शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी अशिक्षित असूनही रडकुंडीला आणलं', भुजबळांच्या टीकेवर मनोज जरांगेंचे जोरदार प्रत्युत्तर
2
दिल्लीनंतर मुंबई हायकोर्टालाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी; दोन्ही कोर्टात गोंधळ
3
सोन्या-चांदीच्या किंमतीत जोरदार तेजी; चांदीत २८०० रुपयांची वाढ, खरेदीपूर्वी जाणून घ्या लेटेस्ट रेट
4
नोकरी गमावल्यानंतर तुमचे गृहकर्ज, गाडीचा हप्ता भरला जाईल! काय आहे जॉब लॉस इन्शुरन्स? कसा मिळवायचा?
5
जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेत होते मंत्री, तेवढ्यात धडाधड कोसळलं छत, त्यानंतर...  
6
जीएसटी २.० साईड इफेक्ट...! इलेक्ट्रीक दुचाकी, कारच्या किंमती कमी कराव्या लागणार? ती वेळ आलीय... 
7
ज्वाला गुट्टानं ३० लीटर ब्रेस्ट मिल्क केले दान; 'या' खास कारणामुळे उचललं कौतुकास्पद पाऊल
8
काँग्रेसने शेअर केला PM मोदी आणि त्यांच्या आईचा Ai व्हिडिओ; BJP ने केला पलटवार...
9
"२ वाजल्यानंतर स्फोट होणार"; दिल्ली उच्च न्यायालय उडवून देण्याची धमकी; परिसरात खळबळ
10
५ राशींचे शनि आयुष्यभर कल्याण करतो, सुख-सुबत्ता-समृद्धी देतो; पैशांची चणचण नसते, शुभच होते!
11
Nepal Crisis : नेपाळमध्ये निदर्शकांनी हॉटेलला आग लावली, जीव वाचवण्यासाठी भारतीय महिलेने चौथ्या मजल्यावरून उडी मारली; जागीच मृत्यू
12
ज्ञानेश्वरी जयंती २०२५ : ज्ञानेश्वरीचे मूळ नाव माहितीय का? महिला संतांनी दिली होती ओळख!
13
इस्रायलचा रुद्रावतार! ७२ तासांत ६ मुस्लीम देशांवर हल्ला; २०० मृत्यू तर १ हजाराहून अधिक जखमी 
14
भोपाळच्या ९० डिग्री पुलाबद्दल खोटं बोललं गेलं? कंपनी ब्लॅकलिस्टेड झाल्यावर समोर आला भलताच रिपोर्ट!
15
पेटाचा विरोध, ‘माधुरी’ची कोल्हापुरातील घरवापसी लांबणीवर, सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयात काय घडलं?
16
शिकवणीसाठी घराबाहेर पडला तो परतलाच नाही; गोव्याचा १४ वर्षीय मुलगा प्रयागराजला सापडला, पण कसा?
17
ठरलं! सप्टेंबरअखेर नवी मुंबई विमानतळावरून पहिले उड्डाण, शहराचा चेहरामोहरा बदलणार; जोरदार तयारी सुरू
18
Video: प्राणीसंग्रहालयातील कर्मचाऱ्यावर सिंहाचा हल्ला, पर्यटकांसमोर फाडून खाल्ले...
19
Latur: 'ओबीसी आरक्षण संपले', घोषणा देत तरुणाने मांजरा नदीत उडी घेऊन संपवलं जीवन

रेल्वेच्या समस्यांवर तत्काळ तोडगा काढा, खासदारांनी घेतली रेल्वेमंत्र्यांची भेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2019 01:21 IST

मध्य रेल्वे महिनाभर विविध कारणांमुळे विलंबाने धावत असल्याने त्याचा फटका प्रवाशांना बसत आहे. या समस्यांवर लवकरात लवकर तोडगा काढावा...

डोंबिवली - मध्य रेल्वे महिनाभर विविध कारणांमुळे विलंबाने धावत असल्याने त्याचा फटका प्रवाशांना बसत आहे. या समस्यांवर लवकरात लवकर तोडगा काढावा, अशी मागणी कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी गुरुवारी केंद्रीय रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांच्याकडे भेटीदरम्यान केली. तत्पूर्वी त्यांनी या प्रश्नाबद्दल लोकसभेत आवाज उठवला. उपनगरी सेवेचा वारंवार बोजवारा उडत असून पावसाळ्यात परिस्थिती अधिकच गंभीर होईल, अशी भीती शिंदे यांनी लोकसभेत शून्य प्रहरात व्यक्त केली.

रेल्वे ही मुंबईकरांची जीवनरेषा आहे. दररोज ४२ लाख ५० हजार प्रवासी लोकलने प्रवास करतात. तर, लोकलच्या दररोज एक हजार ७७२ फेऱ्या होतात. मात्र, महिनाभर लोकल विलंबाने धावत आहेत. त्याचा फटका प्रामुख्याने नोकरदारांना बसत आहे. कार्यालयात पोहोचायला विलंब होत असल्याने लेटमार्क लागत आहे. मेगाब्लॉक घेऊनही रेल्वे वेळेवर धावत नाही. उपनगरी सेवेतून सर्वाधिक महसूल मिळूनही येथे समस्यांचे प्रमाण अधिक आहे. आठवड्यातून पाच वेळा वेळापत्रक बिघडलेले असते, याकडे शिंदे यांनी लक्ष वेधले.लोकलचा खोळंबा झाल्यास विनाविलंब जलद लोकल धीम्या मार्गावर अथवा धीम्या लोकल जलद मार्गावर वळवाव्यात. कल्याण-कसारा, कल्याण-कर्जत वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी तेथे जादा लोकल सोडाव्यात, अशीही मागणी शिंदे यांनी यावेळी केली.रुळांमध्ये पाणी साचू देऊ नकारेल्वेच्या नालेसफाईसंदर्भात शंका उपस्थित होत आहे. पावसाळ्यात रुळांमध्ये पाणी तुंबू नये, यासाठी रुळांपासून १० मीटर अंतरावर संरक्षक भिंत बांधावी. जेथे जास्त पाणी साचते, तेथे अधिक अश्वशक्तीचे पंप लावून पाणी काढावे, अशी मागणीही शिंदे यांनी केली.

टॅग्स :Mumbai Localमुंबई लोकलpiyush goyalपीयुष गोयल