शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्राच्या खाली एकामागोमाग एक ३० धक्के! अमेरिकेच्या समुद्र किनाऱ्यावर सहा फूट लाटा उसळल्या, जगभरात हाहाकार... 
2
कृषिमंत्री कोकाटे किती मिनिटे रमी खेळत होते?, विधिमंडळ चौकशी अहवालात उघड, रोहित पवारांचा दावा
3
दोन मोर्चांवर वेगळे लढले...! विरूच्या निधनानंतर महिन्याभराने जयनेही प्राण सोडले; गीरचे जंगल आता त्यांच्या मैत्रीच्या गोष्टी सांगणार...
4
"हा माझा नवरा"; इन्स्पेक्टरच्या मृत्यूनंतर हायव्होल्टेज ड्रामा; मृतदेहासाठी २ बायका भिडल्या, अखेर...
5
NSDL IPO: ८०० रुपये प्राईज बँड, १२७ रुपये GMP; LIC नं केली गुंतवणूक, तुमचा विचार काय?
6
सलमान खानला भेटण्यासाठी ३ अल्पवयीन मुलांनी केला मोठा कांड; २ राज्यांची पोलीस झाली हैराण
7
रश्मिका मंदानाची कॉपी? छत्रपती संभाजीनगरची लेक, विजय देवरकोंडासोबत करणार रोमान्स
8
'ऑपरेशन महादेव'नंतर आता 'ऑपरेशन शिवशक्ती' सुरू! भारतीय सैन्याने दोन दहशतवाद्यांना घातलं कंठस्नान
9
थंडबस्त्यात गेला अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' सिनेमा, रेणुका शहाणे म्हणाल्या - "मला धक्काच बसला.."
10
कमाल! स्मार्टफोन App द्वारे आतड्यांतील बॅक्टेरियावर नियंत्रण, आली ओरल कॅप्सूल, कसा होणार फायदा?
11
Kamchatka Earthquake: ५ जुलैचे भविष्य ३० जुलैला खरे होणार? रशियातील भुकंपाच्या उंच लाटा जपानच्या किनाऱ्यावर धडकू लागल्या...
12
"दीड लाख देऊन इथं आलोय, मला बोलू द्या..."; संसदेत हजेरी लावणं खासदार राशीद यांना इतकं महाग का पडलं?
13
Reliance Jio ची आपल्या ग्राहकांना मोठी भेट; फक्त ₹५९९ मध्ये घरच्या TV ला बनवा कॉम्प्यूटर
14
PM किसान योजनेचा २० वा हप्ता जाहीर! २००० रुपये थेट बँक खात्यात, लगेच 'असं' तपासा तुमचं नाव!
15
भीक मागणाऱ्या व्यक्तीच्या दोन बायका, आता त्याची तक्रार तर ऐका; कलेक्टरकडे पोहोचला अन् म्हणाला...
16
Pranjal Khewalkar Arrest : मोबाईलमधून हाऊस पार्टीतील महिलांशी केलेली चॅटिंग व पार्टीचे व्हिडिओ सापडले
17
UPI मध्ये १ ऑगस्टपासून होणार बदल; बॅलन्स चेक ते ऑटो-पे पर्यंत सर्वकाही बदलणार, पाहा तुमच्यासाठी काय नवं?
18
Sonam Raghuvanshi : बेवफा सोनमवर चित्रपट येणार, 'हे' नाव असणार; दिग्दर्शकाने घेतली राजा रघुवंशीच्या भावाची भेट
19
Share Market Today: तेजीसह शेअर बाजाराची सुरुवात; Sensex १९० अंकांपेक्षा जास्त वधारला, 'या' शेअर्समध्ये तेजी
20
शेजारी राहणाऱ्या महिलेवर केले वार, गुप्तांगावरही ओरबाडलं अन् जंगलात फेकून दिलं! तरुण का झाला हैवान?

सहा सोनेरी पानांचा इतिहास मुलांना सांगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2018 01:03 IST

सावरकरांनी लिहिलेले ‘सहा सोनेरी पाने’ हे पुस्तक म्हणजे हिंदूंच्या दिग्विजयाचा इतिहास आहे.

