शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

सरपंचाच्या उपोषणामुळे आदिवासींचे सरकारी घरकुले खर्डीत तहसिलदारांनी तोडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2019 20:34 IST

शासनाच्या निधीतून आदिवासी परिवाराना ही घरकुले बांधून देण्यात आली होती. सरकारी भूखंडावर ही घरकुले असल्याच्या कारणाखाली संबंधीत सरपंच उपोषणाला बसले, त्यांनी घरकुले तोडण्याची मागील लावून धरली, त्यांची मागणी ग्राह्य धरून आदिवासी परिवारांची घरकुले तोडण्यात आल्याचे जिल्हा परिषदेच्या ग्राम पंचायत विभागाने तक्रारदार सदस्यांसह सभागृहाच्या निदर्शनात आणले. पण ‘सरपंच उपोषणाला बसले म्हणून आदिवासींना बेघर कसे करू शकले’ हा विषय मात्र जिल्हा परिषदेच्या सदस्यांमध्ये जोरदार चर्चीला जात आहे.

ठळक मुद्देसरकारी खर्चाने बांधलेल्या या आदिवासीचे घरकुले तोडून सध्या त्यांना बेघर केल्यामुळे संताप ग्राम पंचायत या घरांची घरपट्टी देखील रहिवाश्यांकडून वसूलशासनाच्या निधीतून आदिवासी परिवाराना ही घरकुले बांधून देण्यात आली होती.

ठाणे : मूलभूत हक्कापैकी आदिवासींच्या निवाऱ्याची समस्या सोडवण्यासाठी शासनाने घरकूल मंजूर करून ते बांधून दिले. मात्र सरपंचाने उपोषण सुरू करून ते घरकुले पाडण्याची मागणी केली. त्यास न्याय देण्यासाठी खर्डी येथील आदिवासींचे घरकुले तोडण्याची कारवायी केल्याची चर्चा जिल्हा परिषदेच्या जनरलबॉडीच्या सभेतही झाली. त्याविरोधात कारवायी करण्याचे संकेत आहे.शासनाच्या निधीतून आदिवासी परिवाराना ही घरकुले बांधून देण्यात आली होती. सरकारी भूखंडावर ही घरकुले असल्याच्या कारणाखाली संबंधीत सरपंच उपोषणाला बसले, त्यांनी घरकुले तोडण्याची मागील लावून धरली, त्यांची मागणी ग्राह्य धरून आदिवासी परिवारांची घरकुले तोडण्यात आल्याचे जिल्हा परिषदेच्या ग्राम पंचायत विभागाने तक्रारदार सदस्यांसह सभागृहाच्या निदर्शनात आणले. पण ‘सरपंच उपोषणाला बसले म्हणून आदिवासींना बेघर कसे करू शकले’ हा विषय मात्र जिल्हा परिषदेच्या सदस्यांमध्ये जोरदार चर्चीला जात आहे. याशिवाय संबंधीत सदस्याने देखील आदिवासीना न्याय देण्यासाठी लावून धरला आहे.सरकारी जागेवर असलेल्या या घरकुलांसह संबंधीत तहसिलदारांनी सात अतिक्रमणे जमीनदोस्त केलेली आहेत. सरकारी खर्चाने बांधलेल्या या आदिवासीचे घरकुले तोडून सध्या त्यांना बेघर केल्यामुळे संताप व्यक्त होत आहे. सरकारी जागेवर जरी घरकुले बांधलेले असले तरी संबंधीत लाभार्थी आदिवासी त्याव जागेवर काही वर्षांपासून राहत आहेत. शासनाने त्यांना विद्युत पुरवठ्यासह, पाणी पुरवठा व अन्यही अत्यावश्यक सोयीसुविधा आधीच पुरवलेल्या आहेत. याशिवाय २००० सालापर्यंत असलेल्या झोपडपट्यामधील ही घरे अधिकृत झालेली होती. ग्राम पंचायत या घरांची घरपट्टी देखील रहिवाश्यांकडून वसूल करीत असल्याच्या मुद्यावर देखील जिल्हा परिषदेत चर्चा झाली.आदिवासींच्या या घरकुलांवर केलेली कारवायी अन्यायकारी आहे. यामुळे या बेघर अदिवासींना त्वरीत घरकुले देण्याची मागणी लावून धरली आहे. अन्यथा सरकारी निधीतून बांधण्यात आलेले आदिवासींचे घरकुले तोंडल्यामुळे संबंधीतावर गुन्हे दाखल करून कारवायी करण्याची मागणी सध्या जोरधरू लागली आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा या देखील आदिवासी समाजातील असल्यामुळे न्याय मिळण्याची अपेक्षा संबंधीत सदस्यांकडून व्यक्त करण्यात आली. यावर जिल्हा परिषद प्रशासन काय भूमिका घेणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागून आहे.

टॅग्स :thaneठाणेzpजिल्हा परिषद