शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Boat Accident: मोठी बातमी! रायगडच्या समुद्रात मासेमारी बोट बुडाली, बचाव कार्य सुरू; व्हिडीओ व्हायरल
2
१२%, २८% चा GST स्लॅब संपवण्याचा प्रस्ताव राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या गटानं स्वीकारला, सामान्यांना मिळणार मोठा दिलासा
3
रशियाची सर्वात शक्तिशाली युद्धनौका S-400 बटालियनसह समुद्रात दाखल, पुतिन काय करतायत..?
4
Video: कुत्रा येणाऱ्या-जाणाऱ्यांवर सतत भुंकायचा; टोळक्याने मालकालाच लाठ्या-काठ्यांनी बेदम चोपले...
5
नशीब असावं तर असं! पावसापासून वाचण्यासाठी दुकानात शिरली, काही वेळाने करोडपती बनून बाहेर आली
6
जिम सोडा अन् ब्रॉन्को टेस्टवर फोकस करा! टीम इंडियातील खेळाडूंना जपावा लागणार फिटनेसचा नवा 'मंत्र'
7
आरोग्य विमा आणि गंभीर आजार विम्यात काय आहे फरक? अनेकजण इन्शुरन्स घेताना करतात चूक!
8
रोज मृत्यूची भीती, तरीही खचली नाही सौंदर्यवती! कोण आहे Nadeen Ayoub? तिच्या नावाची चर्चा का?
9
श्वेताची विवाहित प्रियकरानेच केली हत्या; फिरायला घेऊन गेला आणि कार घातली तलावात, दोघांमध्ये काय बिनसलं होतं?
10
आर्यन खानच्या 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मधून प्रसिद्ध खलनायकाचं कमबॅक, लूक पाहून खूश झाले चाहते
11
BEST Election Results 2025: उद्धवसेना-मनसे युतीचा २१-० ने पराभव; राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया आली
12
जीएसटी कपातीनंतरही कारवर जादा कर लागू शकतो...; सीएने केले विश्लेषण...
13
१० हजार रुपयांत भारतीय जपानमध्ये काय काय करू शकतात? रुपयाची जपानी किंमत किती?
14
दोन वर्षाच्या मुलीसह अख्ख कुटुंब मृतावस्थेत आढळल्याने खळबळ; ५ जणांसोबत नेमकं काय घडलं? 
15
अभिनेत्रीला अश्लील मेसेज करणारा तो युवा नेता कोण? समोर आली धक्कादायक माहिती, राष्ट्रीय पक्षाशी संबंध 
16
4 वर्षांत तीन वेळा प्रेग्नंट, तुरुंगवासाची शिक्षा टाळण्यासाठी महिलेने भलताच मार्ग अवलंबला...! जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
17
Mumbai Crime: 'तुझ्या अंगात भूत आहे', पुजेला बोलावलं आणि ३२ वर्षीय महिलेवर मांत्रिकाने केला बलात्कार
18
श्रावण अमावस्येला पिठोरी अमावस्या का म्हणतात? त्याच दिवशी असतो पोळा आणि मातृदिन
19
राज ठाकरे शिवतीर्थावर परतताच CM देवेंद्र फडणवीसांनी केला उद्धव ठाकरेंना फोन; नेमके कारण काय?
20
रामललांच्या भक्तांना दिवाळीपूर्वीच मिळणार खास गिफ्ट! राम मंदिर ट्रस्ट देणार विशेष भेट, जाणून घ्या सविस्तर

शिक्षकांनी कृती, ज्ञान, व्यक्तिमत्त्वातून आदर्श निर्माण करावेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2021 04:45 IST

लोकमत न्यूज नेटवर्क डोंबिवली : शिक्षकांनी आपल्या कृतीतून, ज्ञानातून, आचार-विचार, व्यक्तिमत्त्वातून आदर्श निर्माण केले पाहिजेत, ही काळाची गरज आहे, ...

