शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Train Update: मध्य, हार्बर मार्गावरील लोकल रेल्वे सेवा रद्द; कुठून कुठपर्यंत सुरू?
2
'आम्हाला मतदान करा, राहुल गांधींना देशाचा पंतप्रधान करू', तेजस्वी यादवांची घोषणा
3
Mumbai Rains: मुंबईकरांसमोर आणखी एक संकट, मिठी नदीने धोक्याची पातळी गाठली, सतर्क राहण्याचा इशारा!
4
Mumbai Rain Updates Live: पावसात अडकलेल्यांसाठी मुंबई महापालिका सरसावली; पाणी, खाद्यपदार्थांचे वाटप
5
'नेहरूंनी पाकिस्तानला मदत केली होती', 'सिंधू जल' करारावरुन पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
6
उत्तराखंड विधानसभेत राडा, टेबल आपटलं, माईक तोडला, संतापलेल्या अध्यक्षा निघून गेल्या
7
पाकिस्तानची खोटी बडबड! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये गुडघे टेकले, आता परदेशात जाऊन मारतायत थापा
8
उपराष्ट्रपती निवडणुकीसाठी विरोधकांकडून उमेदवार जाहीर; सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती रिंगणात
9
ऑटो कंपन्यांवरील अरिष्ट टळले...! चीनने दरवाजे उघडले; रेअर अर्थ मेटलसह दोन वस्तूंवरील निर्बंध हटविले
10
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधू बाजी मारणार की महायुती मात देणार? निकालाची उत्सुकता शिगेला
11
GST बदलाच्या घोषणेनंतर 'या' ५ शेअर्समध्ये होणार मोठी वाढ? ब्रोकरेजकडून खरेदीचा सल्ला!
12
दिलीप प्रभावळकरांचा रोमांचक 'दशावतार'; कोकणातल्या मातीत घडणाऱ्या सिनेमाचा अंगावर काटा आणणारा ट्रेलर
13
"साहेब माझी आई हरवली"; तक्रार नोंदवण्यासाठी मुलगा पोलीस स्टेशनमध्ये पोहोचला, तपास सुरू होताच सगळ्यांना धक्का बसला!
14
१९४६ च्या कलकत्ता दंगलीत हजारो हिंदूंचे प्राण वाचवणारे गोपाल पाठा कोण होते? कोण मानतं हिरो, तर कुणी म्हणतं व्हिलन  
15
पापा की परी... सावधान! स्कुटरच्या हँडलमधून साप निघाला साप, तरुणीने उडीच मारली...
16
इंडियन ऑइलने अमेरिकेला दाखवला 'ठेंगा', रशियाकडून कच्च्या तेलाची खरेदी सुरुच राहणार...
17
VIDEO : किन्नरच्या सौंदर्यावर नेटकरी 'फिदा'! व्हिडिओ पाहून युजर्स म्हणतायत...; तुम्हीही थक्क व्हाल!
18
मिठी नदी धोक्याच्या पातळीवर; नदीलगतच्या कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवलं, बीकेसीत पाणी साचण्याची शक्यता
19
Mangalagauri 2025: मंगळगौरीचे पावित्र्य आणि माधुर्य दर्शवणारे दीनानाथ दलाल यांचे चित्र; पहा बारकावे!
20
ऋतुराजनं बॉलिंगमध्ये आजमावला हात; सिक्सर मारल्यावर विकेट्स घेत हिशोब केला चुकता (VIDEO)

साध्या वाहनातून नको तर विमानाने लखनौला न्यावे: दुबेच्या साथीदारांची ठाणे न्यायालयात मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2020 01:54 IST

कुख्यात गुंड विकास दुबे याच्या वाहनाला झालेल्या अपघाताच्या थरारनाटयानंतरचा पूर्वानुभव लक्षात घेता कुठेही एखादा अपघात होऊ नये, यासाठी ठाण्यात पकडलेल्या दुबे याच्या दोन्ही साथीदारांना साध्या वाहनाऐवजी थेट विमानाने लखनौ येथे नेण्यात यावे, अशी मागणी आरोपीच्या वकिलांनी ठाणे न्यायालयात रविवारी केली. उत्तरप्रदेश पोलीस त्यांचा ताबा घेण्यासाठी येईपर्यंत त्यांची नवी मुंबईच्या तळोजा मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.

ठळक मुद्दे२१ जुलैपर्यंत मिळाली पोलीस कोठडीआरोपीच्या वकिलांनी ठाणे न्यायालयात रविवारी केली मागणीतूर्त नवी मुंबईच्या तळोजा न्यायालयात झाली रवानगी

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: उत्तरप्रदेशमधील कुख्यात गुंड विकास दुबे याच्या वाहनाला झालेल्या अपघाताच्या थरारनाटयानंतरचा पूर्वानुभव लक्षात घेता कुठेही एखादा अपघात होऊ नये, यासाठी ठाण्यात पकडलेल्या दुबे याच्या दोन्ही साथीदारांना साध्या वाहनाऐवजी थेट विमानाने लखनौ येथे नेण्यात यावे, अशी मागणी आरोपीच्या वकिलांनी ठाणे न्यायालयात रविवारी केली. दरम्यान, या दोघांनाही आता २१ जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.दुबे याचे साथीदार अरविंद त्रिवेदी उर्फ गुड्डन रामविलास त्रिवेदी (४६)आणि सुशील कुमार उर्फ सोनू सुरेश तिवारी (३०) या दोघांना शनिवारी मुंबईच्या दहशतवादविरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक दया नायक यांच्या पथकाने ठाण्यातून ११ जुलै रोजी अटक केली. त्यांना रविवारी ठाण्याच्या विशेष सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायाधीश रश्मी झा यांनी या दोघांनाही न्यायालयीन कोठडी दिली. उत्तरप्रदेश पोलीस त्यांचा ताबा घेण्यासाठी येईपर्यंत त्यांना नवी मुंबईच्या तळोजी मध्यवर्ती कारागृहात ठेवले जाणार आहे.दरम्यान, दोघांनाही वाहनातून कानपूर येथे घेऊन जाण्याऐवजी हवाई मार्गे विमानातून लखनौ हवाईतळावर नेण्यात यावे, अशी मागणी आरोपी त्रिवेदी आणि तिवारी यांचे वकील अनिल जाधव यांनी ठाणे न्यायालयात अर्जाद्वारे केली. त्यांची कोरोना टेस्टही केली जाणार आहे. त्यानंतर त्यांचा ताबा उत्तर प्रदेश पोलिसांना दिला जाणार असल्याची माहिती निरीक्षक नायक यांनी दिली. उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये झालेल्या आठ पोलीस कर्मचाऱ्यांच्या हत्या प्रकरणात विकास दुबे हा मोस्ट वॉन्टेड होता. तो पोलिसांबरोबर झालेल्या चकमकीत मारला गेल्यानंतर त्याचे साथीदार पसार झाले होते. त्यांच्यापैकीच दोघे ठाण्याच्या कोलशेत, ढोकाळी परिसरातील एका चाळीत लपल्याची माहिती मिळाल्यानंतर शनिवारी सकाळी दोघांनाही नायक यांच्या पथकाने अटक केली.विकास दुबेला नेतांना वाहनाला झालेला अपघात तसेच सध्याचा कोरोनाच्या प्रादुर्भावाची गंभीर स्थिती लक्षात घेता आरोपींच्या मनात भीतीचे वातावरण आहे. त्यामुळेच ठाणे न्यायालयाकडे आरोपींना विमानाने पोलिसांनी लखनौला घेऊन जाण्याची विनंती केल्याचेही अ‍ॅड. जाधव यांनी सांगितले.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीArrestअटक