शहरं
Join us  
Trending Stories
1
"कतारवर हल्ला म्हणजे अमेरिकेवर हल्ला, पुन्हा असं घडलं तर..."; ट्रम्प यांचा इस्रायलला इशारा
2
महाराष्ट्रात 'जम्बो'भरती! ४ ऑक्टोबरला एकाचवेळी तब्बल १०,३०९ उमेदवार शासकीय सेवेत होणार दाखल
3
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
4
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
5
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
6
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
7
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
8
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
9
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
10
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
11
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
12
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
13
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
14
संविधान सत्याग्रह पदयात्रेदरम्यान पोलिसांकडून पाळत, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचे सरकारला आव्हान, म्हणाले...
15
NHIDCL: एनएचआयडीसीएलमध्ये नोकरी, 'या' पदांसाठी भरती; १ लाख ५० हजारांपर्यंत पगार!
16
वय वर्ष ३१, संपत्ती ₹२१,१९० कोटी! कोण आहे भारतातील सर्वात तरुण अब्जाधीश? काय काम करतो?
17
लोकसंख्येतील बदल घुसखोरीपेक्षाही घातक...! असं का म्हणाले पंतप्रधान मोदी? देशाला दिला गंभीर इशारा
18
'ओला दुष्काळ जाहीर करा', उद्धव ठाकरेंनी दाखवले CM फडणवीसांचे पत्र, म्हणाले, "मलाही वेदना झाल्या.."
19
CM फडणवीसांचा ‘तो’ Video विरोधकांनी दाखवला; म्हणाले, “गांभीर्याने विचार करा, असले राजकारण...”
20
शौक बड़ी चीज है! १७ व्या वर्षी iPhone 4, iPad 2 साठी विकली किडनी, आता आयुष्यभराचं दुखणं

मिठाई दुकानांनी नियम बसवला धाब्यावर तर काहींनी केलं नियमांचं पालन

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2020 16:45 IST

Sweet Shop Mithai : मिठाई केव्हापर्यंत खाता येईल यासंबधी सूचना देणारी दिनांक म्हणजेच ‘बेस्ट बिफोर’ ही मिठाईच्या ट्रे समोर लिहीणे अन्न व औषध प्रशासनातर्फे बंधनकारक करण्यात आले आहे

कुलदीप घायवट

कल्याण - आता नवरात्री, दसरा आणि दिवाळी सणानिमित्त मोठ्याप्रमाणात मिठाईची खरेदी ग्राहकांकडून केली जाते.  मात्र ग्राहकांना विकत घेतलेली मिठाई किती कालावधीपर्यंत खाता येईल, याची माहिती मिळत नाही. यासाठी मिठाई केव्हापर्यंत खाता येईल यासंबधी सूचना देणारी दिनांक म्हणजेच ‘बेस्ट बिफोर’ ही मिठाईच्या ट्रे समोर लिहीणे अन्न व औषध प्रशासनातर्फे बंधनकारक करण्यात आले आहे. मात्र कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील मिठाई दुकानदारांनी हा नियम धाब्यावर बसविला आहे. महापालिका क्षेत्रातील ७ दुकानांची पाहणी केली असता, फक्त दोन नामांकित मिठाई दुकानदारांनी नियमांची अंमलबजावणी केली असल्याचे दिसून आले. 

अन्न व औषध प्रशासनाने १ ऑक्टोबर २०२० पासून प्रत्येक खुल्या मिठाईच्या ट्रे वर बेस्ट बिफोर दिनांक टाकल्याचे बंधनकारक केले आहे. विक्रेत्यांना या नियमांचे पालन न  केल्यास दुकानदारांवर कारवाई करण्यात येणार आहे. मात्र कल्याण येथील रामबाग, संतोषी माता रोड, गौशाळा रोड येथील दुकानांची पाहणी केली असता, कोणत्याही विक्रेत्याने नियमांचे पालन केले नाही. तर, डोंबिवली पूर्वेकडील फडके रोड आणि कल्याण रेल्वे स्थानक रोड येथील झुंजारराव नगर येथील नामांकित मिठाई विक्रेत्यांनी नियमांची अंमलबजावणी केली आहे.

अन्न आणि औषध प्रशासनाने दिलेल्या सर्व नियमावलीचे पालन केले जात आहे. याबाबत ग्राहकांमध्येही जागृती आहे. या नवीन पध्दतीचे ग्राहकांकडून स्वागत केले जात आहे. सध्या बाजारातील रेलचेल कमी आहे. असे, मिठाई विक्रेते श्रीपाद कुळकर्णी म्हणाले.

खूप चांगला नियम शासनाने सुरू केला आहे. यामुळे दुकानदारांकडून होणारी फसवणूक कमी होईल. शिळी मिठाई खाऊन विषबाधा होणाऱ्या घटनेवर लगाम लागेल, अशी प्रतिक्रिया ग्राहकांनी दिली. दरम्यान, लाडूसारखी मिठाई तीन-चार दिवस टिकते. मग दोनच दिवस त्याची बेस्ट बिफॉर का आहे. काहीवेळा बाहेरगावी जाताना, नातेवाईकांना मिठाई घेऊन जाताना आदल्या दिवशी खरेदी केली जाते. त्यानंतर इच्छितस्थळी पोहचेपर्यंत मिठाई बेस्ट बिफॉरची तारीख निघून जाते, मग ती मिठाई शिळी होईल का, असे प्रश्न ग्राहकांच्या ग्राहकांच्या मनात तयार झाले आहेत. 

शासनाकडून, अन्न आणि औषध प्रशासनाने दिलेल्या नियमाचे त्वरित पालन केले. सर्व मिठाईच्या ट्रे समोर बेस्ट बिफॉर याची माहिती लिहिली आहे. ग्राहक मिठाई खरेदी करताना, खाताना नेहमी जागृत असतात. काही ग्राहक यासंदर्भात अनभिज्ञ असतात. ग्राहकांनी सजग राहून दुधाची मिठाई २४ तास तर, लाडू, मोतीचूर यांसारखी मिठाई ४८ तासांच्या आत खावी.

- भूषण गवळी, मिठाई विक्रेते 

.कल्याण, डोंबिवली येथील आठ दुकानांची पाहणी केली असता, येथील दुकानांदारांनी नियमांचे पालन केल्याचे आढळून आले. व्यापारी संघटनेशी संपर्क साधून नियमांची अंमलबजावणी करण्याबाबत जागृत करत आहोत.

- धनंजय काडगे, सहाय्यक आयुक्त, अन्न सुरक्षा विभाग, कल्याण 

टॅग्स :foodअन्नkalyanकल्याण