शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये राडा! उपमुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर हल्ला; दुसरीकडे सीपीएम आमदाराला मारहाण, गाडी फोडली
2
Anil Ambani ED: अनिल अंबानींची पुन्हा चौकशी होणार, ED नं १४ नोव्हेंबरला बोलावलं; प्रकरण काय?
3
भाजप कार्यकर्त्याने आधी दिल्लीत नंतर बिहारमध्ये मतदान केले; राहुल गांधींनंतर आप नेत्याने आरोप केला
4
Canada Visa Rules : कॅनडाने व्हिसा नियमांमध्ये केला मोठा बदल, भारतावर काय परिणाम होईल?
5
SBI नं रचला इतिहास, मार्केट कॅप १०० अब्ज डॉलर्सच्या पार; देशातील दिग्गजांच्या यादीत सामील
6
"माझ्या पप्पांना अडकवण्यात आलंय"; वडील जेलमध्ये, लेकीने अभ्यास सोडून केला प्रचार
7
Jara Hatke: चांदीचा वर्ख कसा तयार होतो माहितीय? वर्ख लावलेली मिठाई खावी की नाही? तुम्हीच ठरवा!
8
सोन्याकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलायला हवा? SBI ची मोठी मागणी, म्हणाले घरांमध्ये पडून असलेलं सोनं..
9
मोठी बातमी! पार्थ पवार जमीन व्यवहार प्रकरणी तहसीलदार सूर्यकांत येवले निलंबित
10
बिहार निवडणूक 2025: व्होटर स्लीपशिवाय मतदान नाही! सकाळी ६.३० वाजल्यापासून रांगेत असलेल्या महिलांना रोखले
11
चारित्र्यावर संशय! रस्त्यात दुसऱ्या तरुणासोबत बोलली म्हणून संतापलेल्या पतीने ब्लेडने कापले पत्नीचे नाक
12
याला म्हणतात ऑफर...! Tata च्या इलेक्ट्रिक कारवर ₹1.30 लाखांपर्यंतची सूट, Curvv EV अन् Punch EV वर मोठा डिस्काउंट
13
तो प्रवास ठरला अखेरचा..; प्रसिद्ध ट्रॅव्हल इन्फ्लुएंसर अनुनय सूदचे 32व्या वर्षी निधन
14
धक्कादायक! अखेर ७ सिंहांना मृत्यूदंडाची शिक्षा; 'जंगलाच्या राजा'ला मारण्याची तयारी कोण करतंय?
15
₹१६०० पर्यंत जाणार Paytm चा शेअर; एक्सपर्ट बुलिश, आजही शेअरमध्ये मोठी तेजी
16
'एकाच ठिकाणी.. कुठे तरी राहा' राज ठाकरेंनी पिट्याभाईला सुनावले
17
...अन् व्हीलचेअरवर बसलेल्या प्रतीकासाठी PM मोदींनी स्वतः आणून दिला तिच्या आवडीचा पदार्थ (VIDEO)
18
राजा भैय्याच्या शस्त्रपूजेचा पोलिस तपास अहवाल आला; दसऱ्याला डझनभर शस्त्रांचे पूजन केले होते
19
Video - बापाची धडपड! ट्रॅफिकमध्ये अडकलेली रुग्णवाहिका, आजारी लेकीला उचलून घेऊन...
20
मुलांसाठी जबरदस्त आहे 'ही' स्कीम, अनेक योजना याच्यासमोर फेल; रोज फक्त ₹८.५ रुपये वाचवून व्हाल लखपती

प्रदूषणकारी कारखान्यांकडून दंड घ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2018 00:03 IST

