शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

केडीएमसीच्या गळक्या कार्यालयाला ताडपत्रीचा आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2020 01:47 IST

यात काही दस्तावेजही भिजले असून, येथील पसारा पाहता ही जागा एकप्रकारे कर्मचाºयांसाठी गैरसोयीची ठरत आहे.

डोंबिवली : केडीएमसीच्या डोंबिवलीतील विभागीय कार्यालयात ठिकठिकाणी पावसामुळे गळती सुरू झाली आहे. येथील तळ आणि पहिल्या मजल्यावरील स्वच्छतागृहांमध्ये छतातून पाण्याची गळती होत असतानाच आता महत्त्वाचा विभाग असलेल्या जन्ममृत्यू नोंदणी कार्यालयातही पाणी ठिबकत आहे. गेल्या काही दिवसांपासून जोरदार पडणाऱ्या पावसामुळे हा प्रकार सुरू आहे. त्यामुळे येथील कामकाजासाठी कर्मचाऱ्यांना ताडपत्रीचा आधार घ्यावा लागला आहे. यात काही दस्तावेजही भिजले असून, येथील पसारा पाहता ही जागा एकप्रकारे कर्मचाºयांसाठी गैरसोयीची ठरत आहे.केडीएमसीचे डोंबिवली विभागीय कार्यालय हे रेल्वेस्थानकानजीक अतिशय गजबजलेल्या ठिकाणी आहे. ही वास्तू ४२ वर्षे जुनी आहे. माजी आयुक्त गोविंद बोडके यांच्या कार्यकाळात आॅगस्ट २०१९ मध्ये विभागीय कार्यालयाचा पुनर्विकास करण्याचा निर्णय घेण्यात आलाहोता.महापालिकेच्या स्वनिधीतून हा विकास करणे अशक्य असल्याने खाजगीकरणातून हे काम केले जाणार होते. बोडके यांनी अंमलबजावणीचे आदेशही दिले होते. महापालिका प्रशासकीय कामकाजाची सोय व विभागीय कार्यालयाचे विकेंद्रीकरण करण्यासाठी येथील ‘फ’ आणि ‘ग’ प्रभाग क्षेत्र कार्यालये त्या-त्या प्रभाग क्षेत्रात मध्यवर्ती ठिकाणी स्थापन करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला होता.त्यानुसार, ‘फ’ प्रभागाचे कार्यालय पी.पी. चेंबर, तर ‘ग’ प्रभागाचे कार्यालय सुनीलनगर येथे हलवण्यात येणार आहे. पी.पी. चेंबरमधील पहिला आणि दुसरा मजला ‘फ’ प्रभागासाठी घेतला जाणार होता. परंतु, याबाबतची कोणतीही कृती अद्याप झालेली नाही. परिणामी, आजही कर्मचारी आणि अधिकारी अवकळा प्राप्त झालेल्या विभागीय कार्यालयात काम करीत आहेत.तळमजल्यावर ‘ग’ प्रभाग कार्यालय आहे. त्याच्याशेजारी असलेल्या आपत्कालीन विभागाच्या कार्यालयात ड्रेनेजचे पाणी येत असल्याने तेथील कर्मचाºयांचे आरोग्य धोक्यात आले आहे.ही समस्या अधूनमधून उद्भवत असताना आता पहिल्या मजल्यावरील जन्ममृत्यू नोंदणी विभागाच्या कार्यालयात पावसामुळे गळती सुरू झाली आहे. त्यामुळे कर्मचाºयांना गैरसोयीला सामोरे जावे लागतआहे.तसेच जन्म आणि मृत्यूच्या नोंदीसाठी या विभागात मोठ्या संख्येने येणाºया नागरिकांनाही पुरेशा जागेअभावी कार्यालयाच्या बाहेर रांगेत तिष्ठत उभे राहावे लागत आहे.गेल्या सात ते आठ दिवसांपासून गळती सुरू असल्याने ताडपत्रीचा आधार घेऊन कामकाज करण्याची नामुश्की येथील कर्मचाºयांवर ओढवली आहे. या कार्यालयातील भिंतींमधूनही पावसाचे पाणी झिरपत असल्याने येथील काही दस्तावेजही भिजले आहेत. प्रशासनाच्या कारभारावर संताप व्यक्त केला जात आहे.>दुर्घटना घडल्यानंतर जाग येणार का?के डीएमसीच्या डोंबिवलीतील या इमारतीमधील बहुतांश कार्यालयांमध्ये गळतीचा त्रास होत असून एखादी दुर्घटना घडल्यावरच प्रशासनाला जाग येणार का, असा सवाल उपस्थित होत आहे. या वास्तूच्या पुनर्विकासाकडे अधिकारी आणि लोकप्रतिनिधींच्या झालेल्या दुर्लक्षाबाबतही आश्चर्य व्यक्त होत आहे.