शहरं
Join us  
Trending Stories
1
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
2
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
3
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
4
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
5
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
6
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
7
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
8
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
9
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
10
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
11
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
12
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
13
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
14
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
15
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
16
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
17
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल
18
ना धक्का.. ना धोका! वनडे वर्ल्ड कप पर्यंत रोहितची कॅप्टन्सी सेफ? BCCI नव्हे तर ICC नं दिली हिंट
19
दिलीप प्रभावळकर यांना 'लगे रहो मुन्नाभाई'मध्ये अशी मिळाली महात्मा गांधींची भूमिका, म्हणाले...
20
सिक्स सेन्स? आतड्यातील बॅक्टेरिया थेट मेंदूशी साधतात संवाद; रिसर्चमध्ये आश्चर्यकारक खुलासा

भाईंदरच्या धारावी किल्ल्यावरील विजयोत्सव पाहून आनंदित झाले पेशव्यांचे दहावे वंशज 

By धीरज परब | Updated: March 7, 2023 19:20 IST

पेशव्यांचा श्लोक म्हणत आपला आनंद व्यक्त केला. 

लोकमत न्यूज नेटवर्क, मीरारोड - भाईंदरच्या चौक येथील धारावी किल्ल्यावर महापालिकेने साजरा केलेला विजयोत्सवचा कार्यक्रम, नरवीर चिमाजी अप्पा यांचा अश्वारूढ पुतळा व किल्ल्याचा परिसर पाहून पहिल्यांदाच या ठिकाणी आलेले पेशव्यांचे दहावे वंशज पुष्करसिंह पेशवा आनंदित झाले . यावेळी त्यांनी पेशव्यांचा श्लोक म्हणत आपला आनंद व्यक्त केला . 

वसईच्या किल्ल्यावर नजर ठेवण्यासह त्यांची समुद्र मार्गे येणारी रसद तोडणे  व पोर्तुगीजांच्या ताब्यातून वसई किल्ला जिंकण्यासाठी खाडी पलीकडे भाईंदरच्या चौक डोंगरावरील धारावी किल्ला हाती येणे आवश्यक होते . धारावी किल्ला जिंकण्यासाठी मराठ्यांनी ८ वेळा प्रयत्न केला होता . नवव्या वेळी म्हणजेच ६ मार्च १७३९ रोजी धारावी किल्ला नरवीर चिमाजी अप्पा यांनी पोर्तुगीजांना पराभवाची धूळ चारून मराठा साम्राज्यात आणला होता . ६ मार्च हा विजय दिन म्हणून साजरा करण्याचा आग्रह गडप्रेमीं कडून होत होता . यंदा त्याला २८४ वर्ष झाली. 

महापालिका आयुक्त दिलीप ढोले यांनी हा विजय दिन महापालिके मार्फत साजरा करण्याचा निर्णय घेतला . त्या अनुषंगाने पालिकेने संपूर्ण किल्ल्यावर आकर्षक अशी विद्युत रोषणाई व फुलांची सजावट केली होती.  पुष्करसिंह पेशवा यांच्या हस्ते धारावी देवी मंदिरात आरती व दर्शनाने कार्यक्रमाची सुरवात केली गेली . चिमाजी अप्पा यांच्या अश्वारूढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मानवंदना देण्यात आली . यावेळी  पेशव्यांसह आयुक्त दिलीप ढोले , आमदार गीता जैन , शहीद मेजर कौस्तुभ राणे यांच्या आई ज्योती व वडील प्रकाश, सहाय्यक पोलीस आयुक्त शांतीलाल जाधव, माजी उपमहापौर हसमुख गेहलोत आदी उपस्थित होते . 

महापालिकेच्या काशी , माशाचा पाडा , मुर्धे , मोरवा व भाईंदर पश्चिम ह्या ५ शाळां मधील विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेशात चिमाजी अप्पा स्मारक पासून किल्ल्याच्या बुरुज पर्यंत मिरवणूक काढली . विद्यार्थ्यांनी लेझीमच्या तालात हि फेरी काढली . यावेळी त्यांनी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते . पुष्करसिंह यांनी सांगितले कि , आपण कोकणात अनेक ठिकाणी फिरलो मात्र इकडे कधी आलो नाही याचे मला आश्चर्य वाटते. चिमाजी अप्पा यांच्या  स्मृतींचे इतके सुंदर जतन करत आला आहेत त्याचा आनंद वाटतो . त्यांनी पेशव्यांचा श्लोक म्हणून दाखवत तो श्रीवर्धनच्या लक्ष्मी नारायण मंदिर मागे लिहून ठेवला आहे व चिमाजी अप्पा त्याच मातीतले होते असे सांगितले . 

धारावी किल्ल्याच्या संवर्धन आणि जतन साठी राज्य शासनाने १० कोटी तर महापालिकेने ३ कोटींची तरतूद केली आहे . महापालिकेने चिमाजी अप्पा यांचे स्मारक व उद्यान विकसित केले आहे . किल्ला परिसरचे ऐतिहासिक पावित्र्य जपत त्याचे महत्व नागरिकांना होण्यासाठी पालिका विविध उपक्रम व कामे करत असल्याचे आयुक्त ढोले यांनी सांगितले . 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Mira Bhayander Municipal Corporationमीरा-भाईंदर महापालिका निवडणुक