शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

स्वामी विवेकानंद व्याख्यानमालेला डोंबिवलीकरांचा उदंड प्रतिसाद, तीन दिवस चालणार व्याख्यानमाला

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2018 10:57 IST

आपल्या देशाला विश्वगुरू पदापर्यंत नेण्यासाठी स्वतः आत्मचिंतन करून स्वतः जीवनात बदल करण्याची आवश्यकता आहे. यानेच समाज बदलेल व समाज जर एकजुटीने सामुदायिक भावनेने उभा राहिला तरच त्याला विजिगिषु म्हणता येईल असे मार्गदर्शनपर उद्दगार  ज्येष्ठ पत्रकार अरुण करमरकर यांनी व्यक्त केले.

डोंबिवली- आपल्या देशाला विश्वगुरू पदापर्यंत नेण्यासाठी स्वतः आत्मचिंतन करून स्वतः जीवनात बदल करण्याची आवश्यकता आहे. यानेच समाज बदलेल व समाज जर एकजुटीने सामुदायिक भावनेने उभा राहिला तरच त्याला विजिगिषु म्हणता येईल असे मार्गदर्शनपर उद्दगार  ज्येष्ठ पत्रकार अरुण करमरकर यांनी व्यक्त केले.

राष्ट्रीय शिक्षण संस्थेच्या माध्यमातून दरवर्षीप्रमाणे यंदाही विवेकानंद पुरस्कार २०१८ व व्याख्यानमाला घेण्यात येते. त्याचा शुभारंभ बुधवारी सायं. 7 वाजता ज्येष्ठ पत्रकार अरुण करमरकर यांच्या व्याख्यानाने झाली.

स्वामी विवेकानंदानी विजिगिषु भारतचे स्वप्न पाहिले यासाठी समाजाच्या ताकदीची पुर्नस्थापना करणे आवश्यक असून यासाठी समाजाचे संघटन, मनुष्य निर्माण व राष्ट्र उभारणी हे लक्ष ठेवले.  स्वातंत्र्यापूर्वी भारताची जगातील प्रतिमा ही अंधश्रद्धाळू व दुर्बल अशी होती. यानंतर भारतातील शास्त्रज्ञांनी दिलेल्या योगदानानी ही प्रतिमा बदलण्यास मदत झाली असे ते म्हणाले.

राष्ट्रीय शिक्षण संस्थेचे यंदा सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे. त्यानिमित्ताने विविध उपक्रम घेण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले.तीन दिवस चालणाऱ्या या व्यख्यानमालेचा समारोप ख्यातनाम अभ्यासक, लेखक सेवानिवृत्त आयएएस अधिकारी अविनाश धर्माधिकारी यांच्या व्याख्यानाने होणार आहे. युवकांना ते मार्गदर्शन करतील, त्यानाच यंदाचा संस्थेमार्फत दिला जाणारा मानाचा "स्वामी विवेकानंद" पुरस्कार शुक्रवारी संध्याकाळी 6.30 वाजता प्रदान करण्यात येणार आहे. पूर्वेकडील संस्थेच्या दत्तनगर शाळेच्या पटांगणावर हा उपक्रम सुरू आहे. यावेळी व्यासपीठावर संस्थेच्या अध्यक्षा सुलभा डोंगरे, कार्यवाह श्संजय कुलकर्णी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शुभदा वैद्य यांनी तर आभार संस्था सदस्य रवींद्र जोशी यांनी मानले. कार्यक्रमाची सांगता मृणाल देवस्थळी हिच्या संपूर्ण वंदे मातरम् ने झाली.

टॅग्स :Swami Vivekanandaस्वामी विवेकानंदdombivaliडोंबिवली