शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपामध्ये जाणार का? एकनाथ खडसे म्हणाले, “मी आजही RSSचा स्वयंसेवक आहे, गिरीश महाजन...”
2
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी
3
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय
4
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
5
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
6
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना सर्वोत्तम, पदोन्नती योग; बंपर लाभास अनुकूल काळ, शुभ तेच घडेल!
7
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
8
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
9
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
10
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, असीम सरोदे यांनी दिली माहिती; नेमके प्रकरण काय?
11
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
12
अमेरिकेनं इराणवर चालवलं 'मिडनाइट हॅमर', केला ऑपरेशनच्या नावाचा खुलास; म्हणाले, ट्रम्प बोलें तो...!
13
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
14
ENG vs IND : कायद्यात राहून फायद्यात! जड्डू-साई सुदर्शन जोडीनं रिले कॅचसह लुटली मैफिल (VIDEO)
15
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
16
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
17
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
18
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
19
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
20
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र

ज्ञान, संस्कार देणारा शिक्षकच समाजाचा कणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2019 01:01 IST

विद्यार्थी घडवण्यात शिक्षकांचा वाटा महत्त्वाचा आहे. ज्ञानासोबतच संस्कार देण्याचे काम शिक्षक करतात.

भिवंडी : विद्यार्थी घडवण्यात शिक्षकांचा वाटा महत्त्वाचा आहे. ज्ञानासोबतच संस्कार देण्याचे काम शिक्षक करतात. त्यामुळेच चांगल्या समाजाची निर्मिती होत असल्यामुळे शिक्षकच समाजाचा कणा असल्याचे उद्गार भिवंडीचे खासदार कपिल पाटील यांनी शिक्षक गौरव पुरस्कार कार्यक्रमात काढले.भिवंडी पंचायत समितीच्या शिक्षण विभागातर्फे अंजुरफाटा येथील हालारी वीसा ओसवाल कनिष्ठ महाविद्यालयाच्या शांती चंदन आॅडिटोरियम येथे शनिवारी शिक्षक गौरव समारंभ झाला. त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाप्रसंगी राज्याच्या हातमाग महामंडळाचे अध्यक्ष प्रकाश पाटील, आमदार शांताराम मोरे, ठाणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष दीपाली पाटील, जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण समितीच्या सभापती सपना भोईर, जिल्हा परिषदेचे कृषी पशुसंवर्धन आणि दुग्ध समितीचे सभापती किशोर जाधव, पंचायत समिती भिवंडीच्या सभापती रवीना जाधव, उपसभापती वृषाली विशे आदी उपस्थित होते.पालकांचा इंग्रजी शाळांकडे कल वाढला आहे. त्यामुळे मराठी शाळांची पटसंख्या घसरत आहे. तर, दुसरीकडे जागतिक स्पर्धेत मराठी माध्यमांच्या मुलांचा आत्मविश्वास कमी पडत आहे. त्यामुळे मराठी शाळांमधील मुलांचा आत्मविश्वास जागवण्याचे व मराठी शाळांचा पट वाढवण्याचे महत्त्वाचे काम शिक्षकांनी करणे गरजेचे असल्याचा सल्ला खा. पाटील यांनी शिक्षकांना दिला. कर्तृत्व गाजवण्यासाठी मराठी शाळांमधली मुले नेहमीच प्रयत्नशील असतात. आज व्यासपीठावर विविध पदांपर्यंत पोहोचलेले सर्वच मान्यवर मराठी शाळेचे विद्यार्थी होते. त्यासाठी मराठी शाळांकडे विशेष लक्ष दिले पाहिजे. त्यासाठी शिक्षकांनी त्यांच्यातील क्षमता ओळखल्या पाहिजेत, असेही ते म्हणाले.जिल्हा परिषदेने नावीन्यपूर्ण शिक्षण देण्यासाठी आनंददायी शाळा सुरू करणे काळाची गरज आहे. या आनंददायी शाळांमध्ये विद्यार्थी शिक्षण घेताना अभ्यासाचा कंटाळा करणार नाहीत. असे आनंददायी वातावरण जिल्हा परिषदेच्या प्रत्येक शाळांमध्ये निर्माण करायला पाहिजे. त्यासाठी शासनाच्या निधीवर अवलंबून न राहता जिल्हा परिषदेने स्वत: पुढाकार घेणे गरजेचे असल्याचा सल्लाही उपस्थित अधिकारी व लोकप्रतिनिधींना खा. पाटील यांनी दिला. शिक्षकांनी शिक्षकी पेशा हे व्रत म्हणून स्वीकारले तर देशविकासाला चालना देणारा विद्यार्थी घडेल, अशी अशा आपल्या भाषणातून त्यांनी व्यक्त केली.>या शिक्षकांचा गौरवया शिक्षक गौरव कार्यक्र माप्रसंगी भिवंडी तालुक्यातील एकूण ९९३ शिक्षकांमधून १० शिक्षकांचा आदर्श शिक्षक म्हणून गौरव करण्यात आला. आनगाव पिलांझे शाळेच्या जयश्री ठाकरे, राहनाळ शाळेचे सुरेश साळुंखे, गणेशपुरी पिरपाडा शाळेच्या शमा शेख, मानकोली शाळेच्या ज्योती ठाकरे, पडघा शेरेकरपाडा शाळेचे मधुकर महानुभाव, लाखिवली शाळेचे सुभाष वरठा , कांबे मीठपाडा शाळेचे विलास पाटील, दाभाड कांदळी शाळेचे संजय पाटील, पडघा भोईरपाडा शाळेच्या कांचन भोईर , भिनार पवारवाडी शाळेच्या पद्मा श्रीपती तसेच चिंबीपाडा केंद्राचे केंद्रप्रमुख संदीप परदेशी यांचा सन्मान यावेळी करण्यात आला.