शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

तळोजा-शीळ-कल्याण मेट्रो रेल्वेचा डीपीआर 15 दिवसांत 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2018 18:06 IST

तळोजा-शीळ-कल्याण मेट्रो रेल्वेचा सविस्तर प्रकल्प अहवाल येत्या 15 दिवसात सादर होणार असल्याची माहिती कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दिली आहे.  आज बुधवारी एमएमआरडीए आयुक्त यू. पी. एस. मदान यांच्याकडे पार पडलेल्या बैठकीत ही माहिती आयुक्त मदान यांनी खासदार शिंदे याना दिले.

कल्याण : तळोजा-शीळ-कल्याण मेट्रो रेल्वेचा सविस्तर प्रकल्प अहवाल येत्या 15 दिवसात सादर होणार असल्याची माहिती कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दिली आहे.  आज बुधवारी एमएमआरडीए आयुक्त यू. पी. एस. मदान यांच्याकडे पार पडलेल्या बैठकीत ही माहिती आयुक्त मदान यांनी खासदार शिंदे याना दिले. यावेळी महापौर राजेंद्र देवळेकर आणि गटनेते रमेश जाधव उपस्थित होते. कल्याण-शीळ-तळोजा या मेट्रो मार्गाचे सादरीकरण खासदार शिंदे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केले होते.  कल्याण-शीळ-तळोजा मेट्रो रेल्वेच्या सविस्तर अहवाल येत्या 15 दिवसात पूर्ण होणार असून कल्याण रिंगरोडचे कामही येत्या महिन्या भरात सुरु होईल असे खासदार शिंदे यांनी सांगितले. त्यामुळे वाहतूक कोंडीवर मात करणे शक्य होणार आहे. मेट्रोचा सविस्तर प्रकल्प अहवाल नऊ महिन्यांत तयार होईल, असे एमएमआरडीएने गेल्या वर्षीच्या फेब्रुवारीत सांगितले होते, त्याबाबत खासदार शिंदे यांनी विचारणा केली असता, हे काम अंतिम टप्प्यात असून येत्या 15 दिवसांत सविस्तर प्रकल्प अहवाल निश्चित केला जाईल आणि त्यानंतर तो मंजुरीसाठी मुख्यमंत्र्यांना सादर केला जाणार आहे.  कल्याण आणि डोंबिवलीतील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी आवश्यक असलेल्या रिंग रुटचे कामही अद्याप सुरू न झाल्याबद्दल खा. डॉ. शिंदे यांनी नाराजी व्यक्त केली. त्यावर जवळपास 80 टक्के भूधारकांनी संमतीपत्ने दिली असून दुर्गाडी ते गांधारे या टप्प्याचे काम येत्या महिन्याभरात सुरू करण्याची ग्वाही मदान यांनी दिली. रिंग रूट प्रकल्पाचे सात टप्पे करण्यात आले असून दुर्गाडी ते गांधारे या चौथ्या टप्प्याचे काम सर्वप्रथम सुरू होणार आहे. दुर्गाडी ते डोंबिवली या टप्प्यातील भूसंपादनात काही अडचणी असून हे कामही येत्या महिन्याभरात मार्गी लावण्याचा प्रयत्न असल्याची माहिती श्री. मदान यांनी दिली. यासंदर्भात कल्याण-डोंबिवली महापालिका आयुक्त पी. वेलारासू यांच्यासमवेत गुरु वारी 1 मार्च रोजी बैठकीचे आयोजन केल्याची माहिती खासदार शिंदे यांनी दिली.डोंबिवलीहून ठाणे-मुंबईला थेट येता यावे, यासाठी महत्त्वाच्या असलेल्या मोठागाव ठाकूर्ली-माणकोली खाडी पुलाचे माणकोली बाजूकडील काम रखडल्याचाही मुद्दाही खासदारांनी उपस्थित केला. यासंदर्भात वारंवार पत्रव्यवहार केला. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीतही अनेकदा विषय मांडला. स्वत: पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनीही या कामाला गती देण्याचे निर्देश दिल्याकडे खासदारांनी सांगितले. त्यावर माणकोली बाजूकडील भूसंपादनाच्या प्रक्रि येने वेग घेतला असल्याचे आयुक्त मदान यांनी सांगितले. जिल्हाधिका-यांच्या स्तरावरील सर्वेक्षण प्रक्रि-या पूर्ण झाली असून त्यानुसार आता भूसंपादन अधिका-यांची नियुक्ती करण्यात आली आहे. येत्या महिन्याभरात भूसंपादनाची प्रक्रि-या पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे असे मदान यानी स्पष्ट केले आहे. 

टॅग्स :thaneठाणे