शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

तृतीयपंथी वर्ग समाजाने निर्माण केला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2021 04:36 IST

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : शरीररचनेत होणाऱ्या विषम बदलास तृतीयपंथी म्हणतात. तृतीयपंथी निसर्गाने नव्हे समाजाने निर्माण केला. तृतीयपंथीयांबद्दलची समाजमनातील ...

लोकमत न्यूज नेटवर्क

ठाणे : शरीररचनेत होणाऱ्या विषम बदलास तृतीयपंथी म्हणतात. तृतीयपंथी निसर्गाने नव्हे समाजाने निर्माण केला. तृतीयपंथीयांबद्दलची समाजमनातील विषम भावना मुळासकट नष्ट व्हायला हवी, असे प्रतिपादन एलजीबीटी समुदायाच्या मूलभूत हक्कांसाठी काम करणाऱ्या बिराजा यांनी शनिवारी केले.

सतीश प्रधान ज्ञानसाधना महाविद्यालयातील ‘बिईंग मी’ समिती कार्यरत आहे. बिईंग मीने आयोजित केलेल्या ‘अवेअरनेस अबाउट लाइफ ऑफ थर्ड जेंडर’ या कार्यक्रमात तृतीयपंथीयांसाठी हळदी-कुंकवाचा कार्यक्रम स्वत:च्या घरी आयोजित करणाऱ्या पत्रकार प्रज्ञा म्हात्रे यांच्याशी सुसंवाद साधल्याने आम्हाला निश्चित दिशा मिळाल्याचे ‘बिईंग मी’ च्या समन्वयक व उपप्राचार्य डॉ. मृणाल बकाणे यांनी सांगितले. उपप्राचार्य डॉ. संज्योक्त देऊस्कर यांनी बिईंग मी समितीची आजवरची वाटचाल व भविष्यातील कार्यक्रमांबद्दल सविस्तर माहिती दिली. या आभासी मंचावरील कार्यक्रमात ऑक्सफाम इंडिया या स्वयंसेवी संस्थेत प्रचारक म्हणून काम करणाऱ्या अक्षय तरफे व बिराजा यांनी समाजाकडून एलजीबीटी समुदायाच्या काय अपेक्षा आहेत, त्यासंदर्भात आपले मत मांडले.

आपल्या सादरीकरणात तरफे यांनी केरळसह काही राज्यांतील तृतीयपंथीयांवर होणारा अन्याय, सुखी जीवनासाठी आवश्यक शिक्षण व रोजगार या क्षेत्रात त्यांची होणारी उपेक्षा प्रखरतेने मांडली. सार्वजनिक ठिकाणी तृतीयपंथीयांसाठी प्रसाधनगृहे नाहीत, शासकीय कार्यालयांमधील विविध अर्ज तसेच, शाळा-महाविद्यालयांच्या प्रवेश अर्जांवर लिंगविषयक रकान्यामध्ये त्यांना स्थान नाही, हे अत्यंत खेदजनक आहे, अशा शब्दांत तरफे यांनी नाराजी व्यक्त केली. एक माणूस म्हणून आम्हालाही सर्वसामान्यांसारखी वागणूक का मिळू नये? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. बिराजा म्हणाल्या की, सर्व तृतीयपंथी हे सर्वसामान्य नागरिकच असून, आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदान कार्ड, इतर आवश्यक कागदपत्रे व आवश्यक मूलभूत सुविधा त्यांना मिळणे एक माणूस म्हणून त्यांचाही अधिकार आहे.

कार्यक्रमाला ज्ञानसाधना ठाणे, संस्थेचे सचिव कमलेश प्रधान, सहसचिव मानसी प्रधान, प्राचार्य डॉ. हेमंत चित्ते यांचे मार्गदर्शन लाभले.

...........

वाचली