शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
2
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त
3
चांदी दीड लाख रूपये किलो, सप्टेंबरमध्ये २१,५२७ रुपयांची झेप; सोन्याचीही ११ हजारांची उडी
4
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
5
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
6
पंतप्रधान मोदी करणार ‘मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ कार्यक्रमाचे उद्घाटन
7
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
8
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
9
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
10
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
11
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
12
अंधेरी क्रीडा संकुल महापालिकेने स्वतः उभारावे; गोपाळ शेट्टी यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
13
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
14
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
15
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
16
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
17
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
18
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
19
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
20
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?

भाईंदरच्या धारावी किल्ल्यावरील विजयोत्सव पाहून आनंदित झाले पेशव्यांचे दहावे वंशज 

By धीरज परब | Updated: March 7, 2023 19:20 IST

पेशव्यांचा श्लोक म्हणत आपला आनंद व्यक्त केला. 

लोकमत न्यूज नेटवर्क, मीरारोड - भाईंदरच्या चौक येथील धारावी किल्ल्यावर महापालिकेने साजरा केलेला विजयोत्सवचा कार्यक्रम, नरवीर चिमाजी अप्पा यांचा अश्वारूढ पुतळा व किल्ल्याचा परिसर पाहून पहिल्यांदाच या ठिकाणी आलेले पेशव्यांचे दहावे वंशज पुष्करसिंह पेशवा आनंदित झाले . यावेळी त्यांनी पेशव्यांचा श्लोक म्हणत आपला आनंद व्यक्त केला . 

वसईच्या किल्ल्यावर नजर ठेवण्यासह त्यांची समुद्र मार्गे येणारी रसद तोडणे  व पोर्तुगीजांच्या ताब्यातून वसई किल्ला जिंकण्यासाठी खाडी पलीकडे भाईंदरच्या चौक डोंगरावरील धारावी किल्ला हाती येणे आवश्यक होते . धारावी किल्ला जिंकण्यासाठी मराठ्यांनी ८ वेळा प्रयत्न केला होता . नवव्या वेळी म्हणजेच ६ मार्च १७३९ रोजी धारावी किल्ला नरवीर चिमाजी अप्पा यांनी पोर्तुगीजांना पराभवाची धूळ चारून मराठा साम्राज्यात आणला होता . ६ मार्च हा विजय दिन म्हणून साजरा करण्याचा आग्रह गडप्रेमीं कडून होत होता . यंदा त्याला २८४ वर्ष झाली. 

महापालिका आयुक्त दिलीप ढोले यांनी हा विजय दिन महापालिके मार्फत साजरा करण्याचा निर्णय घेतला . त्या अनुषंगाने पालिकेने संपूर्ण किल्ल्यावर आकर्षक अशी विद्युत रोषणाई व फुलांची सजावट केली होती.  पुष्करसिंह पेशवा यांच्या हस्ते धारावी देवी मंदिरात आरती व दर्शनाने कार्यक्रमाची सुरवात केली गेली . चिमाजी अप्पा यांच्या अश्वारूढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मानवंदना देण्यात आली . यावेळी  पेशव्यांसह आयुक्त दिलीप ढोले , आमदार गीता जैन , शहीद मेजर कौस्तुभ राणे यांच्या आई ज्योती व वडील प्रकाश, सहाय्यक पोलीस आयुक्त शांतीलाल जाधव, माजी उपमहापौर हसमुख गेहलोत आदी उपस्थित होते . 

महापालिकेच्या काशी , माशाचा पाडा , मुर्धे , मोरवा व भाईंदर पश्चिम ह्या ५ शाळां मधील विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेशात चिमाजी अप्पा स्मारक पासून किल्ल्याच्या बुरुज पर्यंत मिरवणूक काढली . विद्यार्थ्यांनी लेझीमच्या तालात हि फेरी काढली . यावेळी त्यांनी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते . पुष्करसिंह यांनी सांगितले कि , आपण कोकणात अनेक ठिकाणी फिरलो मात्र इकडे कधी आलो नाही याचे मला आश्चर्य वाटते. चिमाजी अप्पा यांच्या  स्मृतींचे इतके सुंदर जतन करत आला आहेत त्याचा आनंद वाटतो . त्यांनी पेशव्यांचा श्लोक म्हणून दाखवत तो श्रीवर्धनच्या लक्ष्मी नारायण मंदिर मागे लिहून ठेवला आहे व चिमाजी अप्पा त्याच मातीतले होते असे सांगितले . 

धारावी किल्ल्याच्या संवर्धन आणि जतन साठी राज्य शासनाने १० कोटी तर महापालिकेने ३ कोटींची तरतूद केली आहे . महापालिकेने चिमाजी अप्पा यांचे स्मारक व उद्यान विकसित केले आहे . किल्ला परिसरचे ऐतिहासिक पावित्र्य जपत त्याचे महत्व नागरिकांना होण्यासाठी पालिका विविध उपक्रम व कामे करत असल्याचे आयुक्त ढोले यांनी सांगितले . 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Mira Bhayander Municipal Corporationमीरा-भाईंदर महापालिका निवडणुक