऊर्जेवर चालणारी रिक्षा उपलब्ध करून दिली जाणार आहे. पर्यावरणातील घातक वायू कमी करणे, हा या उपक्रमाचा उद्देश असल्याचे पालिकेच्या अधिकाºयांनी सांगितले. सोमवारी अतिरिक्त आयुक्त सुनील चव्हाण यांनी या उपक्र माचा शुभारंभ केला.पर्यावरणसंवर्धनासाठी ठाणे महापालिकेच्या वतीने विविध प्रकारचे उपक्र म राबवण्यात येत आहे. सौरऊर्जेवर चालणारी रिक्षा हा देखील या उपक्र माचा महत्त्वाचा भाग आहे. यासाठीच ही सौरऊर्जेवर चालणारी रिक्षा महापालिकेने प्रायोगिक तत्त्वावर घेतली आहे. संपूर्ण सौरऊर्जेवर चालणाºया या रिक्षामध्ये चार प्रकारच्या बॅटºया आहेत. संपूर्ण आठ तास बॅटरी चार्ज केल्यानंतर ४८ तासांनी ऊर्जा तयार होते. रिक्षा संपूर्ण चार्ज केल्यानंतर कमीतकमी १०० किमीचे अंतर कापता येते. कोणत्याही प्रकारचे इंधन यामध्ये नसल्याने यावर कोणत्या प्रकारचा करदेखील लागणार नाही. केवळ एकदा रजिस्ट्रेशन करावे लागणार आहे. या रिक्षाची किंमत एक लाख ८० हजारांपर्यंत असून महिला बालकल्याणच्या माध्यमातून तसेच इतर योजनांच्या माध्यमातून ज्यांना व्यवसाय करण्याची इच्छा आहे, अशा सर्व नागरिकांसाठी रिक्षा घेण्यासाठी कर्ज उपलब्ध करून दिले जाणार आहे.यापूर्वी महापालिकेच्या योजनांमधून नागरिकांना व्यवसाय करण्यासाठी पेट्रोल किंवा डिझेलच्या रिक्षा उपलब्ध करून दिल्या जात होत्या. मात्र, आता पुढचे पाऊल म्हणून पर्यावरणाचे संवर्धन करणे, हा या उपक्र मामागचा मुख्य उद्देश असल्याने व्यवसायासाठी अशा प्रकारच्या रिक्षा घेण्यासाठी नागरिकांना प्रवृत्त केले जाणार असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त सुनील चव्हाण यांनी दिली.लोकप्रतिनिधींनीदेखील या उपक्र माचे स्वागत केले असून अशा प्रकारचा उपक्र म पर्यावरणाच्या संवर्धनासाठी महत्त्वाचा असल्याचे शिवसेनेच्या नगरसेविका मालती पाटील यांनी सांगितले. ठाण्यामध्ये हा उपक्र म यशस्वी करण्यासाठी पालिका प्रशासन तर प्रयत्न करेलच, मात्र हा उपक्र म अधिक यशस्वी करण्यासाठी नागरिकांनादेखील पुढाकार घ्यायला हवा, असे पाटील यांनी सांगितले.>सौरऊर्जेवर चालणाºया या रिक्षेत चार प्रकारच्या बॅटºया आहेत. ती बॅटरी चार्ज होण्यास किमान आठ तास लागतात. पण एकदा बॅटरी चार्ज केल्यानंतर रिक्षा कमीतकमी १०० किमीचे अंतर कापते. ही रिक्षा पेट्रोल, डिझेलच्या रिक्षेपेक्षा स्वस्त पडते. एव्हढेच नव्हे, तर सीएनजीच्या रिक्षेपेक्षाही स्वस्त पडते. त्यामुळे साध्या रिक्षेच्या तुलनेत हिचे भाडे खूप कमी आहे. तसेच ती पर्र्यावरणपूरक आहे.