शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
2
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
3
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
4
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
5
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
6
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
7
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
8
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
9
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
10
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
11
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
12
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
13
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
14
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
15
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
16
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
17
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
18
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
19
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
20
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल

स्वामी विवेकानंद व्याख्यानमालेला डोंबिवलीकरांचा उदंड प्रतिसाद, तीन दिवस चालणार व्याख्यानमाला

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2018 10:57 IST

आपल्या देशाला विश्वगुरू पदापर्यंत नेण्यासाठी स्वतः आत्मचिंतन करून स्वतः जीवनात बदल करण्याची आवश्यकता आहे. यानेच समाज बदलेल व समाज जर एकजुटीने सामुदायिक भावनेने उभा राहिला तरच त्याला विजिगिषु म्हणता येईल असे मार्गदर्शनपर उद्दगार  ज्येष्ठ पत्रकार अरुण करमरकर यांनी व्यक्त केले.

डोंबिवली- आपल्या देशाला विश्वगुरू पदापर्यंत नेण्यासाठी स्वतः आत्मचिंतन करून स्वतः जीवनात बदल करण्याची आवश्यकता आहे. यानेच समाज बदलेल व समाज जर एकजुटीने सामुदायिक भावनेने उभा राहिला तरच त्याला विजिगिषु म्हणता येईल असे मार्गदर्शनपर उद्दगार  ज्येष्ठ पत्रकार अरुण करमरकर यांनी व्यक्त केले.

राष्ट्रीय शिक्षण संस्थेच्या माध्यमातून दरवर्षीप्रमाणे यंदाही विवेकानंद पुरस्कार २०१८ व व्याख्यानमाला घेण्यात येते. त्याचा शुभारंभ बुधवारी सायं. 7 वाजता ज्येष्ठ पत्रकार अरुण करमरकर यांच्या व्याख्यानाने झाली.

स्वामी विवेकानंदानी विजिगिषु भारतचे स्वप्न पाहिले यासाठी समाजाच्या ताकदीची पुर्नस्थापना करणे आवश्यक असून यासाठी समाजाचे संघटन, मनुष्य निर्माण व राष्ट्र उभारणी हे लक्ष ठेवले.  स्वातंत्र्यापूर्वी भारताची जगातील प्रतिमा ही अंधश्रद्धाळू व दुर्बल अशी होती. यानंतर भारतातील शास्त्रज्ञांनी दिलेल्या योगदानानी ही प्रतिमा बदलण्यास मदत झाली असे ते म्हणाले.

राष्ट्रीय शिक्षण संस्थेचे यंदा सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे. त्यानिमित्ताने विविध उपक्रम घेण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले.तीन दिवस चालणाऱ्या या व्यख्यानमालेचा समारोप ख्यातनाम अभ्यासक, लेखक सेवानिवृत्त आयएएस अधिकारी अविनाश धर्माधिकारी यांच्या व्याख्यानाने होणार आहे. युवकांना ते मार्गदर्शन करतील, त्यानाच यंदाचा संस्थेमार्फत दिला जाणारा मानाचा "स्वामी विवेकानंद" पुरस्कार शुक्रवारी संध्याकाळी 6.30 वाजता प्रदान करण्यात येणार आहे. पूर्वेकडील संस्थेच्या दत्तनगर शाळेच्या पटांगणावर हा उपक्रम सुरू आहे. यावेळी व्यासपीठावर संस्थेच्या अध्यक्षा सुलभा डोंगरे, कार्यवाह श्संजय कुलकर्णी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शुभदा वैद्य यांनी तर आभार संस्था सदस्य रवींद्र जोशी यांनी मानले. कार्यक्रमाची सांगता मृणाल देवस्थळी हिच्या संपूर्ण वंदे मातरम् ने झाली.

टॅग्स :Swami Vivekanandaस्वामी विवेकानंदdombivaliडोंबिवली