शहरं
Join us  
Trending Stories
1
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
2
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
3
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
4
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
5
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
6
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
7
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
8
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
9
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
10
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
11
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
12
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
13
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
14
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
15
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
16
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
17
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
18
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट
19
पुरती दमछाक झाली, वडिलांची उणीव मात्र भासली; अमोल कीर्तिकर यांनी व्यक्त केली भावना
20
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: लोकसभेच्या पाचव्या टप्प्यात 57 टक्क्यांहून अधिक मतदानाची नोंद; 49 जागांसाठी मतदान

टीडीसी बँक विभाजन प्रस्ताव २ महिन्यात, सांबरेचे उपोषण सुटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2017 4:11 AM

ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या विभाजनाचा प्रस्ताव नाबार्डच्या सहकार्याने दोन महिन्यांत साकार करणे, टीडीसीमधील भरती आणि पदोन्नती नियमानुसार व पारदर्शकतेने करणे

ठाणे : ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या विभाजनाचा प्रस्ताव नाबार्डच्या सहकार्याने दोन महिन्यांत साकार करणे, टीडीसीमधील भरती आणि पदोन्नती नियमानुसार व पारदर्शकतेने करणे, पीक नुकसानीचे पंचनामे १५ दिवसांत पूर्ण करणे, भिवंडी-वाडा-मनोर रस्त्याची दुरूस्ती सुरू करणे आदी आश्वासने मिळाल्यामुळे निलेश सांबरे व त्यांच्या कोकण विकास मंचने येथे सुरू केलेले उपोषण पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आवाहनानुसार संपुष्टात आणले.टीडीसी बँकेतील भरती अवैधरित्या सुरू आहे, बँकेने नियमबाह्यरित्या पदोन्नती दिल्या आहेत. त्यांना स्थगिती मिळून चौकशी व्हावी, टीडीसीचे विभाजन व्हावे, भिवंडी वाडा मनोर रस्त्याची दुरूस्ती व्हावी, झालेल्या पीक नुकसानीचे पंचनामे केले जावेत या मागण्यांसाठी हे उपोषण गुरूवारपासून सुरू होते. उपोषणकर्त्यांनी कँडल मार्चही काढला होता. शिवसेनेचे आमदार व पालघर जिल्हा संपर्कप्रमुख रवींद्र फाटक यांनी या संदर्भात जिल्हाधिकाºयांना लक्ष घालून कारवाई करण्याचे पत्रही दिले होते. खासदार चिंतामण वनगा, आमदार शांताराम मोरे, आमदार अमित घोडा यांनीही या आंदोलनाला पाठिंबा दिला होतो. त्यानंतर ठाण्याच्या जिल्हाधिकाºयांनी संबंधित अधिकाºयांची यासंदर्भात सोमवारी दुपारी २ वाजता बैठक आयोजित केली होती. तिला भिवंडी कल्याण उल्हासनगरचे प्रांत, डीडीआर, सार्वजनिक बांधकाम खात्याचे अभियंता उपस्थित होते. यावेळी झालेल्या चर्चेअंती असे ठरले की, नाबार्डच्या मंजुरीनुसार जिल्हा बँक विभाजनाचा प्रस्ताव दोन महिन्यात शासनातर्फे सादर करण्यात यावा, जिल्हा बँकेतील भरती पारदर्शकरित्या व नियमानुसार व्हावी, यासाठी जिल्हा निबंधक शहाजीराव पाटील यांनी व बँकेतील पदोन्नती पारदर्शकतेने व्हावी यासाठी विभागीय सहनिबंधक ज्योती लाटकर यांनी देखरेख करावी, भिवंडी वाडा मनोर रस्त्याच्या दुरूस्तीचे काम सुरू झाले आहे अशी माहिती सार्वजनिक बांधकाम खात्याचे अभियंता कापडणीस यांनी दिली तर माणकोली महामार्गाचे काम दोन महिन्यात पूर्ण केले जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. परतीच्या पावसामुळे झालेल्या पीक नुकसानीचे पंचनामे पूर्ण करून १५ दिवसांत शेतकºयांना भरपाई दिली जाईल. असे या तीनही उपविभागीय अधिकाºयांनी स्पष्ट केल. ही बैठक जवळपास २ तास चालली. त्यानंतर पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेतली. जिल्हा बँक विभाजनाचा मुद्दा आपण कॅबिनेटच्या बैठकीत तातडीने उपस्थित करू, व प्रक्रिया पूर्ण करवून घेऊ, असे त्यांनी सांगितले व जिल्हाधिकाºयांनी घेतलेल्या बैठकीतील निर्णयांचीही माहिती दिली. त्यानंतर त्यांनी केलेल्या आवाहनानुसार हे उपोषण संपुष्टात आले.हा जनतेचा विजय-निलेश सांबरेमी आणि कोकण विकास मंचच्या कार्यकर्त्यांनी जनतेच्या मागण्यांसाठी उपोषण केले. त्या मान्य झाल्या हा जनतेचा विजय आहे. आता त्या प्रत्यक्षात कशा पूर्ण होतात याकडे लक्ष देऊ - निलेश सांबरेसारे पारदर्शकच, स्थगिती नाहीठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील भरती प्रक्रिया जी कंपनी ब्लॅकलिस्टेड नाही, जिच्या कार्यपद्धतीबाबत कोणतेही वाद नाहीत तिच्यामार्फत नियमानुसार सुरू आहे. त्यामुळे आम्हाला कशाचेही भय नाही. पदोन्नतीची यापूर्वीही चौकशी झाली आहे आणखी झाली तरी आमची हरकत नाही. बँकेचे विभाजन व्हावे ही आमचीही भूमिका आहे. भरती आणि पदोन्नतीला कुणीही कसलीही स्थगिती दिलेली नाही.-राजेंद्र पाटील, चेअरमन टीडीसी बँक

टॅग्स :thaneठाणे