शहरं
Join us  
Trending Stories
1
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
2
२०७ खुनाचा आरोप, तिला पकडण्यासाठी होते २ कोटींचे इनाम ! पण तिच्या 'या' निर्णयाने तिलाच मिळतील २५ लाख
3
कमाल झाली! हसरंगाचा बॉल स्टंपला लागला, पण नशिबाच्या जोरावर बॅटर Not Out राहून चमकला (VIDEO)
4
शेअर असावा तर असा...! 5 वर्षांत लखपतींना केलं करोडपती; TV-AC अन् वॉशिंग मशीन तयार करते कंपनी
5
"होय, मतचोरी झाली !" मत चोरीतूनच भाजप सत्तेत; काँग्रेसच्या आरोपाला नक्षल्यांचे समर्थन
6
Women's Asia Cup 2025 Final : भारताची फायनलमध्ये धडक! चीनचा हिशोब चुकता करुन इतिहास रचण्याची संधी
7
IND vs PAK Head To Head Record : पाकचा नवा डाव; पण टीम इंडियाविरुद्ध फिकी ठरेल त्यांची ही चाल, कारण...
8
लाईफबॉय साबण ८, डव शाम्पू ५५, टूथपेस्ट १६ रुपयांनी स्वस्त झाली; हिंदुस्तान युनिलिव्हरची यादी आली...   
9
आता पश्चाताप करून काय उपयोग? रोखण्याचा प्रयत्न करूनही तरुणीनं खोल पाण्यात उडी घेतली; थरकाप उडवणारा VIDEO
10
सासऱ्यावर गोळी झाडली, स्वतःला वाचवण्यासाठी पळत सुटला अन् पुराच्या पाण्यात पडला जावई! पुढे जे झालं...
11
असुरक्षित! पहाटे पुणे स्टेशनला उतरलेल्या तरुणाने पैसे न दिल्याने पोटात चाकूने वार
12
उल्हासनगरातील हॅन्ड्रेड बारमध्ये महिला वेटर्सचे अश्लील चाळे, महिला वेटर्ससह ९ जणांवर गुन्हा 
13
घरात ‘टॉप टू बॉटम’ डॉक्टर ; पण आयएएस झाले आणि लोकसेवेत आले...
14
योगेश आळेकरी यांना मिळाली नवीकोरी दुचाकी; पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार पण...
15
Sonu Sood : दिलदार सुपरहिरो! "रोटी का कर्ज चुकाना है"; पंजाबमधील पूरग्रस्तांसाठी सोनू सूदचा पुढाकार
16
मध्य प्रदेश मुख्यमंत्र्यांचा 'ऑन द स्पॉट' निर्णय; महिंद्राचा रतलामचा डीलर ४२० मध्ये तुरुंगात जाणार...
17
'तुम्ही जीआरमध्ये फेरफार करून बघा, मग तुम्हाला मराठे कळतील'; मनोज जरांगेंचा इशारा
18
VIRAL : चोरांनी कार चालकावर झाडली गोळी, पण पुढे जे झालं त्यानं स्वतःच घाबरले! Video बघून सगळेच झाले हैराण
19
या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले...
20
जगातला 'असा' एकमेव देश, जिथे घरात पाळल्या जातात मगरी; विकून होते कोटी रुपयांची कमाई!

कृषी विधेयकांवर स्वाक्षरी न करण्याचे स्वराज इंडियाचे राष्ट्रपतींना साकडे 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2020 19:33 IST

राष्ट्रपती यांना ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्याद्वारे ठाणे जिल्ह्यातील स्वराज इंडियाच्या कार्यकर्त्यांनी शुक्रवारी दिले आहे. 

ठाणे : केंद्रातील भाजपा सरकारने लोकसभा आणि राज्यसभेत जनमतांद्वारे मंजूर केलेले कृषी कायदे आपल्या अंतिम स्वाक्षरीसाठी पाठवले जात आहे. त्यावर स्वाक्षरी करू नये, या मागणीचे निवेदन राष्ट्रपती यांना ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्याद्वारे ठाणे जिल्ह्यातील स्वराज इंडियाच्या कार्यकर्त्यांनी शुक्रवारी दिले आहे. 

राष्ट्रपती यांच्या स्वाक्षरीसाठी पाठवलेल्या या तीन विधेयकांवर राष्ट्रपतींनी स्वाक्षरी न करता ते संसदेला चर्चा करण्यासाठी आणि समितीची निवड करण्यासाठी पाठवा, अशी मागणी देशातील 95 टक्के बाधित शेतकऱ्यांच्या माध्यमातून करीत असल्याचे या कार्यकर्त्यांनी निवेदनाद्वारे राष्ट्रपती यांच्या निदर्शनास आणून दिले आहे. यासाठी जिल्हाधिकारी यांना भेटलेल्या शिष्टमंडळात स्वराज इंडियाचे कार्यकर्ते व कर्मचारी आणि कामगार नेते भास्कर गव्हाळे, लिलेश्वर बनसोड आदी होते. आपल्या देशात सुमारे 85 टक्के शेतकर्‍यांची पाच एकरपेक्षा कमी शेती आहे. या विधेयकामुळे शेतकरी जमीनदोस्त होण्याची भीती आहे, या कार्यकर्त्यांनी निवेदनाद्वारे व्यक्त केली आहे.         या कायद्यांनुसार कृषी बाजार कायम राहील, पण बाजाराबाहेरील शेतीमाल कोणत्याही निर्बंधाशिवाय खरेदी करता येईल व विकू शकेल, यामुळे शेतकर्‍याची चिंता व्यक्त करणारे निवेदन या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे. आश्चर्य म्हणजे पंतप्रधान आपले तीनही कायदे मंजूर होताच सतत शेतीमालाची बाजारपेठ आणि शेतीमालाच्या किमतींची किंमत सांगत असतात. पण या विषयी त्यांना पुन्हा विचारल्यावर एमएसपीला कायदेशीर भाग का बनवू नये? याविषयी मात्र पंतप्रधानांनी अजूनही मौन मोडलेले नाही, असा आरोप ही त्यांनी या निवेदनात केला आहे.देशात कोणताही कायदा बनवण्याची प्रक्रिया सुरू होते, तेव्हा त्यावर संपूर्ण देशात चर्चा होत असते. परंतु हे तीन कायदे आणण्यापूर्वी कोणतीही चर्चा झाली नाही, देशातील लोकशाही आणि लोकशाही मूल्ये संपवण्याचे मोठे षडयंत्र असल्याचा आरोपही या कार्यकर्त्यांनी केला आहे.