शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
2
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त
3
चांदी दीड लाख रूपये किलो, सप्टेंबरमध्ये २१,५२७ रुपयांची झेप; सोन्याचीही ११ हजारांची उडी
4
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
5
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
6
पंतप्रधान मोदी करणार ‘मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ कार्यक्रमाचे उद्घाटन
7
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
8
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
9
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
10
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
11
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
12
अंधेरी क्रीडा संकुल महापालिकेने स्वतः उभारावे; गोपाळ शेट्टी यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
13
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
14
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
15
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
16
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
17
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
18
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
19
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
20
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?

स्वा. सावरकर साहित्य संमेलनाध्यक्षपदी रमेश पतंगे

By admin | Updated: March 21, 2017 01:54 IST

ग्रंथदिंडी, परिसंवाद, भाषणे, सांस्कृतिक कार्यक्रमांनी एकोणतिसावे स्वातंत्र्यवीर सावरकर साहित्य संमेलन २१ ते २३ एप्रिलदरम्यान

ठाणे : ग्रंथदिंडी, परिसंवाद, भाषणे, सांस्कृतिक कार्यक्रमांनी एकोणतिसावे स्वातंत्र्यवीर सावरकर साहित्य संमेलन २१ ते २३ एप्रिलदरम्यान ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे रंगणार आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांचे सामाजिक, साहित्यिक आणि राष्ट्रनिष्ठेशी निगडित विचार आणि विश्व या संमेलनाच्या माध्यमातून उलगडले जाणार आहे. राजकीय आणि सामाजिक चळवळीचे अभ्यासक रमेश पतंगे यांची या संमेलनाध्यक्षपदी निवड झाली आहे.स्वातंत्र्यवीर सावरकर साहित्य अभ्यास मंडळ, सावरकर दर्शन प्रतिष्ठान, मुंबई आणि स्वा. वि.दा. सावरकर प्रतिष्ठान, ठाणे यांच्या वतीने हे संमेलन यंदा ठाण्यात आयोजिले आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जन्मशताब्दी वर्षापासून हे साहित्य संमेलन आयोजिले जाते. यंदाचे वर्ष सावरकर साहित्य अभ्यास मंडळाचे सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे. या सुवर्ण महोत्सवी वर्षात ठाण्यात होऊ घातलेल्या एकोणतिसाव्या संमेलनाचे स्वागताध्यक्ष म्हणून ठाणे जनता सहकारी बँकेचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील साठे यांची निवड झाली आहे, अशी माहिती अभ्यास मंडळाचे अध्यक्ष शंकर गोखले यांनी दिली. संमेलनाची सुरुवात २१ एप्रिलला सायंकाळी ४ ते ५ या वेळेत ग्रंथदिंडीच्या माध्यमातून होणार आहे. ५ ते ७ या वेळेत मुख्य उद्घाटन सोहळा पार पडेल. तीन दिवसांत ४ परिसंवाद, २ भाषणे आणि २ सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. ‘भारताची सर्वांगीण संरक्षण सिद्धता’, ‘गेल्या १०० वर्षांत देशात सामाजिक सुधारणांचे झालेले प्रयत्न’, ‘सावरकरांवरील आक्षेप व त्याचे निराकरण’ आणि ‘सावरकरांची साहित्यसंपदा’ या चार विषयांवर परिसंवाद होणार आहेत. तर, ‘न उमगलेले सावरकर’ आणि ‘आजच्या संदर्भात सावरकर’ या विषयावर शंतनू विखे आणि विक्रम हेडगे हे भाषण करणार आहेत. तर, २३ एप्रिलला सायंकाळी ५ वाजता या संमेलनाचा समारोप कार्यक्रम होईल. या संमेलनात देशभरातून सावरकरप्रेमींसह विविध संस्था सहभागी होतील. (प्रतिनिधी)