शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघात एक गूढच राहणार? ब्लॅक बॉक्समधून माहिती मिळेना; अमेरिकेला पाठवणार
2
नोबेलच्या शिफारशीबदल्यात लंच! मोठं स्वप्न बघतायत डोनाल्ड ट्रम्प; व्हाइट हाऊसनं आसिम मुनीरला आमंत्रण का दिलं? बिंग फुटलं
3
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इराणनं केली हल्ल्याची तयारी; आता अमेरिकाही युद्धात उतरणार?
4
"आधी युक्रेनसोबतचा तुमचा वाद निस्तरा, मग…’’, मध्य पूर्वेची चिंता करणाऱ्या पुतीन ट्रम्प यांचा टोला  
5
युनिफाईड पेन्शन स्कीमवर मोठी अपडेट; सरकारनं जोडले 'हे' फायदे, काय परिणाम होणार?
6
इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणले; ११० विद्यार्थ्यांना घेऊन विमान सकाळीच पोहोचले
7
Guru Purnima 2025: २० जूनपासून गुरुपौर्णिमेपर्यंत सलग २१ दिवस करा 'ही' स्वामी उपासना!
8
अनिल अंबानींकडे असलेली सर्वात महागडी वस्तू कोणती? किंमत ऐकून अवाक व्हाल!
9
Anaya Bangar: संजय बांगरची ट्रान्सजेंडर मुलगी अनाया बांगरची BCCI कडे खास मागणी, म्हणाली- 'मला सहानुभूती नकोय, पण..."
10
Israel Iran: इस्रायलचे हल्ले, इराणमध्ये मृत्यूचे तांडव! आतापर्यंत किती लोकांचा झाला मृत्यू? 
11
बाबा भरतशेठ, अघोरी विद्या अन्...; पालकमंत्रीपदासाठी गोगावलेंकडून पूजा? राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप
12
इराणच्या अयातुल्ला खामेनीला घरातूनच विरोध; पुतण्या म्हणतो- शांततेसाठी या हुकुमशाही शासनाचा अंत आवश्यक!
13
"तुमच्या अंगाशी येईल, वाचवायला येणार नाही"; स्क्रीनशॉट दाखवत नितेश राणे म्हणाले, "निलेशजी, धमकवणे बरोबर नाही"
14
रायगडात धो धो पाऊस, शाळा, कॉलेजनां सुट्टी, अलिबाग-रोहा , पाली खोपोली रस्ता वाहतुकीस बंद
15
मुकेश अंबानी बनले ट्रम्प यांचे नवे बिझनेस पार्टनर; सर्वात श्रीमंत भारतीयानं किती गुंतवलेत पैसे?
16
सोनमने २५ दिवसांत ११२ वेळा फोन केला तो संजय वर्मा कोण? अखेर झालं उघड, धक्कादायक माहिती आली समोर 
17
बाजारात नवा 'लव्ह स्कॅम'! प्रेमाच्या जाळ्यात ओढून तरुणांना लुबाडतायत, तुम्ही तर बळी नाही ना?
18
करिश्मा कपूरची लेक समायरा नक्की काय करते? वडिलांच्या निधनानंतर समायरा कपूर चर्चेत
19
Karisma Kapoor : संजय कपूरसोबत घटस्फोट घेतल्यानंतर करिश्मा कपूरने का केलं नाही लग्न? जाणून घ्या याबद्दल
20
Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi 2025: "ज्ञानोबा तुकारामांचा" अखंड जयघोष! आळंदीतून माऊलींच्या पालखीचे यंदा रात्री प्रस्थान

सरपंचाच्या उपोषणामुळे आदिवासींचे सरकारी घरकुले खर्डीत तहसिलदारांनी तोडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2019 20:34 IST

शासनाच्या निधीतून आदिवासी परिवाराना ही घरकुले बांधून देण्यात आली होती. सरकारी भूखंडावर ही घरकुले असल्याच्या कारणाखाली संबंधीत सरपंच उपोषणाला बसले, त्यांनी घरकुले तोडण्याची मागील लावून धरली, त्यांची मागणी ग्राह्य धरून आदिवासी परिवारांची घरकुले तोडण्यात आल्याचे जिल्हा परिषदेच्या ग्राम पंचायत विभागाने तक्रारदार सदस्यांसह सभागृहाच्या निदर्शनात आणले. पण ‘सरपंच उपोषणाला बसले म्हणून आदिवासींना बेघर कसे करू शकले’ हा विषय मात्र जिल्हा परिषदेच्या सदस्यांमध्ये जोरदार चर्चीला जात आहे.

