शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

भाईंदरच्या धारावी किल्ल्यावरील विजयोत्सव पाहून आनंदित झाले पेशव्यांचे दहावे वंशज 

By धीरज परब | Updated: March 7, 2023 19:20 IST

पेशव्यांचा श्लोक म्हणत आपला आनंद व्यक्त केला. 

लोकमत न्यूज नेटवर्क, मीरारोड - भाईंदरच्या चौक येथील धारावी किल्ल्यावर महापालिकेने साजरा केलेला विजयोत्सवचा कार्यक्रम, नरवीर चिमाजी अप्पा यांचा अश्वारूढ पुतळा व किल्ल्याचा परिसर पाहून पहिल्यांदाच या ठिकाणी आलेले पेशव्यांचे दहावे वंशज पुष्करसिंह पेशवा आनंदित झाले . यावेळी त्यांनी पेशव्यांचा श्लोक म्हणत आपला आनंद व्यक्त केला . 

वसईच्या किल्ल्यावर नजर ठेवण्यासह त्यांची समुद्र मार्गे येणारी रसद तोडणे  व पोर्तुगीजांच्या ताब्यातून वसई किल्ला जिंकण्यासाठी खाडी पलीकडे भाईंदरच्या चौक डोंगरावरील धारावी किल्ला हाती येणे आवश्यक होते . धारावी किल्ला जिंकण्यासाठी मराठ्यांनी ८ वेळा प्रयत्न केला होता . नवव्या वेळी म्हणजेच ६ मार्च १७३९ रोजी धारावी किल्ला नरवीर चिमाजी अप्पा यांनी पोर्तुगीजांना पराभवाची धूळ चारून मराठा साम्राज्यात आणला होता . ६ मार्च हा विजय दिन म्हणून साजरा करण्याचा आग्रह गडप्रेमीं कडून होत होता . यंदा त्याला २८४ वर्ष झाली. 

महापालिका आयुक्त दिलीप ढोले यांनी हा विजय दिन महापालिके मार्फत साजरा करण्याचा निर्णय घेतला . त्या अनुषंगाने पालिकेने संपूर्ण किल्ल्यावर आकर्षक अशी विद्युत रोषणाई व फुलांची सजावट केली होती.  पुष्करसिंह पेशवा यांच्या हस्ते धारावी देवी मंदिरात आरती व दर्शनाने कार्यक्रमाची सुरवात केली गेली . चिमाजी अप्पा यांच्या अश्वारूढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मानवंदना देण्यात आली . यावेळी  पेशव्यांसह आयुक्त दिलीप ढोले , आमदार गीता जैन , शहीद मेजर कौस्तुभ राणे यांच्या आई ज्योती व वडील प्रकाश, सहाय्यक पोलीस आयुक्त शांतीलाल जाधव, माजी उपमहापौर हसमुख गेहलोत आदी उपस्थित होते . 

महापालिकेच्या काशी , माशाचा पाडा , मुर्धे , मोरवा व भाईंदर पश्चिम ह्या ५ शाळां मधील विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेशात चिमाजी अप्पा स्मारक पासून किल्ल्याच्या बुरुज पर्यंत मिरवणूक काढली . विद्यार्थ्यांनी लेझीमच्या तालात हि फेरी काढली . यावेळी त्यांनी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते . पुष्करसिंह यांनी सांगितले कि , आपण कोकणात अनेक ठिकाणी फिरलो मात्र इकडे कधी आलो नाही याचे मला आश्चर्य वाटते. चिमाजी अप्पा यांच्या  स्मृतींचे इतके सुंदर जतन करत आला आहेत त्याचा आनंद वाटतो . त्यांनी पेशव्यांचा श्लोक म्हणून दाखवत तो श्रीवर्धनच्या लक्ष्मी नारायण मंदिर मागे लिहून ठेवला आहे व चिमाजी अप्पा त्याच मातीतले होते असे सांगितले . 

धारावी किल्ल्याच्या संवर्धन आणि जतन साठी राज्य शासनाने १० कोटी तर महापालिकेने ३ कोटींची तरतूद केली आहे . महापालिकेने चिमाजी अप्पा यांचे स्मारक व उद्यान विकसित केले आहे . किल्ला परिसरचे ऐतिहासिक पावित्र्य जपत त्याचे महत्व नागरिकांना होण्यासाठी पालिका विविध उपक्रम व कामे करत असल्याचे आयुक्त ढोले यांनी सांगितले . 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Mira Bhayander Municipal Corporationमीरा-भाईंदर महापालिका निवडणुक