लोकमत न्यूज नेटवर्क

डोंबिवली : शिक्षकांनी आपल्या कृतीतून, ज्ञानातून, आचार-विचार, व्यक्तिमत्त्वातून आदर्श निर्माण केले पाहिजेत, ही काळाची गरज आहे, असे मत प्रख्यात आयुर्वेदाचार्य डॉ. विनय वेलणकर यांनी व्यक्त केले. ‘खेळांचे मानसशास्त्र’ या विषयावर त्यांनी शिक्षकांना मार्गदर्शन केले.

स्वामी विवेकानंद विद्यामंदिरतर्फे शनिवारी प्राथमिक व माध्यमिक शाळेतील शिक्षकांसाठी राणाप्रताप भवन येथील डॉ. हेडगेवार सभागृह येथे आहार, क्रीडा व व्यायाम या विषयांवर विविध व्याख्याने झाली.

खेळामुळे मिळणारे फायदे, खेळाडूंचे मानसिक आरोग्य जपण्यासाठी तसेच ब्रह्ममुहूर्तावर उठणे, अभ्यंग स्नान, व्यायामातील सातत्य ही आयुर्वेदातील त्रिसूत्री सांगितली. घरचेच पारंपरिक पौष्टिक पदार्थ खाल्ले पाहिजेत, ज्यामुळे शक्ती व बुद्धिमत्ता वाढेल व खेळाची आवड वाढेल, असे ते पुढे म्हणाले. खेळ व शरीराची संरचना, मानवी हालचालींचा शास्त्रोक्त अभ्यास, नित्याच्या कामातून विद्यार्थ्यांच्या अंगी असणारे गुण, कौशल्ये कशी ओळखायची हे सांगितले. तर दंड, बैठका, सूर्यनमस्कार, व्यायाम हा सर्वांसाठी आवश्यक आहे, असे प्रतिपादन व्याख्याते डॉ. घन:श्याम धोकरट यांनी केले.

प्रास्ताविकात संस्थेचे पदाधिकारी संजय कुलकर्णी यांनी क्रीडाक्षेत्रातील विविध खेळाडूंची होणारी उपेक्षा, याबद्दल खेद व्यक्त केला. संस्थेचे अध्यक्ष डॉ. सतीश वाघमारे यांनी मनोगत व्यक्त केले. त्यानंतर नयना पाटील यांनी उपक्रमाचा व्यक्तिगत अभिप्राय मांडला.

दुसऱ्या सत्रात मुख्याध्यापक अंकुर आहेर यांनी ‘खेळाडू घडविताना’ या विषयावर व्याख्यान दिले. यात प्राथमिक शिक्षकांची भूमिका ही खूप महत्त्वाची असते. क्रीडेतून आनंद, शारीरिक स्वास्थ्य, खेळाडूंच्या शारीरिक क्षमता वाढविण्यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत. या क्षमतांचे बारकाईने निरीक्षण करून त्यानुसार विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन केले पाहिजे. यात मोटिव्हेशनही तितकेच महत्त्वाचे असते, असे ते म्हणाले.

प्रसिद्धीप्रमुख मुख्याध्यापिका विद्या कुलकर्णी यांनी आभार मानले, तर क्रीडाशिक्षक रवींद्र पवार, विकास हिवाळे आदींनी नियोजनाचे काम पाहिले. या व्याख्यानासाठी संस्थेच्या सर्व शाळेतील मुख्याध्यापक स्तर, निवडक क्रीडाशिक्षक शिक्षक उपस्थित होते.

‘व्यायाम टाळू नका’

तिसऱ्या सत्रात कुलकर्णी यांनी ‘व्यायाम समज-गैरसमज’ या विषयावर व्याख्यान दिले. व्यायाम म्हणजे तुमच्यातील ऊर्जा खर्च करणे होय. ताकद, लवचीकता, दम, श्वास, चपळता वाढवणे होय. परावलंबित्व येऊ नये म्हणून व्यायाम करावा, म्हणून तो कधी टाळू नये, पुढे ढकलू नये. त्याचे योग्य नियोजन केले पाहिजे, असे ते म्हणाले.

फोटो आहे

-------------