शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
4
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
5
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
6
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
7
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
8
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
9
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
10
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
11
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
12
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
13
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
14
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
15
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
16
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
17
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
18
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
19
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
20
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 

स्वामी विवेकानंद व्याख्यानमालेला डोंबिवलीकरांचा उदंड प्रतिसाद, तीन दिवस चालणार व्याख्यानमाला

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2018 10:57 IST

आपल्या देशाला विश्वगुरू पदापर्यंत नेण्यासाठी स्वतः आत्मचिंतन करून स्वतः जीवनात बदल करण्याची आवश्यकता आहे. यानेच समाज बदलेल व समाज जर एकजुटीने सामुदायिक भावनेने उभा राहिला तरच त्याला विजिगिषु म्हणता येईल असे मार्गदर्शनपर उद्दगार  ज्येष्ठ पत्रकार अरुण करमरकर यांनी व्यक्त केले.

डोंबिवली- आपल्या देशाला विश्वगुरू पदापर्यंत नेण्यासाठी स्वतः आत्मचिंतन करून स्वतः जीवनात बदल करण्याची आवश्यकता आहे. यानेच समाज बदलेल व समाज जर एकजुटीने सामुदायिक भावनेने उभा राहिला तरच त्याला विजिगिषु म्हणता येईल असे मार्गदर्शनपर उद्दगार  ज्येष्ठ पत्रकार अरुण करमरकर यांनी व्यक्त केले.

राष्ट्रीय शिक्षण संस्थेच्या माध्यमातून दरवर्षीप्रमाणे यंदाही विवेकानंद पुरस्कार २०१८ व व्याख्यानमाला घेण्यात येते. त्याचा शुभारंभ बुधवारी सायं. 7 वाजता ज्येष्ठ पत्रकार अरुण करमरकर यांच्या व्याख्यानाने झाली.

स्वामी विवेकानंदानी विजिगिषु भारतचे स्वप्न पाहिले यासाठी समाजाच्या ताकदीची पुर्नस्थापना करणे आवश्यक असून यासाठी समाजाचे संघटन, मनुष्य निर्माण व राष्ट्र उभारणी हे लक्ष ठेवले.  स्वातंत्र्यापूर्वी भारताची जगातील प्रतिमा ही अंधश्रद्धाळू व दुर्बल अशी होती. यानंतर भारतातील शास्त्रज्ञांनी दिलेल्या योगदानानी ही प्रतिमा बदलण्यास मदत झाली असे ते म्हणाले.

राष्ट्रीय शिक्षण संस्थेचे यंदा सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे. त्यानिमित्ताने विविध उपक्रम घेण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले.तीन दिवस चालणाऱ्या या व्यख्यानमालेचा समारोप ख्यातनाम अभ्यासक, लेखक सेवानिवृत्त आयएएस अधिकारी अविनाश धर्माधिकारी यांच्या व्याख्यानाने होणार आहे. युवकांना ते मार्गदर्शन करतील, त्यानाच यंदाचा संस्थेमार्फत दिला जाणारा मानाचा "स्वामी विवेकानंद" पुरस्कार शुक्रवारी संध्याकाळी 6.30 वाजता प्रदान करण्यात येणार आहे. पूर्वेकडील संस्थेच्या दत्तनगर शाळेच्या पटांगणावर हा उपक्रम सुरू आहे. यावेळी व्यासपीठावर संस्थेच्या अध्यक्षा सुलभा डोंगरे, कार्यवाह श्संजय कुलकर्णी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शुभदा वैद्य यांनी तर आभार संस्था सदस्य रवींद्र जोशी यांनी मानले. कार्यक्रमाची सांगता मृणाल देवस्थळी हिच्या संपूर्ण वंदे मातरम् ने झाली.

टॅग्स :Swami Vivekanandaस्वामी विवेकानंदdombivaliडोंबिवली