शहरं
Join us  
Trending Stories
1
बॅक टू बॅक! उद्धव ठाकरे कणकवलीत सभा घेणार, दुसऱ्याच दिवशी राज यांचीही तोफ धडाडणार
2
Narendra Modi : "काँग्रेस इथे मरतेय, तिकडे पाकिस्तान रडतंय; राजपुत्राला पंतप्रधान बनवण्यासाठी उतावीळ"
3
'मोदींनी तुम्हाला लायक समजलं नाही'; CM पदाची ऑफर होती म्हणणाऱ्या फडणवीसांना राऊतांचे प्रत्युत्तर
4
"माझ्या 40 वर्षांच्या आयुष्यात असं कधीच घडलं नाही", काँग्रेस प्रवक्त्या राधिका यांचा माजी मुख्यमंत्र्यांवर निशाणा
5
मालकीण-मोलकरणीचा जुळलेला अचूक 'योग', कसा आहे 'नाच गं घुमा?' वाचा
6
दिंडोरीत भाजपाला मोठा धक्का, माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांची बंडखोरी, अपक्ष निवडणूक लढवणार 
7
SPARC shares: १४ दिवसांपासून घसरत होता शेअर, ४९% नी आपटला; आता खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
8
"ज्या बूथवर काँग्रेसला एक मतही मिळणार नाही, तिथे 25 लाखांची विकासकामं केली जातील"
9
उच्च कोलेस्ट्रॉलमुळे हृदयविकाराचा धोका; रोजच्या आहारात करा आवश्यक बदल!
10
"अनंत गीतेंचे आयुष्य धर्माच्या नावाखाली निवडणूक लढण्यात गेले, ही निवडणूक भवितव्य घडवणारी"
11
'उर्दू भाषेसोबत अन्याय का?' संजय लीला भन्साळींची 'हीरामंडी'सीरिज पाहून भडकला शीजान खान
12
Fact Check: अधीर रंजन चौधरींनी भाजपाला मतदान करण्याचे आवाहन केलेले नाही! व्हायरल झालेला व्हिडीओ 'अर्धवट'!
13
तुम्हाला ‘श्री स्वामी समर्थ’ नामाचा अर्थ माहिती आहे का? प्रभावी मंत्र अन् सुखी जीवनाची वचने
14
कोव्हिशिल्ड साईड इफेक्ट: दोन मृत मुलींचे पालक सीरम इन्स्टिट्यूटला कोर्टात खेचणार
15
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : उद्धव ठाकरेंकडूनच कोल्हापूरच्या गादीचा अपमान, उदय सामंत यांचा आरोप
16
सर्पदंशाने तरुणाचा मृत्यू; जिवंत करण्यासाठी मृतदेह दोन दिवस गंगेच्या पाण्यात लटकवला...
17
ठाकरे गटाला पॉर्न संस्कृती रुजवायची आहे का? चित्रा वाघ यांचा हल्लाबोल
18
Rahul Gandhi : "न रहेगा बांस, न बजेगी बांसुरी म्हणजे सरकारी नोकऱ्या नाहीत, आरक्षण नाही"; राहुल गांधींचा घणाघात
19
उद्धव ठाकरेंनी मागितली संभाजीराजेंची माफी; "आम्ही शेण खाल्लं म्हणून तुम्ही..."
20
Lok Sabha Election 2024: लोकसभेला 'मविआ' किती जागा जिंकणार? विधानसभा निवडणुकीत काय घडणार? Jayant Patil यांनी केले २ मोठे दावे

पुस्तकाचे ज्ञान मेंदूपर्यंत नेण्याचे काम आताच्या पिढीचे : प्रज्ञा पंडित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2019 5:10 PM

कवयित्री मनिषा गोडबोले यांच्या कविता संग्रहाचा पुस्तक सोहळा पार पडला.

ठळक मुद्देपुस्तकाचे ज्ञान मेंदूपर्यंत नेण्याचे काम आताच्या पिढीचे : प्रज्ञा पंडितशब्दगंध या काव्यसंग्रहाचा प्रकाशन सोहळा सुचले तसे लिहीले अशी लिहीणारी माणसे प्रामाणिक : अनिल थत्ते

ठाणे: आजची पिढी ही स्मार्ट फोनवर असते. या स्मार्टफोनने आपल्या मेंदूवर कब्जा केला आहे. पुस्तकाचे ज्ञान मेंदूपर्यंत नेण्याचे, ते पुढच्या पिढीपर्यंत संक्रमीत करण्याचे काम हे आताच्या पिढीने करणे गरजेचे असल्याचे मत लेखिका - कवयित्री प्रज्ञा पंडित यांनी व्यक्त केले.  शारदा प्रकाशनतर्फे कवयित्री मनिषा गोडबोले लिखित शब्दगंध या काव्यसंग्रहाचा प्रकाशन सोहळा आई हॉलमध्ये संपन्न झाला.

          यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून पंडीत बोलत होत्या. त्या पुढे म्हणाल्या, ग्रंथपाल या नोकरीचा मला हेवा वाटतो कारण ते पुस्तकांच्या राज्यात राहत असतात आणि हीच खरी श्रीमंती आहे अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या. जेव्हा आपण वाचनालयात किंवा पुस्तक खरेदीसाठी जातो तेव्हा काव्यंसंग्रह फार खरेदी केले जात नाही. ललित, कथा, कादंबरीच जास्त विकत घेतले जातात. परंतू कविता हा आपल्या आयुष्यातील एक भाग आहे. लहानपणी बडबड गीत, शालेय जीवनात कविता, चित्रपटातील गाणी, सांस्कृतिक कार्यक्रमांत, गाणी कविता असा कुठे ना कुठे कवितेशी आपला संबंध येतोच असे सांगत मनिषा गोडबोले यांनी या काव्यसंग्रहात वेगवेगळया विषयांना हात घातला असल्याचे कौतुकोद्गार त्यांनी काढले. कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार अनिल थत्ते यांनी आपणच आपल्याला मोठे करायचे असते असे सांगितले. ते म्हणाले, सुचले तसे लिहीले अशी लिहीणारी माणसे प्रामाणिक असतात. आपली कविता आपल्याला आवडायला हवी. बरेच जण प्रस्तावना समिक्षा करतात पण त्यात कौतुक करायचे असते असा सल्लाही त्यांनी दिला. यावेळी छायाचित्रकार राजेश पिसाट, मोरेश्वर गोडबोले उपस्थित होते. शारदा प्रकाशनचे प्रा. संतोष राणे यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना केली. ते म्हणाले, माणसांना जपणारी माणसेच असतात तशा जपणाऱ्या कविता गोडबोले यांनी लिहील्या आहेत. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नीता माळी यांनी केले. कार्यक्रमाच्या शेवटी गाण्यांचा कार्यक्रम पार पडला. 

टॅग्स :thaneठाणेMumbaiमुंबईcultureसांस्कृतिक