शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीत केनियाचा खेळाडू आणि दोन प्रशिक्षकांवर भटक्या कुत्र्यांचा हल्ला; भाजप म्हणतेय... 'कलंक'
2
आता मिसाइल, दारूगोळा अन् शस्त्रास्त्र खासगी कंपन्या बनवणार; संरक्षण मंत्रालयाचा मोठा निर्णय
3
अरबी समुद्रात 'शक्ती' चक्रीवादळ घोंगावलं, हवामान खात्याचा इशारा; महाराष्ट्राला कितपत बसणार फटका?
4
...म्हणून अजित पवारांनी त्या गोष्टीचा फायदा उचलला; गृहराज्यमंत्री योगेश कदम : आदित्यला मंत्रिपद ही चूक
5
चालतंय तोवर चालवायचं असं तो वागला नाही; मग तुम्ही एवढी घाई का केली? कैफचा आगरकरांना सवाल
6
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना चौफेर यश, येणी वसूल-पैशांचा ओघ; बढती-नवी नोकरी, सरकारी लाभ!
7
दहा मुलांचे जीव गेल्यानंतर 'अ‍ॅक्शन'! विषारी कफ सिरप लिहून देणाऱ्या 'त्या' डॉक्टरला बेड्या 
8
महायुतीत संघर्ष पेटला! गणेश नाईकांचे 'ते' व्हिडिओ महाराष्ट्रात प्रदर्शित करू; शिंदेसेनेचा इशारा
9
पुढच्या वर्षी मेगा सरकारी नोकरभरती, एमपीएससी भरतीही रेंगाळणार नाही; फडणवीस यांची घोषणा
10
मोठी बातमी! दिवाळीच्या ताेंडावर वीज दरवाढीचा 'बॉम्ब'; प्रति युनिट ३५ ते ९५ पैशांपर्यंत बिल वाढणार
11
फरहान अख्तरच्या ड्रायव्हरने ३५ लिटर क्षमतेच्या टाकीत ६२१ लिटर इंधन भरले; बिल दिले अन्...
12
आजचे राशीभविष्य- ५ ऑक्टोबर २०२५: शुभ फलदायी दिवस, नवीन कार्यारंभ यशस्वीपणे करू शकाल
13
शेतकऱ्यांना पावसाचा, नाेकरदारांना महागाईचा फटका; दिवाळीपूर्वी काय काय होऊ शकते...
14
कोजागरी पौर्णिमा केव्हा साजरी करायची? यंदा मध्यरात्रीच आली, पंचांगकर्ते दा. कृ. सोमण म्हणाले...
15
पैसेच नव्हते, मग दुसऱ्याच्या तुटलेल्या बॅटने खेळलो, जिंकलोही; तिलक वर्माने सांगितला आपला प्रवास
16
सगळे काही मराठा समाजालाच का? ओबीसी नेत्यांचा सवाल, मोर्चावर ठाम
17
आज हायव्होल्टेज लढत! भारत-पाकिस्तान महिला संघ आज भिडणार, हस्तांदोलन करणार? 
18
राज-उद्धव एकत्र आल्याने काही फरक पडणार नाही : गृहराज्यमंत्री योगेश कदम
19
रोहित शर्माची उचलबांगडी, ऑस्ट्रेलिया दौऱ्यात शुभमन गिलकडे नेतृत्व; विराटसह संघात ठेवले हेच...
20
‘त्या’ कफ सिरपच्या नमुन्यांत भेसळ; उत्पादन, विक्री थांबवण्याचे आदेश

साध्या वाहनातून नको तर विमानाने लखनौला न्यावे: दुबेच्या साथीदारांची ठाणे न्यायालयात मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2020 01:54 IST

कुख्यात गुंड विकास दुबे याच्या वाहनाला झालेल्या अपघाताच्या थरारनाटयानंतरचा पूर्वानुभव लक्षात घेता कुठेही एखादा अपघात होऊ नये, यासाठी ठाण्यात पकडलेल्या दुबे याच्या दोन्ही साथीदारांना साध्या वाहनाऐवजी थेट विमानाने लखनौ येथे नेण्यात यावे, अशी मागणी आरोपीच्या वकिलांनी ठाणे न्यायालयात रविवारी केली. उत्तरप्रदेश पोलीस त्यांचा ताबा घेण्यासाठी येईपर्यंत त्यांची नवी मुंबईच्या तळोजा मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.