ठाणे : सावरकरांनी लिहिलेले ‘सहा सोनेरी पाने’ हे पुस्तक म्हणजे हिंदूंच्या दिग्विजयाचा इतिहास आहे. इ.स. पूर्व कालखंडापासून ते स्वातंत्र्य मिळेपर्यंत या काळातील सहा महत्त्वाच्या लढाया आणि त्यात हिंदूंनी मिळवलेल्या विजयाची गाथा त्यात आहे. त्यामुळे शालेय अभ्यासक्रमात पाठ्यपुस्तक असावे, असे हे पुस्तक आहे. त्याचा अभ्यासक्रमात कधी समावेश करेल तेव्हा करू दे, मात्र तोपर्यंत आपण हे पुस्तक आणि त्यातील इतिहास मुलांना उलगडून सांगितला पाहिजे, असे मत गीता उपासनी यांनी व्यक्त केले.स्वा. वि.दा. सावरकर प्रतिष्ठानतर्फे सावरकर जयंतीनिमित्त पुरस्कार प्रदान सोहळा आणि व्याख्यानाचा कार्यक्रम सोमवारी मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या सभागृहात पार पडला. त्यावेळी स्वा. सावरकरांच्या सहा सोनेरी पाने या पुस्तकावर उपासनी यांनी व्याख्यान दिले. सहा सोनेरी पाने या पुस्तकातील पहिली चार सोनेरी पाने अर्थात चार मोठे विजय म्हणजे सावरकरांच्या भाषेत तो भारताचा प्राचीन इतिहास आहे. उर्वरित दोन सोनेरी पाने म्हणजे मुघल आणि इंग्रजांवर मिळवलेला विजय हा अर्वाचीन इतिहास आहे आणि या दोन विजयांबद्दल सविस्तर माहिती आहे, असे उपासनी म्हणाल्या. तर, पहिल्या चार लढायांमध्ये आपण राजकीय विजयाबरोबरच सांस्कृतिक, धार्मिक विजयही मिळवलेला आहे. मात्र, उर्वरित शेवटच्या दोन सोनेरी पानांना धार्मिक पराभवाची दुर्गंधी आहे. त्यातही पाश्चिमात्य आक्रमणांवर विजय मिळवतामिळवता आपल्या देशाचे दोन तुकडे झाले, इतकी धार्मिक अस्थिरता त्यावेळी होती, असे मत गीता उपासनी यांनी मांडले.पूर्वार्धात सावरकर स्मृती पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. टीजेएसबीचे सीईओ सुनील साठे हे यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आले. सांस्कृतिक क्षेत्रासाठी ज्येष्ठ नाटककार अशोक समेळ, शिक्षण क्षेत्रासाठी वीणा भाटिया, व्यवसाय क्षेत्रासाठी उल्हास प्रधान, कार्यक्षम नगरसेवक म्हणून दिलीप बारटक्के, समाजसेवक म्हणून बाळकृष्ण नातू, पत्रकारिता क्षेत्रासाठी मंगेश विश्वासराव यांना सन्मानित केले.हिंदुत्व हा सावरकरांचा ध्यास : ‘मला आतापर्यंत अनेक पुरस्कार मिळाले, मात्र सावरकरांच्या नावाने मिळालेला हा पुरस्कार माझ्यासाठी सर्वोच्च आहे. सावरकरांचे विश्व खूप मोठे आहे आणि इतक्या मोठ्या व्यक्तीच्या नावे आम्हाला पुरस्कार मिळाला, हे आमचे भाग्य आहे’, अशा शब्दांत समेळ यांनी पुरस्काराला उत्तर दिले. हिंदुत्व हा सावरकरांचा ध्यास होता. त्यामुळे या राष्टÑात आपण हिंदूंनी एकत्र येऊन हिंदुत्व जपले पाहिजे, असेही ते म्हणाले. यावेळी ज्येष्ठ अभिनेते रवी पटवर्धन, संस्थेचे अध्यक्ष विद्याधर ठाणेकर, दुर्गेश आकेरकर आदी उपस्थित होते.