शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
2
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
3
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
4
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
5
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
6
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
7
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
8
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
9
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
10
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
11
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
12
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
13
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
14
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
15
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
16
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
17
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
18
कसा आहे 'अवतार: फायर अँड ॲश'? सर्वात आधी चित्रपट पाहून राजामौली म्हणाले "थिएटरमध्ये बसलेल्या लहान मु
19
मोठी बातमी! कबड्डी खेळाडू राणा बलाचौरिया यांच्या हत्येतील आरोपी चकमकीत ठार; दोन पोलिस जखमी
20
टोल नाके दुसरीकडे हलवा...; प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाला सूचना
Daily Top 2Weekly Top 5

पुस्तकाचे ज्ञान मेंदूपर्यंत नेण्याचे काम आताच्या पिढीचे : प्रज्ञा पंडित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2019 17:12 IST

कवयित्री मनिषा गोडबोले यांच्या कविता संग्रहाचा पुस्तक सोहळा पार पडला.

ठळक मुद्देपुस्तकाचे ज्ञान मेंदूपर्यंत नेण्याचे काम आताच्या पिढीचे : प्रज्ञा पंडितशब्दगंध या काव्यसंग्रहाचा प्रकाशन सोहळा सुचले तसे लिहीले अशी लिहीणारी माणसे प्रामाणिक : अनिल थत्ते

ठाणे: आजची पिढी ही स्मार्ट फोनवर असते. या स्मार्टफोनने आपल्या मेंदूवर कब्जा केला आहे. पुस्तकाचे ज्ञान मेंदूपर्यंत नेण्याचे, ते पुढच्या पिढीपर्यंत संक्रमीत करण्याचे काम हे आताच्या पिढीने करणे गरजेचे असल्याचे मत लेखिका - कवयित्री प्रज्ञा पंडित यांनी व्यक्त केले.  शारदा प्रकाशनतर्फे कवयित्री मनिषा गोडबोले लिखित शब्दगंध या काव्यसंग्रहाचा प्रकाशन सोहळा आई हॉलमध्ये संपन्न झाला.

          यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून पंडीत बोलत होत्या. त्या पुढे म्हणाल्या, ग्रंथपाल या नोकरीचा मला हेवा वाटतो कारण ते पुस्तकांच्या राज्यात राहत असतात आणि हीच खरी श्रीमंती आहे अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या. जेव्हा आपण वाचनालयात किंवा पुस्तक खरेदीसाठी जातो तेव्हा काव्यंसंग्रह फार खरेदी केले जात नाही. ललित, कथा, कादंबरीच जास्त विकत घेतले जातात. परंतू कविता हा आपल्या आयुष्यातील एक भाग आहे. लहानपणी बडबड गीत, शालेय जीवनात कविता, चित्रपटातील गाणी, सांस्कृतिक कार्यक्रमांत, गाणी कविता असा कुठे ना कुठे कवितेशी आपला संबंध येतोच असे सांगत मनिषा गोडबोले यांनी या काव्यसंग्रहात वेगवेगळया विषयांना हात घातला असल्याचे कौतुकोद्गार त्यांनी काढले. कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार अनिल थत्ते यांनी आपणच आपल्याला मोठे करायचे असते असे सांगितले. ते म्हणाले, सुचले तसे लिहीले अशी लिहीणारी माणसे प्रामाणिक असतात. आपली कविता आपल्याला आवडायला हवी. बरेच जण प्रस्तावना समिक्षा करतात पण त्यात कौतुक करायचे असते असा सल्लाही त्यांनी दिला. यावेळी छायाचित्रकार राजेश पिसाट, मोरेश्वर गोडबोले उपस्थित होते. शारदा प्रकाशनचे प्रा. संतोष राणे यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना केली. ते म्हणाले, माणसांना जपणारी माणसेच असतात तशा जपणाऱ्या कविता गोडबोले यांनी लिहील्या आहेत. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नीता माळी यांनी केले. कार्यक्रमाच्या शेवटी गाण्यांचा कार्यक्रम पार पडला. 

टॅग्स :thaneठाणेMumbaiमुंबईcultureसांस्कृतिक