शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
3
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
4
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
5
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
6
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
7
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
8
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
9
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
10
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
11
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
12
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
13
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
14
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
15
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
16
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
17
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
18
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
19
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
20
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात

ठाण्यात सौरऊर्जेवरील रिक्षेला सुरूवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2018 02:42 IST

ठाणे महापालिकेने सौरऊर्जेवर धावणा-या रिक्षाला प्राधान्य दिले असून महिला बालकल्याण तसेच इतर योजनांच्या माध्यमातून गरजू नागरिकांना व्यवसायासाठी यापुढे सौरऊर्जेवर चालणारी रिक्षा उपलब्ध करून दिली जाणार आहे.

ठाणे : ठाणे महापालिकेने सौरऊर्जेवर धावणा-या रिक्षाला प्राधान्य दिले असून महिला बालकल्याण तसेच इतर योजनांच्या माध्यमातून गरजू नागरिकांना व्यवसायासाठी यापुढे सौरऊर्जेवर चालणारी रिक्षा उपलब्ध करून दिली जाणार आहे. पर्यावरणातील घातक वायू कमी करणे, हा या उपक्रमाचा उद्देश असल्याचे पालिकेच्या अधिकाºयांनी सांगितले. सोमवारी अतिरिक्त आयुक्त सुनील चव्हाण यांनी या उपक्र माचा शुभारंभ केला.पर्यावरणसंवर्धनासाठी ठाणे महापालिकेच्या वतीने विविध प्रकारचे उपक्र म राबवण्यात येत आहे. सौरऊर्जेवर चालणारी रिक्षा हा देखील या उपक्र माचा महत्त्वाचा भाग आहे. यासाठीच ही सौरऊर्जेवर चालणारी रिक्षा महापालिकेने प्रायोगिक तत्त्वावर घेतली आहे. संपूर्ण सौरऊर्जेवर चालणाºया या रिक्षामध्ये चार प्रकारच्या बॅटºया आहेत. संपूर्ण आठ तास बॅटरी चार्ज केल्यानंतर ४८ तासांनी ऊर्जा तयार होते. रिक्षा संपूर्ण चार्ज केल्यानंतर कमीतकमी १०० किमीचे अंतर कापता येते. कोणत्याही प्रकारचे इंधन यामध्ये नसल्याने यावर कोणत्या प्रकारचा करदेखील लागणार नाही. केवळ एकदा रजिस्ट्रेशन करावे लागणार आहे. या रिक्षाची किंमत एक लाख ८० हजारांपर्यंत असून महिला बालकल्याणच्या माध्यमातून तसेच इतर योजनांच्या माध्यमातून ज्यांना व्यवसाय करण्याची इच्छा आहे, अशा सर्व नागरिकांसाठी रिक्षा घेण्यासाठी कर्ज उपलब्ध करून दिले जाणार आहे.यापूर्वी महापालिकेच्या योजनांमधून नागरिकांना व्यवसाय करण्यासाठी पेट्रोल किंवा डिझेलच्या रिक्षा उपलब्ध करून दिल्या जात होत्या. मात्र, आता पुढचे पाऊल म्हणून पर्यावरणाचे संवर्धन करणे, हा या उपक्र मामागचा मुख्य उद्देश असल्याने व्यवसायासाठी अशा प्रकारच्या रिक्षा घेण्यासाठी नागरिकांना प्रवृत्त केले जाणार असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त सुनील चव्हाण यांनी दिली.लोकप्रतिनिधींनीदेखील या उपक्र माचे स्वागत केले असून अशा प्रकारचा उपक्र म पर्यावरणाच्या संवर्धनासाठी महत्त्वाचा असल्याचे शिवसेनेच्या नगरसेविका मालती पाटील यांनी सांगितले. ठाण्यामध्ये हा उपक्र म यशस्वी करण्यासाठी पालिका प्रशासन तर प्रयत्न करेलच, मात्र हा उपक्र म अधिक यशस्वी करण्यासाठी नागरिकांनादेखील पुढाकार घ्यायला हवा, असे पाटील यांनी सांगितले.>सौरऊर्जेवर चालणाºया या रिक्षेत चार प्रकारच्या बॅटºया आहेत. ती बॅटरी चार्ज होण्यास किमान आठ तास लागतात. पण एकदा बॅटरी चार्ज केल्यानंतर रिक्षा कमीतकमी १०० किमीचे अंतर कापते. ही रिक्षा पेट्रोल, डिझेलच्या रिक्षेपेक्षा स्वस्त पडते. एव्हढेच नव्हे, तर सीएनजीच्या रिक्षेपेक्षाही स्वस्त पडते. त्यामुळे साध्या रिक्षेच्या तुलनेत हिचे भाडे खूप कमी आहे. तसेच ती पर्र्यावरणपूरक आहे.