शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

उल्हासनगरातील भीषण घटना, मद्यधुंद कार चालकांच्या धडकेत तिघांचा मृत्यू, ३ जखमी, चालकाला अटक

By सदानंद नाईक | Updated: December 18, 2023 16:27 IST

कल्याण रेल्वे स्टेशनवरून जाणा हा मावशीसह जावेद सय्यद यांच्या ओला रिक्षाने कॅम्प नं-४ येथील घरी येत होता. त्यावेळी शांतीनगर येथे एका भरधाव कारने ओला रिक्षासह अन्य एका रिक्षासह काही कारला जोरदार धडक दिली.

उल्हासनगर : कॅम्प नं-३, शांतीनगर परिसरातील रेमंड दुकानाच्या समोर सोमवारी पहाटे ५ वाजता मद्यधुंद कार चालकांच्या धडकेत ओला रिक्षातील २ तर एक रिक्षा चालक असे एकून ३ जणांचा मृत्यू झाला. तर ३ जण जखमी झाले. मध्यवर्ती पोलीसांनी कारचालक लवेश कमलेश केवळरामानी याला अटक करून गुन्हा दाखल केला. 

उल्हासनगर शांतीनगर येथील कल्याण-अंबरनाथ मुख्य रस्त्यावर रेमण्ड दुकांना समोर सोमवारी पहाटे ५ वाजता मद्यधुंद कार चालक लवेश केवलरामानी यांच्या कारची दोन रिक्षासह काही कारला जोरदार धडक दिली. या अपघातात ओला रिक्षातील सामुदीप सुकुमार जाणा वय-३३, अंजली जाणा वय-६१ व दुसऱ्या रिक्षाचा रिक्षाचालक संभु रामअवध चौहान यांचा जागीच मृत्यू झाला. ओला रिक्षाचा चालक जावेद जफर सय्यद यांच्यासह महेंद्र भारत पांढरे व प्रमोद दौड जखमी झाले असून त्यांच्यावर मध्यवर्ती रुग्णालयात उपचार सुरू आहे. मृत सोमुदीप जाणा हा सकाळी कलकत्त्यावरून मावशी अंजली जाणा हिला घेऊन आला होता. 

कल्याण रेल्वे स्टेशनवरून जाणा हा मावशीसह जावेद सय्यद यांच्या ओला रिक्षाने कॅम्प नं-४ येथील घरी येत होता. त्यावेळी शांतीनगर येथे एका भरधाव कारने ओला रिक्षासह अन्य एका रिक्षासह काही कारला जोरदार धडक दिली. यामध्ये संभु चौहान या रिक्षाचालकांचा जागीच मृत्यू झाला असून तो कॅम्प नं-४ येथील पेन्सिल फॅक्टरी परिसरात राहणारा आहे. अपघात झाल्यानंतर कारचालक लवेश केवळरामानी हा पळून गेला होता. तर त्याच्या एका मित्राने अपघातग्रस्त कार मधून एक थैली व दारूच्या बॉटल घेऊन गेल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला. त्यानंतर पोलिसांनी कार मधून साहित्य नेणाऱ्यालाही पोलीस ठाण्यात बोलावून घेतले. कारचालक लवेश केवलरामानी याला पोलिसांनी अटक केली असून तो जखमी झाला आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.

टॅग्स :Accidentअपघात