शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
3
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
4
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
5
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
6
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
7
काश्मीरच्या बडगाममध्ये CRPF च्या वाहनाचा अपघात; अनेक जवान जखमी
8
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
9
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
10
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
11
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
12
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
13
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
14
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
15
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
16
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
17
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
18
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
19
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण
20
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय

‘टेक्निकल टास्क फोर्स’ कागदावरच, जाचक अटींमुळे वाजला बो-या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2017 00:54 IST

कळवा-दिवादरम्यान जानेवारी २०१५मध्ये झालेल्या प्रवाशांच्या हिंसक आंदोलनानंतर तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी रेल्वे प्रवाशांच्या समस्या सोडवण्यासाठी मुंबई विभागीय टेक्निकल टास्क फोर्स अर्थात विशेष तांत्रिक कार्य पथक स्थापन करण्याची घोषणा केली होती.

- नारायण जाधव ।ठाणे : कळवा-दिवादरम्यान जानेवारी २०१५मध्ये झालेल्या प्रवाशांच्या हिंसक आंदोलनानंतर तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी रेल्वे प्रवाशांच्या समस्या सोडवण्यासाठी मुंबई विभागीय टेक्निकल टास्क फोर्स अर्थात विशेष तांत्रिक कार्य पथक स्थापन करण्याची घोषणा केली होती. परंतु, रेल्वे बोर्डाने लादलेल्या जाचक अटींमुळे हे पथक अद्यापही कागदावरच आहे. परिणामी, मुंबई लोकल सेवेसह रेल्वेच्या पायाभूत आणि तांत्रिक समस्या सुटल्या नसल्याचे उच्चपदस्थ सूत्रांनी ‘लोकमत’ला सांगितले. परळ-एल्फिन्स्टन दरम्यानच्या पादचारी पूल दुर्घटनेनंतर पुन्हा तांत्रिक कार्य पथक स्थापन करण्याचा विषय ऐरणीवर आला आहे. मात्र जोवर रेल्वे बोर्डाच्या हटवादी नोकरशहांकडून जाचक अटींचा अडसर दूर केला जात नाही. तोपर्यंत हे पथक स्थापन होऊच शकत नाही, असे सूत्रांचे म्हणणे आहे.शुक्रवारच्या चेंगराचेंगरीच्या घटनेत २३ प्रवाशांना जीव गमवावा लागल्यानंतर पुन्हा तांत्रिक कार्य पथकाचा विषय उपस्थित झाला. जानेवारी २०१५मध्ये सुरेश प्रभू यांनी या पथकाच्या स्थापनेची घोषणा केली होती. डिसेंबर २०१६मध्ये रेल्वे मंत्रालयात जपानच्या रेल्वे टेक्निकल रिसर्च इन्स्टिट्यूट आणि कोरियन रेल रिसर्च इन्स्टिट्यूटच्या अधिकाºयांसोबत झालेल्या बैठकीत भारतीय रेल्वेच्या सुरक्षेसंदर्भात चर्चा झाली होती. या बैठकीत अणुशास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांच्यासमवेत प्रभू यांनी संवाद साधला होता. त्यानंतर केवळ मुंबईच नव्हे, तर संपूर्ण देशभरातील रेल्वेच्या सुरक्षेसाठी विशेष तांत्रिक पथक स्थापनेसंदर्भात रेल्वे बोर्डाने निर्णय घेतला. परंतु, या पथकातील ४२०० बेसिक पगार असणारे तंत्रज्ञ हे कोणत्याही रेल्वे युनियनचे सदस्य असता कामा नयेत, अशी अट घातली गेली. तसेच केंद्रीय सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्यांना त्यात घेण्याची अट होती. याला इंडियन रेल्वे टेक्निकल सुपरवायझर असोसिएशनने तीव्र विरोध करून फेबु्रवारी २०१७मध्ये तसे पत्र रेल्वेमंत्र्यांना धाडले होते. आमच्या असोसिएशनचे ५० हजारांहून अधिक सक्रिय तंत्रज्ञ असताना केंद्रीय सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाºयांची मदत का घ्यायची, असा त्यांचा सवाल होता. या आणि अशा अनेक जाचक अटींमुळे तांत्रिक कार्य पथक कागदावरच राहिले....तरीही सेवा अविरत सुरूमुंबईची उपनगरीय लोकल ही केवळ मुंबई शहरापुरतीमर्यादित नसून मुंबई महानगर प्रदेश क्षेत्रातील नऊ महापालिका आणि सात नगरपालिका क्षेत्रांसह पालघर-डहाणूपासून कसाºयापर्यंतच्या प्रवाशांचा तिच्याशी थेट संबंध आहे. दररोज ७५ लाख प्रवासी लोकलने ये-जा करतात. शिवाय मध्य आणि पश्चिम मार्गावरील लांब पल्ल्याच्या अनेक प्रवासी गाड्यांसह मालवाहतूकही मोठ्या प्रमाणात होते. अपुºया पायाभूत सुविधा, तांत्रिक समस्यांना तोंड देऊन ही सेवा अविरत सुरू असते.

टॅग्स :Mumbaiमुंबईcentral railwayमध्ये रेल्वे