शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

फेरीवाल्यांच्या जागा बदलल्याने दोषी अधिकाऱ्यांचे निलंबन करा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2019 00:05 IST

नगररचना विभागाने दिलेल्या जागांव्यतिरिक्त अन्य काही रस्त्यांवर फेरीवाले बसवण्याची जागा निश्चित झाल्याने हा परस्पर मनमानी कारभार केला कोणी? त्या अधिकाऱ्यांचे तातडीने निलंबन करावे.

डोंबिवली : केडीएमसीने राष्ट्रीय फेरीवाला धोरणाच्या अंमलबजावणीसाठी लॉटरी पद्धतीने फेरीवाल्यांना जागांचे वाटप केले. परंतु, नगररचना विभागाने दिलेल्या जागांव्यतिरिक्त अन्य काही रस्त्यांवर फेरीवाले बसवण्याची जागा निश्चित झाल्याने हा परस्पर मनमानी कारभार केला कोणी? त्या अधिकाऱ्यांचे तातडीने निलंबन करावे. तसेच जागावाटपानुसारच फेरीवाले बसवावेत, अशी मागणी सर्वपक्षीय नगरसेवकांनी शुक्रवारी ‘ग’ प्रभाग क्षेत्र समितीच्या बैठकीत केली.केडीएमसीच्या डोंबिवली विभागीय कार्यालयाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात ही बैठक झाली. त्यावेळी ‘ग’ प्रभाग समितीचे शिवसेनेचे नगरसेवक राजेश मोरे, भाजपचे नगरसेवक नितीन पाटील, मुकुंद पेडणेकर, मनसेचे नगरसेवक मंदार हळबे, नगरसेविका ज्योती मराठे यांनी हा ठराव मांडला. त्याची नोंद घेण्याचे आदेश सभापती दीपाली पाटील यांनी उपसचिव किशोर शेळके यांना दिले.पूर्वेतील टाटा पॉवर लेनखाली फेरीवाले बसू लागल्याने नागरिकांना चालण्यास जागा नाही, याकडे मोरे यांनी लक्ष वेधले. म्हात्रेनगरमधील अयप्पा मंदिराजवळ फेरीवाल्यांना जागा दिली जात असेल, तर ते योग्य नाही, असे पेडणेकर यांनी सांगितले. त्याखेरीज अन्यत्र रस्त्यांचे दाखले देत हळबे, पाटील यांनीही आक्षेप घेत, हा मनमानी कारभार कोणी केला? महासभेत मंजुरी मिळालेल्या ठरावाचे काय झाले, असा सवाल करत त्यांनी मनमानी करणाºयांवर निलंबनाची कारवाई करावी, अशी मागणी नगरसेवकांनी केली.त्यावर प्रभागक्षेत्र अधिकारी चंद्रकांत जगताप यांनी पुन्हा पाहणी करून सुधारणा केली जाईल, असे आश्वासन दिले. परंतु, त्याने समाधान होणार नाही. हे बदल कोणी व कसे केले?, या मतावर नगरसेवक ठाम होते.शहरात फेरीवाले सर्रास बसत असून, त्यांच्याविरोधात कोणतीही ठोस कारवाई होत नाही. स्कायवॉकवर आणि पुलाखाली फेरीवाल्यांमध्ये जीवघेणी मारहाण होतेच कशी? त्याला कोणाचा आशीर्वाद आहे? असा सवाल पेडणेकर यांनी केली.म्हात्रेनगर प्रभागातील पथदिवे बंद असतात. कंत्राटदार कामचुकारपणा करत असून, त्यांच्यावरील जबाबदारी काढून घ्यावी, अशी मागणी हळबे यांनी केली. जेथे पथदिवे बंद असतात, डीपी उघडे आहेत, अशा ठिकाणी काही अपघात घडला तर त्याला जबाबदार कोण, असा सवालही पेडणेकर यांनी केला. त्यावर योग्य ती कार्यवाही केली जाईल, असे आश्वासन महापालिकेच्या विद्युत विभागाच्या अधिका-यांनी दिले.दरम्यान, ७ डिसेंबरला प्रभाग समितीची पुढील बैठक बोलावली असून, त्यात प्रलंबित कामांची माहिती आधी देणे, त्यानंतर अन्य विषयांनुसार बैठक पुढे नेण्यात यावी, असे ठरवले असल्याचे शेळके यांनी सांगितले. 

 

 

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिका