शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
3
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
4
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
5
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
6
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
7
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
8
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
9
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
10
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
11
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
12
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
13
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
14
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
15
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
16
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
17
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
18
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
19
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
20
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती

टीडीसी बँक विभाजन प्रस्ताव २ महिन्यात, सांबरेचे उपोषण सुटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2017 04:11 IST

ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या विभाजनाचा प्रस्ताव नाबार्डच्या सहकार्याने दोन महिन्यांत साकार करणे, टीडीसीमधील भरती आणि पदोन्नती नियमानुसार व पारदर्शकतेने करणे

ठाणे : ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या विभाजनाचा प्रस्ताव नाबार्डच्या सहकार्याने दोन महिन्यांत साकार करणे, टीडीसीमधील भरती आणि पदोन्नती नियमानुसार व पारदर्शकतेने करणे, पीक नुकसानीचे पंचनामे १५ दिवसांत पूर्ण करणे, भिवंडी-वाडा-मनोर रस्त्याची दुरूस्ती सुरू करणे आदी आश्वासने मिळाल्यामुळे निलेश सांबरे व त्यांच्या कोकण विकास मंचने येथे सुरू केलेले उपोषण पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आवाहनानुसार संपुष्टात आणले.टीडीसी बँकेतील भरती अवैधरित्या सुरू आहे, बँकेने नियमबाह्यरित्या पदोन्नती दिल्या आहेत. त्यांना स्थगिती मिळून चौकशी व्हावी, टीडीसीचे विभाजन व्हावे, भिवंडी वाडा मनोर रस्त्याची दुरूस्ती व्हावी, झालेल्या पीक नुकसानीचे पंचनामे केले जावेत या मागण्यांसाठी हे उपोषण गुरूवारपासून सुरू होते. उपोषणकर्त्यांनी कँडल मार्चही काढला होता. शिवसेनेचे आमदार व पालघर जिल्हा संपर्कप्रमुख रवींद्र फाटक यांनी या संदर्भात जिल्हाधिकाºयांना लक्ष घालून कारवाई करण्याचे पत्रही दिले होते. खासदार चिंतामण वनगा, आमदार शांताराम मोरे, आमदार अमित घोडा यांनीही या आंदोलनाला पाठिंबा दिला होतो. त्यानंतर ठाण्याच्या जिल्हाधिकाºयांनी संबंधित अधिकाºयांची यासंदर्भात सोमवारी दुपारी २ वाजता बैठक आयोजित केली होती. तिला भिवंडी कल्याण उल्हासनगरचे प्रांत, डीडीआर, सार्वजनिक बांधकाम खात्याचे अभियंता उपस्थित होते. यावेळी झालेल्या चर्चेअंती असे ठरले की, नाबार्डच्या मंजुरीनुसार जिल्हा बँक विभाजनाचा प्रस्ताव दोन महिन्यात शासनातर्फे सादर करण्यात यावा, जिल्हा बँकेतील भरती पारदर्शकरित्या व नियमानुसार व्हावी, यासाठी जिल्हा निबंधक शहाजीराव पाटील यांनी व बँकेतील पदोन्नती पारदर्शकतेने व्हावी यासाठी विभागीय सहनिबंधक ज्योती लाटकर यांनी देखरेख करावी, भिवंडी वाडा मनोर रस्त्याच्या दुरूस्तीचे काम सुरू झाले आहे अशी माहिती सार्वजनिक बांधकाम खात्याचे अभियंता कापडणीस यांनी दिली तर माणकोली महामार्गाचे काम दोन महिन्यात पूर्ण केले जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. परतीच्या पावसामुळे झालेल्या पीक नुकसानीचे पंचनामे पूर्ण करून १५ दिवसांत शेतकºयांना भरपाई दिली जाईल. असे या तीनही उपविभागीय अधिकाºयांनी स्पष्ट केल. ही बैठक जवळपास २ तास चालली. त्यानंतर पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेतली. जिल्हा बँक विभाजनाचा मुद्दा आपण कॅबिनेटच्या बैठकीत तातडीने उपस्थित करू, व प्रक्रिया पूर्ण करवून घेऊ, असे त्यांनी सांगितले व जिल्हाधिकाºयांनी घेतलेल्या बैठकीतील निर्णयांचीही माहिती दिली. त्यानंतर त्यांनी केलेल्या आवाहनानुसार हे उपोषण संपुष्टात आले.हा जनतेचा विजय-निलेश सांबरेमी आणि कोकण विकास मंचच्या कार्यकर्त्यांनी जनतेच्या मागण्यांसाठी उपोषण केले. त्या मान्य झाल्या हा जनतेचा विजय आहे. आता त्या प्रत्यक्षात कशा पूर्ण होतात याकडे लक्ष देऊ - निलेश सांबरेसारे पारदर्शकच, स्थगिती नाहीठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील भरती प्रक्रिया जी कंपनी ब्लॅकलिस्टेड नाही, जिच्या कार्यपद्धतीबाबत कोणतेही वाद नाहीत तिच्यामार्फत नियमानुसार सुरू आहे. त्यामुळे आम्हाला कशाचेही भय नाही. पदोन्नतीची यापूर्वीही चौकशी झाली आहे आणखी झाली तरी आमची हरकत नाही. बँकेचे विभाजन व्हावे ही आमचीही भूमिका आहे. भरती आणि पदोन्नतीला कुणीही कसलीही स्थगिती दिलेली नाही.-राजेंद्र पाटील, चेअरमन टीडीसी बँक

टॅग्स :thaneठाणे