वनशक्ती ठाम; हरित लवादासमोर जुलैत सुनावणी

- मुरलीधर भवार डोंबिवली : रासायनिक सांडपाण्यावर प्रक्रिया न करता उल्हास नदी व कल्याण खाडीत ते सोडून प्रदूषण करणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था, एमआयडीसी आणि सांडपाणी प्रक्रिया केंद्रांना राष्ट्रीय हरीत लवादाने ठोठावलेला १०० कोटी रुपयांचा दंड भरावाच लागेल याकरिता ‘वनशक्ती’ जुलै महिन्यात लवादासमोर होणाºया सुनावणीच्या वेळी आग्रही भूमिका घेणार आहे.सुमारे दोन वर्षापूर्वी डोंबिवली रासायनिक सांडपाणी प्रक्रिया केंद्र, अंबरनाथ रासायनिक सांडपाणी प्रक्रिया केंद्र, एमआयडीसी, कल्याण- डोंबिवली महापालिका, उल्हासनगर महापालिका आणि बदलापूर व अंबरनाथ पालिका या सगळ््यांना मिळून १०० कोटी रुपयांचा दंड लवादाने ठोठावला होता. या खटल्यात वनशक्तीने थेट प्रतिवादी न केलेले कारखानदार उच्च न्यायालयात गेले. उच्च न्यायालयाने लवादाच्या आदेशाला स्थगिती दिली. सर्वोच्च न्यायालयात ‘वनशक्ती’ने अपील केले व उच्च न्यायालयाची स्थगिती सर्वोच्च न्यायालयाने उठवली. तसेच संबंधितांनी दंड भरणे आवश्यक असल्याचे स्पष्ट केले. उच्च व सर्वोच्च न्यायालयात कारखानदारांनी प्रदूषणाला ते जबाबदार नसल्याचे स्पष्ट केले होते.लवादासमोर झालेल्या सुनावणीत कारखानदारांनी असा मुद्दा उपस्थित केला होता की, याचिकाकर्त्यानी आम्हाला प्रतिवादी केलेले नाही. त्यामुळे आम्ही दंड भरण्यास बांधिल नाही. त्यामुळे प्रदूषण नियंत्रण मंडळ व एमआयडीसी यांना जबाबदार धरावे. प्रतिवादी केले नसतानाही कारखानदारांना प्रदूषणाकरिता जबाबदार धरले जाऊ शकते यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेले सहा निकाल व लवादाने दिलेला एक निकाल याचे दाखले वनशक्तीच्या वकिलांनी दिले. त्यावर लवादाने दंडाची भरपाई करावीच लागेल, असे फटकारले होते. लवादाकडे पर्यावरणतज्ज्ञ उपलब्ध झाल्याने पुढील सुनावणी २६ जुलै रोजी होणे अपेक्षित आहे, अशी माहिती ‘वनशक्ती’चे अश्विन अघोर यांनी दिली आहे. या सुनावणीच्या वेळी सर्व संबंधितांनी त्याच दिवशी दंडाची रक्कम भरावी अशी आग्रही मागणी केली जाणार आहे, असे ते म्हणाले.दरम्यान प्रदूषण रोखण्यासाठी डोंबिवली रासायनिक सांडपाणी प्रक्रिया केंद्राचे अपग्रेडेशन करण्याकरिता एमआयडीसीने १०० कोटी रुपयांचा आराखडा तयार केला आहे. त्याची निविदा अद्याप निघालेली नाही. त्यासाठी ७५ टक्के निधी केंद्र सरकारकडून व २५ टक्के निधी कारखानदारांनी उभा करावयाचा आहे. मात्र ‘वनशक्ती’चा सरकारने ७५ टक्के निधी देण्यास विरोध आहे.प्रदूषित सांडपाणी खाडीत?अंबरनाथ सांडपाणी केंद्रातून प्रक्रिया करून सांडपाणी थेट खाडीत दूरवर सोडण्यासाठी १७ किलोमीटर लांबीची बंदीस्त वाहिनी टाकण्याचे प्रस्तावित आहे. ही वाहिनी बंदीस्त असल्यास त्याद्वारे वाहून नेले जाणारे सांडपाणी खरोखरच प्रक्रिया करून सोडले जात आहे की नाही याची शहानिशा करता येणार नाही.त्यामुळे वाहिनीच्या दरम्यान प्रत्येक एक किलोमीटरच्या अंतरावर सिमेंटचे चेंबर असावे. त्यातून प्रक्रिया केलेल्या सांडपाण्याचे नमूने गोळा करता येतील. अन्यथा प्रदूषित रासायनिक सांडपाणीच खाडीत सोडले जाण्याची शक्यता नाकारता येत नाही, अशी शंका ‘वनशक्ती’चे अघोर यांनी उपस्थित केली.

टॅग्स :pollutionप्रदूषणwater pollutionजल प्रदूषणthaneठाणे