शहरं
Join us  
Trending Stories
1
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
2
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
3
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
4
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
5
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
6
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
7
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
8
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
9
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
10
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
11
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
12
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
13
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
14
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
15
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
16
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
17
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
18
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
19
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
20
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
Daily Top 2Weekly Top 5

मतदानाच्या तीन दिवसांच्या ‘ड्राय डे’मुळे तळीरामांची मोठी गोची!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2019 06:16 IST

कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी शनिवारी (२७ एप्रिल) सायंकाळी ६ ते रविवारी आणि मतदानाच्या दिवशी म्हणजे सोमवारी (२९ एप्रिल) ठाणे जिल्हाधिकाऱ्यांनी ‘ड्राय-डे’ घोषित केला आहे.

जितेंद्र कालेकर ठाणे : कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी शनिवारी (२७ एप्रिल) सायंकाळी ६ ते रविवारी आणि मतदानाच्या दिवशी म्हणजे सोमवारी (२९ एप्रिल) ठाणे जिल्हाधिकाऱ्यांनी ‘ड्राय-डे’ घोषित केला आहे. पण, मुंबईत मात्र सोमवारी सायंकाळी ६ नंतर देशी विदेशी दारूची दुकाने खुली राहणार आहेत. त्यामुळे ठाण्यातील तळीरामांची गोची झाली असून, या तीन दिवसांमध्ये शासनाचाही सुमारे साडेचार कोटींचा, तर मद्य व्यावसायिकांचाही सुमारे १५ कोटींचा व्यवसाय बुडणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

निवडणूक आचारसंहिता लागू झाल्यापासून दारूचीबेकायदेशीर विक्री आणि निर्मितीला प्रशासनाने आळा घातला. पोलीस आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाची पथके त्यासाठी कार्यरत होती. लाखो लीटर दारू आणि रसायन या काळात जप्त करून नष्ट केले. आता परवानाधारक देशी, विदेशी मद्य, बीअर तसेच ताडीच्या घाऊक आणि किरकोळ विक्रेत्यांना २७ एप्रिलच्या सायंकाळी ६ वाजल्यापासून विक्रीला बंदी केली आहे. त्यानंतर, संपूर्ण ठाणे जिल्ह्यात २८ एप्रिल तसेच मतदानाच्या दिवशी म्हणजे २९ एप्रिल रोजी आणि मतमोजणीच्या दिवशी म्हणजे २३ मे रोजी पूर्ण दिवस बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी दिले आहेत. मुंबईतही याच चार दिवसांमध्ये मद्यविक्रीला बंदी केली आहे. परंतु, तिथे मतदानाच्या दिवशी सायंकाळी ६ पर्यंत ही बंदी आहे. त्यामुळे ठाण्यात जरी त्यादिवशी सायंकाळी ६ नंतर मद्याची दुकाने बंद असली, तरी मुंंबईत ही सोय होणार असल्यामुळे ठाण्यातील तळीरामांची काहीशी पंचाईत होणार आहे.

ठाणे जिल्ह्यात दिवसाला सरासरी एक लाख लीटर दारू रिचवली जाते. त्यापोटी दिवसाचा दीड कोटीचा महसूल गृहीत धरला, तरी तीन दिवसांमध्ये साडेचार कोटींच्या महसुलावर पाणी सोडावे लागणार आहे. जिल्ह्यातील सुमारे अडीच हजार देशी, विदेशी मद्य, ताडी आणि बीअरविक्रेत्यांचाही यात दिवसाचा पाच कोटींप्रमाणे सुमारे १५ कोटींचा व्यवसाय बुडणार आहे. त्यातही मुंबईत जर २९ एप्रिल रोजी सायंकाळी ६ नंतर दुकाने खुली राहण्यास अनुमती असेल, तर ठाण्यातही तशी परवानगी मिळण्यासाठी मद्यविक्रेत्यांकडून वरिष्ठ पातळीवरून प्रयत्न सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

मतदानाची वेळ २९ एप्रिल रोजी सायंकाळी ६ पर्यंत आहे. त्यानंतर मतदान अधिकारी मतदानकेंद्रावरून पॅकिंग आणि इतर प्रक्रिया करून मुख्यालयात येईपर्यंत रात्री उशीर होतो. त्यामुळे सुरक्षिततेच्या कारणास्तव २९ एप्रिल रोजी संपूर्ण दिवसभर मद्याची दुकाने बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. - राजेश नार्वेकर, जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी, ठाणे

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकElectionनिवडणूकVotingमतदान