शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

केडीएमसीच्या १८ गावांतील नगरसेवकांवर मुदतीपूर्वीच गंडांतर? गावे वगळल्याने होणार कृती

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2020 02:22 IST

केडीएमसीतील २७ गावांमधून वगळलेल्या १८ गावांची कल्याण उपनगर परिषद स्थापन करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.

- प्रशांत मानेकल्याण : केडीएमसीतील २७ गावांमधून वगळलेल्या १८ गावांची कल्याण उपनगर परिषद स्थापन करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असतानाच आता या गावांतील १३ नगरसेवकांचे पदही मुदतीपूर्वीच बाद होणार आहे. जुलै २००२ ची पुनरावृत्ती होणार असल्याचा दावा तज्ज्ञांकडून केला जात असताना नगरसेवकपद रद्द करण्याच्या प्रक्रियेला केडीएमसीमधील निवडणूक विभागानेही सुरुवात केल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. दरम्यान, संबंधित विभागाने सध्या तरी याबाबत चुप्पी साधली आहे.केडीएमसीतील २७ गावांमधून वगळलेल्या १८ गावांची कल्याण उपनगर परिषद स्थापन करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्यानंतर, केडीएमसीत राहिलेल्या नऊ गावांसह महापालिकेच्या बदललेल्या हद्दीसह अधिसूचनाही सरकारने नुकतीच जाहीर केली आहे. निवडणुकीची पूर्वतयारी सुरू करा, असे आदेश राज्य निवडणूक आयोगाने आधीच दिले आहेत. त्यामुळे केडीएमसीच्या निवडणूक विभागाने कामकाजाला सुरुवात केली आहे. महापालिकेतील नगरसेवकांचे सदस्यत्व ११ नोव्हेंबरला संपुष्टात येत आहे. परंतु, कोरोनामुळे केडीएमसीची निवडणूक लांबणीवर पडण्याचा अंदाज आहे. त्यामुळे ११ नोव्हेंबरनंतर काही महिने प्रशासकीय राजवट लागू होण्याची शक्यताही तज्ज्ञांकडून व्यक्त होत आहे.दरम्यान, १८ गावांची कल्याण उपनगर परिषद स्थापन होणार असल्याने या गावांमधील नगरसेवकांचे पद ११ नोव्हेंबरच्या मुदतीपूर्वीच बाद होणार आहे. १२ जुलै २००२ ला २७ गावे केडीएमसीतून वगळण्यात आली होती. त्यावेळी एमआयडीसीतील आजदे गावचे महसूल क्षेत्र पूर्णपणे महापालिकेतून वगळण्यात आले होते. तेव्हा प्रभाग क्रमांक ६६ चे एमआयडीसीचे तत्कालीन नगरसेवक भालचंद्र म्हात्रे यांचे नगरसेवकपद बाद झाले होते.महापालिका आयुक्तांच्या या निर्णयाविरोधात म्हात्रे यांनी उच्च न्यायालयातही धाव घेतली होती. परंतु, त्यांना दिलासा मिळाला नाही. हीच प्रक्रिया आता पुन्हा राबविली जाणार असल्याने १८ गावांतील नगरसेवकांचे पदही आता बाद होणार असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. दरम्यान, याबाबत भाष्य करण्यास महापालिकेच्या निवडणूक विभागाने नकार दिला आहे.या गावांमधील नगरसेवक होणार बादघेसर, हेदुटणे, उंब्रोली, भाल, द्वारली, माणोरे, वसार, आशेळे, नांदिवली तर्फे अंबरनाथ, आडिवली-ढोकळी, दावडी, चिंचपाडा, पिसवली, गोळिवली, माणगाव, निळजे, सोनारपाडा, कोळे या गावांमधील लोकप्रतिनिधींचे नगरसेवकपद मुदतीपूर्वीच बाद होणार आहेत.

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिका