शहरं
Join us  
Trending Stories
1
Monorail Mumbai: मोनो रेल्वे पुन्हा बंद पडली, भर पावसात प्रवाशांना काढले बाहेर
2
Maharashtra Rain: आजचा दिवस पावसाचा, संपूर्ण महाराष्ट्राला झोडपणार; चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
3
४० हजार एन्ट्री फी, अख्खी रात्र 'Nude Party'; विना कपडे येणार होते २१ मुले-मुली, आयोजकांना अटक
4
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
5
सकाळपासून ते रात्री झोपेपर्यंतच्या सर्व उत्पादनांवर जीएसटी सवलत मिळणार; निर्मला सीतारामण यांचा दावा
6
आजचे राशीभविष्य- १५ सप्टेंबर २०२५: रागावर नियंत्रण ठेवा, कुटुंबियांशी वादविवाद टाळावेत!
7
‘जिल्हा परिषदां’ना बळ मिळेल? पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा होता
8
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक
9
मी शिवभक्त, विष गिळून टाकतो, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; काँग्रेसने घुसखोरांना प्रोत्साहन दिले, गरिबांना नाकारले
10
महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान
11
पूजा खेडकरांच्या घरातून अपहृत चालकाची सुटका; ऐरोलीत अपघात, कारमध्ये कोंबून नेले पुण्याला
12
मोबाइलमध्ये अडकलेली तरुणाई सरस्वतीच्या दरबारात नेणार : विश्वास पाटील
13
प्रभादेवी तिकीट कार्यालयाचे स्थलांतर कुठे? २ ते ३ दिवसांमध्ये जागा निश्चित करणार
14
बांधकामातील बदल, कराने वाढला कोस्टल रोडचा खर्च; महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यात २ हजार कोटींची वाढ
15
नेपाळच्या आगीत कोण आपली पोळी भाजते आहे?
16
साहित्य संमेलनाध्यक्षपदी ‘पानिपत’कार विश्वास पाटील ; १ ते ४ जानेवारीदरम्यान संमेलन होणार
17
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
18
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
19
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”

ठाण्यात बोटाला शाई लागलीच नाही

By admin | Updated: November 17, 2016 06:48 IST

नोटबंदीनंतर एकाच दिवसात वारंवार पैसे बदलण्यासाठी येणाऱ्या नागरिकांवर अंकुश बसावा, म्हणून शासनाने बोटाला शाई लावण्याचा निर्णय

ठाणे : नोटबंदीनंतर एकाच दिवसात वारंवार पैसे बदलण्यासाठी येणाऱ्या नागरिकांवर अंकुश बसावा, म्हणून शासनाने बोटाला शाई लावण्याचा निर्णय घेतला आहे. त्याची सुरुवात बुधवारपासून झाली आहे. परंतु ठाण्यात मात्र बोटाला शाई लागलीच नसल्याचे दिसून आले आहे. यासंदर्भात अद्याप कोणतेही निर्देश येथील बँकांना प्राप्त झाले नसून शाई कोण देणार, असा सवालही बँकांनी केला आहे.रद्द झालेल्या ५०० आणि एक हजार रुपयांच्या नोटा बदलून घेण्यासाठी येणाऱ्यांच्या बोटाला मतदानाच्या वेळी लावतात तशी शाई लावण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. यामध्ये प्रामुख्याने रोजंदारीवर लोकांना कामाला ठेवून ४५०० रुपये याप्रमाणे मोठ्या प्रमाणावर नोटा बदलून घेण्याची काळ्या पैसेवाल्यांनी शोधलेली पळवाट बंद करणे, बँकांच्या बाहेर लागणाऱ्या रांगा कमी करणे, असा यामागचा शासनाचा हेतू आहे. त्यानुसार, याची अंमलबजावणी बुधवारपासून सुरू झाली आहे. परंतु, ठाण्यात मात्र त्यानुसार कार्यवाही होताना दिसून आली नाही. नागरिक नेहमीप्रमाणे बँकांमध्ये रांगेत उभे राहून नोटा बदलून घेत होते. दरम्यान, यासंदर्भात ठाण्यातील काही बँक व्यवस्थापकांशी चर्चा केली असता त्यांनी सांगितले, याबाबत अद्याप कोणतेही निर्देश बँकेला प्राप्त झालेले नाहीत. तसेच ही शाई उपलब्ध कोण करून देणार, असा सवालही त्यांनी केला आहे. रोज शेकडो नागरिक रांगेत उभे असतात. त्यामुळे त्यांच्या बोटाला लागणारी शाई उपलब्ध कशी करून द्यायची आणि त्यासाठी पुन्हा लागणारा कर्मचारीवर्ग आणायचा कुठून, असे अनेक प्रश्न बँकांना पडले. यामुळे ठाण्यात पहिल्या दिवशी बोटाला शाई लागली नाही. (प्रतिनिधी)