ठळक मुद्देसरकारी खर्चाने बांधलेल्या या आदिवासीचे घरकुले तोडून सध्या त्यांना बेघर केल्यामुळे संताप ग्राम पंचायत या घरांची घरपट्टी देखील रहिवाश्यांकडून वसूलशासनाच्या निधीतून आदिवासी परिवाराना ही घरकुले बांधून देण्यात आली होती.

ठाणे : मूलभूत हक्कापैकी आदिवासींच्या निवाऱ्याची समस्या सोडवण्यासाठी शासनाने घरकूल मंजूर करून ते बांधून दिले. मात्र सरपंचाने उपोषण सुरू करून ते घरकुले पाडण्याची मागणी केली. त्यास न्याय देण्यासाठी खर्डी येथील आदिवासींचे घरकुले तोडण्याची कारवायी केल्याची चर्चा जिल्हा परिषदेच्या जनरलबॉडीच्या सभेतही झाली. त्याविरोधात कारवायी करण्याचे संकेत आहे.शासनाच्या निधीतून आदिवासी परिवाराना ही घरकुले बांधून देण्यात आली होती. सरकारी भूखंडावर ही घरकुले असल्याच्या कारणाखाली संबंधीत सरपंच उपोषणाला बसले, त्यांनी घरकुले तोडण्याची मागील लावून धरली, त्यांची मागणी ग्राह्य धरून आदिवासी परिवारांची घरकुले तोडण्यात आल्याचे जिल्हा परिषदेच्या ग्राम पंचायत विभागाने तक्रारदार सदस्यांसह सभागृहाच्या निदर्शनात आणले. पण ‘सरपंच उपोषणाला बसले म्हणून आदिवासींना बेघर कसे करू शकले’ हा विषय मात्र जिल्हा परिषदेच्या सदस्यांमध्ये जोरदार चर्चीला जात आहे. याशिवाय संबंधीत सदस्याने देखील आदिवासीना न्याय देण्यासाठी लावून धरला आहे.सरकारी जागेवर असलेल्या या घरकुलांसह संबंधीत तहसिलदारांनी सात अतिक्रमणे जमीनदोस्त केलेली आहेत. सरकारी खर्चाने बांधलेल्या या आदिवासीचे घरकुले तोडून सध्या त्यांना बेघर केल्यामुळे संताप व्यक्त होत आहे. सरकारी जागेवर जरी घरकुले बांधलेले असले तरी संबंधीत लाभार्थी आदिवासी त्याव जागेवर काही वर्षांपासून राहत आहेत. शासनाने त्यांना विद्युत पुरवठ्यासह, पाणी पुरवठा व अन्यही अत्यावश्यक सोयीसुविधा आधीच पुरवलेल्या आहेत. याशिवाय २००० सालापर्यंत असलेल्या झोपडपट्यामधील ही घरे अधिकृत झालेली होती. ग्राम पंचायत या घरांची घरपट्टी देखील रहिवाश्यांकडून वसूल करीत असल्याच्या मुद्यावर देखील जिल्हा परिषदेत चर्चा झाली.आदिवासींच्या या घरकुलांवर केलेली कारवायी अन्यायकारी आहे. यामुळे या बेघर अदिवासींना त्वरीत घरकुले देण्याची मागणी लावून धरली आहे. अन्यथा सरकारी निधीतून बांधण्यात आलेले आदिवासींचे घरकुले तोंडल्यामुळे संबंधीतावर गुन्हे दाखल करून कारवायी करण्याची मागणी सध्या जोरधरू लागली आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा या देखील आदिवासी समाजातील असल्यामुळे न्याय मिळण्याची अपेक्षा संबंधीत सदस्यांकडून व्यक्त करण्यात आली. यावर जिल्हा परिषद प्रशासन काय भूमिका घेणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागून आहे.

टॅग्स :thaneठाणेzpजिल्हा परिषद