शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

उल्हासनगरातील भीषण घटना, मद्यधुंद कार चालकांच्या धडकेत तिघांचा मृत्यू, ३ जखमी, चालकाला अटक

By सदानंद नाईक | Updated: December 18, 2023 16:27 IST

कल्याण रेल्वे स्टेशनवरून जाणा हा मावशीसह जावेद सय्यद यांच्या ओला रिक्षाने कॅम्प नं-४ येथील घरी येत होता. त्यावेळी शांतीनगर येथे एका भरधाव कारने ओला रिक्षासह अन्य एका रिक्षासह काही कारला जोरदार धडक दिली.

उल्हासनगर : कॅम्प नं-३, शांतीनगर परिसरातील रेमंड दुकानाच्या समोर सोमवारी पहाटे ५ वाजता मद्यधुंद कार चालकांच्या धडकेत ओला रिक्षातील २ तर एक रिक्षा चालक असे एकून ३ जणांचा मृत्यू झाला. तर ३ जण जखमी झाले. मध्यवर्ती पोलीसांनी कारचालक लवेश कमलेश केवळरामानी याला अटक करून गुन्हा दाखल केला. 

उल्हासनगर शांतीनगर येथील कल्याण-अंबरनाथ मुख्य रस्त्यावर रेमण्ड दुकांना समोर सोमवारी पहाटे ५ वाजता मद्यधुंद कार चालक लवेश केवलरामानी यांच्या कारची दोन रिक्षासह काही कारला जोरदार धडक दिली. या अपघातात ओला रिक्षातील सामुदीप सुकुमार जाणा वय-३३, अंजली जाणा वय-६१ व दुसऱ्या रिक्षाचा रिक्षाचालक संभु रामअवध चौहान यांचा जागीच मृत्यू झाला. ओला रिक्षाचा चालक जावेद जफर सय्यद यांच्यासह महेंद्र भारत पांढरे व प्रमोद दौड जखमी झाले असून त्यांच्यावर मध्यवर्ती रुग्णालयात उपचार सुरू आहे. मृत सोमुदीप जाणा हा सकाळी कलकत्त्यावरून मावशी अंजली जाणा हिला घेऊन आला होता. 

कल्याण रेल्वे स्टेशनवरून जाणा हा मावशीसह जावेद सय्यद यांच्या ओला रिक्षाने कॅम्प नं-४ येथील घरी येत होता. त्यावेळी शांतीनगर येथे एका भरधाव कारने ओला रिक्षासह अन्य एका रिक्षासह काही कारला जोरदार धडक दिली. यामध्ये संभु चौहान या रिक्षाचालकांचा जागीच मृत्यू झाला असून तो कॅम्प नं-४ येथील पेन्सिल फॅक्टरी परिसरात राहणारा आहे. अपघात झाल्यानंतर कारचालक लवेश केवळरामानी हा पळून गेला होता. तर त्याच्या एका मित्राने अपघातग्रस्त कार मधून एक थैली व दारूच्या बॉटल घेऊन गेल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला. त्यानंतर पोलिसांनी कार मधून साहित्य नेणाऱ्यालाही पोलीस ठाण्यात बोलावून घेतले. कारचालक लवेश केवलरामानी याला पोलिसांनी अटक केली असून तो जखमी झाला आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.

टॅग्स :Accidentअपघात