शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

'कुलमुखत्यार पत्रधारकांना टीडीआर देणे म्हणजे स्थानिक भूमिपुत्रांवर अन्याय'

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2018 21:26 IST

मीरा भाईंदर क्षेत्रातील रस्ते रुंदीकरण, नव्याने रस्ते तयार करणे, आरक्षणे विकसित करण्यासाठी जमिनीचा मोबदला म्हणून कुलमुखत्यार पत्रधारकांना विकास हक्क हस्तांतरण प्रमाणपत्र ( टीडीआर ) देणे बेकायदेशीर तसेच स्थानिक भूमिपुत्रांवर अन्याय करणारे आहे.

 

मीरा रोड - मीरा भाईंदर क्षेत्रातील रस्ते रुंदीकरण, नव्याने रस्ते तयार करणे, आरक्षणे विकसित करण्यासाठी जमिनीचा मोबदला म्हणून कुलमुखत्यार पत्रधारकांना विकास हक्क हस्तांतरण प्रमाणपत्र ( टीडीआर ) देणे बेकायदेशीर तसेच स्थानिक भूमिपुत्रांवर अन्याय करणारे आहे. त्यामुळे प्रशासनाचे धोरण व सत्ताधारी भाजपाने केलेला ठराव रद्द करण्याची मागणी काँग्रेस जिल्हाध्यक्ष तथा नगरसेवक अनिल सावंत यांनी केली आहे. 

बाधित जागेच्या जमीन मालक किंवा कुलमुखत्यारपत्र धारकास विकास हक्क हस्तांतरण प्रमाणपत्र देण्याचा विषय बेकायदेशीररीत्या आणण्यात आला होता. वास्तविक आरक्षणांमुळे बाधित झालेल्या जमिनी स्थानिक भूमिपुत्र कोळी, आगरी, ख्रिश्चन , आदिवासी, सोमवंशीय पाठारे समाजाच्या आहेत. परंतु काही टीडीआर माफियांनी मूळ जमीन मालक कुटुंबातील वाद किंवा बेबनावचा गैरफायदा घेत कवडी मोलाने सदर जमिनीचे हक्क हे नोंदणीकृत खरेदीखत न करता कुलमुखत्यारपत्र वा अधिकारपत्र घेऊन घेतलेले आहेत. सत्ता व पदाचा दुरुपयोग करून काहींनी कुलमुखत्यारपत्रा वर मोठ्या प्रमाणात टीडीआर घेतला आहे. सदर टीडीआर घेऊन स्वतःचे उखळ पांढरे करत हे माफिया आज कोट्याधीश झाले आहेत. पण स्थानिक भूमिपुत्र असलेले जमीन मालक मात्र आजही जमीन किंवा टीडीआरचा मोबदला मिळत नसल्याने भिकेला लागलेला आहे. अनेकांची फसवणूक झालेली आहे असे सावंत म्हणाले. 

विकास नियंत्रक नियमावलीमध्ये कुलमुखत्यारपत्र धारकास टीडीआर देण्याची तरतूद नाही. तर विकास आराखड्याची मुदत संपलेली असून नवीन प्रारूप विकास आराखड्याला राज्य सरकारने असंख्य तक्रारी आल्यामुळे स्थगिती दिलेली आहे. शहरातील रस्ते व आरक्षणामुळे बाधित जमिनींचे अनेक व्यवहार  संशयास्पदरीत्या झालेले आहेत. बहुतेक जमिनींचे कुलमुखत्यार पत्र घेण्यात आलेले आहेत. पण त्याचे कौटुंबिक दावे न्यायालयात प्रलंबित आहेत. 

ब-याचशा स्थानिकांच्या जमिनी गैरमार्गाने बळकावलेल्या आहेत. त्यामुळे कौटुंबिक कलह निर्माण झालेले आहेत. टीडीआर हा मूळ जमीन मालक स्थानिक भूमिपुत्रांना देण्यात यावा.  प्रशासनाने सत्ताधा-यांच्या दबावाखाली स्थानिक भूमिपुत्रांवर अन्याय करू नये,  अशी मागणी सावंत यांनी केली आहे.

टॅग्स :mira roadमीरा रोड