ठळक मुद्दे२१ जुलैपर्यंत मिळाली पोलीस कोठडीआरोपीच्या वकिलांनी ठाणे न्यायालयात रविवारी केली मागणीतूर्त नवी मुंबईच्या तळोजा न्यायालयात झाली रवानगी

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: उत्तरप्रदेशमधील कुख्यात गुंड विकास दुबे याच्या वाहनाला झालेल्या अपघाताच्या थरारनाटयानंतरचा पूर्वानुभव लक्षात घेता कुठेही एखादा अपघात होऊ नये, यासाठी ठाण्यात पकडलेल्या दुबे याच्या दोन्ही साथीदारांना साध्या वाहनाऐवजी थेट विमानाने लखनौ येथे नेण्यात यावे, अशी मागणी आरोपीच्या वकिलांनी ठाणे न्यायालयात रविवारी केली. दरम्यान, या दोघांनाही आता २१ जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.दुबे याचे साथीदार अरविंद त्रिवेदी उर्फ गुड्डन रामविलास त्रिवेदी (४६)आणि सुशील कुमार उर्फ सोनू सुरेश तिवारी (३०) या दोघांना शनिवारी मुंबईच्या दहशतवादविरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक दया नायक यांच्या पथकाने ठाण्यातून ११ जुलै रोजी अटक केली. त्यांना रविवारी ठाण्याच्या विशेष सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायाधीश रश्मी झा यांनी या दोघांनाही न्यायालयीन कोठडी दिली. उत्तरप्रदेश पोलीस त्यांचा ताबा घेण्यासाठी येईपर्यंत त्यांना नवी मुंबईच्या तळोजी मध्यवर्ती कारागृहात ठेवले जाणार आहे.दरम्यान, दोघांनाही वाहनातून कानपूर येथे घेऊन जाण्याऐवजी हवाई मार्गे विमानातून लखनौ हवाईतळावर नेण्यात यावे, अशी मागणी आरोपी त्रिवेदी आणि तिवारी यांचे वकील अनिल जाधव यांनी ठाणे न्यायालयात अर्जाद्वारे केली. त्यांची कोरोना टेस्टही केली जाणार आहे. त्यानंतर त्यांचा ताबा उत्तर प्रदेश पोलिसांना दिला जाणार असल्याची माहिती निरीक्षक नायक यांनी दिली. उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये झालेल्या आठ पोलीस कर्मचाऱ्यांच्या हत्या प्रकरणात विकास दुबे हा मोस्ट वॉन्टेड होता. तो पोलिसांबरोबर झालेल्या चकमकीत मारला गेल्यानंतर त्याचे साथीदार पसार झाले होते. त्यांच्यापैकीच दोघे ठाण्याच्या कोलशेत, ढोकाळी परिसरातील एका चाळीत लपल्याची माहिती मिळाल्यानंतर शनिवारी सकाळी दोघांनाही नायक यांच्या पथकाने अटक केली.विकास दुबेला नेतांना वाहनाला झालेला अपघात तसेच सध्याचा कोरोनाच्या प्रादुर्भावाची गंभीर स्थिती लक्षात घेता आरोपींच्या मनात भीतीचे वातावरण आहे. त्यामुळेच ठाणे न्यायालयाकडे आरोपींना विमानाने पोलिसांनी लखनौला घेऊन जाण्याची विनंती केल्याचेही अ‍ॅड. जाधव यांनी सांगितले.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीArrestअटक