शहरं
Join us  
Trending Stories
1
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
2
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
3
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
4
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
5
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
6
भारतीय रेल्वेने चीन, ब्रिटन, अमेरिका यासारख्या देशांनाही टाकलं मागे; कामगिरी पाहून कराल सलाम
7
सामना राजस्थानकडे झुकलेला, पण १३व्या षटकात विराटने एक इशारा केला आणि बाजी पलटली, नेमकं घडलं काय?  
8
ना लॉक इन पीरिअड, ना पेनल्टी; जोपर्यंत मन करेल FD मध्ये पैसे ठेवा, हवं असल्यास ATM मधून काढून घ्या
9
"आमचं त्यांच्यासोबत भांडण झालं होतं, त्यानंतर…’’, पहलगामध्ये हल्ला करणाऱ्या दहशतावाद्याचा फोटो काढणाऱ्या महिलेचा दावा
10
आधी रुग्णालयात अरेरावी करणारी 'मनीषा' रात्री तोंड लपवून आली; शेवटच्या भेटीचा सीन रीक्रिएट
11
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
12
Stock Market Today: मे सीरिजच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी; Sensex २५० अंकांनी वधारला, रियल्टी-मेटलमध्ये तेजी
13
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
14
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
15
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
16
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
17
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
18
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
19
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
20
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?

ठामपा काेरोना वॉररूमची यंत्रणाही कोलमडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2021 04:39 IST

ठाणे : ठाण्यात एकीकडे ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत आहे. रेमडेसिविरचे इंजेक्शन मिळविण्यासाठीही रुग्णांच्या नातेवाइकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. ...

ठाणे : ठाण्यात एकीकडे ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत आहे. रेमडेसिविरचे इंजेक्शन मिळविण्यासाठीही रुग्णांच्या नातेवाइकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. मृतदेह कच-याच्या पिशवीत बांधून दिले जात आहेत. रुग्णालयात बेड मिळविण्यासाठी रुग्णांच्या नातेवाइकांची धडपड सुरू आहे. असे असताना ठाणे महापालिकेच्या वॉररूमची यंत्रणादेखील कोलमडून गेली आहे. विशेष म्हणजे रुग्णाला रुग्णालयात बेड नसल्याचे सांगून त्याला घरीच ठेवा, मेडिसिन द्या, असे उत्तर महापालिकेच्या एका कर्मचा-याने दिले होते. त्या रुग्णाचा मंगळवारी मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

ठाण्यात रोजच्या रोज दीड हजारांहून अधिक नवे रुग्ण वाढत आहेत. त्यात मागील काही दिवसांत मृत्यूचे प्रमाणदेखील वाढले आहे. तसेच ऑक्सिजन, रेमडेसिविरचा तुटवडा आजही शहराला जाणवत आहे. त्यामुळे रुग्णांना चांगली सुविधा मिळावी, रुग्णवाहिका वेळेत मिळावी, बेड उपलब्ध करून देण्यासाठी महापालिकेने कोविड वॉररूम सुरू केली आहे. परंतु, तिचे बहुतेक नंबर उचलले जात नसल्याचा वाईट अनुभव अनेक ठाणेकरांना येत आहे. त्यामुळे ही वॉररूम नेमकी कशासाठी सुरू केली, तिचा उद्देश काय, असे सवाल होऊ लागले आहेत. त्यातही एखाद्या वेळेस फोन उचलला गेला, तर बेड उपलब्ध नाही, रुग्णवाहिका नाही, अशी उडवाउडवीचीच उत्तरे दिली जात असल्याचा आरोप रुग्णांच्या नातेवाइकांनी केला आहे.

चार दिवसांपूर्वी घोडबंदर भागातील एका रुग्णाला जास्तीचा त्रास होत होता. त्यामुळे त्याच्या नातेवाइकाने वॉररूमला फोन केला होता. परंतु, त्याला प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे त्याने प्रभाग समितीमधील ज्या कर्मचा-याकडे याची जबाबदारी दिली आहे, त्यांना संपर्क साधला, तर त्या कर्मचा-यानेदेखील उडवाउडवीची उत्तरे दिली. रुग्णालयात बेडच उपलब्ध नसल्याचे उत्तर त्याने दिले. तुम्ही रुग्णाला घरीच ठेवा. त्याला गोळ्या द्या. तो घरीच बरा होईल, असेही त्याने सांगितले. परंतु, रुग्णाची प्रकृती खालावली असल्याने त्याला तत्काळ बेड उपलब्ध करून द्यावा, अशी विनंती करूनही त्याला बेड काही मिळाला नाही. अखेर, मंगळवारी त्याची प्राणज्योत मालवली.

......

आम्ही तीन दिवसांपूर्वी महापालिकेच्या वॉररूमला कॉल केला होता. परंतु, तेथून प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे आम्ही प्रभाग समितीमधील संबंधित कर्मचा-याला फोन केला, तर त्याने रुग्णाला घरीच ठेवा, असे सांगितले. त्याला रुग्णाची प्रकृती खालावली असल्याचे सांगितल्यानंतरही त्याने प्रतिसाद दिला नाही. त्यानंतर मंगळवारी आमच्या नातेवाइकाची प्राणज्योत मालवली. यात पालिकेच्या त्या कर्मचा-याची चूक असून त्याच्यावर कारवाई व्हावी.

(सुरेश यादव, रुग्णाचे नातेवाईक)