शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडिया १३ वर्षांपूर्वी करोडोंचे विमान विसरली; कोणालाच माहिती नव्हती, कोलकाता विमानतळाने...
2
एकनाथ शिंदेंच्या बहिणीने साथ सोडली, अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश; भावाकडून प्रतिसादच मिळेना...
3
हिडमाच्या मृत्यूनंतर नक्षलवादी मोहिमेला मोठा धक्का; 37 नक्षलवाद्यांचे एकाचवेळी आत्मसमर्पण...
4
मुंबई, पुण्यापेक्षा नागपुरात अधिक प्रदूषण ! एक्यूआय इंडेक्सने स्पष्ट, नागरिकांनो ही काळजी घ्या
5
आम्ही नितीश सरकारला पाठिंबा देण्यास तयार आहोत, पण..; असदुद्दीन ओवैसींचे मोठे वक्तव्य
6
हृदयद्रावक! १३ महिन्यांचा मुलगा दूध समजून प्यायला ड्रेन क्लीनर; जीभ भाजली, कायमचा गेला आवाज
7
दिल्ली बॉम्बस्फोटानंतर अचानक पाकिस्तानला जाणारे फोन कॉल्स कमी झाले; तपास यंत्रणाही हैराण
8
खळबळजनक! एक्स्ट्रा मॅरिटल अफेयरसाठी वन अधिकाऱ्याने पत्नीसह २ लेकरांना संपवलं अन्...
9
सेलिब्रेशन! स्मृती मानधनाच्या लग्नापूर्वी वधू-वराचे संघ भिडले; कोण जिंकले, पलाशचे आता काही खरे नाही...
10
G20 मधून जागतिक विकासाच्या मॉडेलवर PM मोदींची टीका; मांडले तीन प्रस्ताव, जाणून घ्या...
11
Video: सोलापूर-हैदराबाद महामार्गावर भीषण अपघात; ३ महिला ठार, तर १२ भाविक गंभीर जखमी
12
महाविकास आघाडीत बिघाडी? मनसेला सोबत घेण्यावरुन संजय राऊतांचा काँग्रेसला टोला
13
माणुसकीच नाही! पत्नीच्या डिलिव्हरीसाठी मागितली सुटी; बॉस म्हणतो, 'वर्क फ्रॉम हॉस्पिटल' कर अन्...
14
भीषण अपघातात प्रसिद्ध पंजाबी गायकाचा मृत्यू, ३७ व्या वर्षीच घेतला जगाचा निरोप, दिली होती अनेक सुपरहिट गाणी
15
फेल, फेल, सपशेल...! होंडाने Activa ईव्ही जानेवारीत आणली, आता उत्पादन बंद केले; गिऱ्हाईकच मिळेना...
16
दीपिकाच्या ८ तासांची शिफ्ट अटीवर रेणुका शहाणेची प्रतिक्रिया; म्हणाली, "अमान्य असेल तर..."
17
Uddhav Thackeray : "भाजपा कपट कारस्थान करणारा पक्ष, भाषिक प्रांतावादाचं विष...", उद्धव ठाकरेंचा जोरदार हल्लाबोल
18
‘प्रत्येक विधानसभेत ५०,००० मतं कापण्याचा कट’, अखिलेश यादवांचे भाजपा, निवडणूक आयोगावर गंभीर आरोप  
19
हेडचे टी-२० स्टाईल शतक, पहिल्या ॲशेस कसोटीत ऑस्ट्रेलियाचा सनसनाटी विजय
20
मुक्ता बर्वे ४६ व्या वर्षीही अविवाहित; म्हणाली, "आधी स्थळं यायची अन् आताही येतात पण..."
Daily Top 2Weekly Top 5

'बीएसयुपी'तील बेकायदा भाडेकरूंच्या 'आश्रयदात्या' पालिका अधिकाऱ्यांचे निलंबन करा, मनसेच्या शिष्टमंडळाने घेतली आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांची भेट   

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2021 17:32 IST

ठाण्याच्या धर्मवीर नगर येथील बीएसयुपी योजनेतील घरांचा हा भोंगळ कारभार मनसेने चव्हाट्यावर आणताच खडबडून जागे झालेल्या पालिका प्रशासनाने अनधिकृतरित्या राहणाऱ्या रहिवाशांच्या नावे नोटीसा काढल्या आहेत.

ठाणे - बीएसयुपी योजनेतील गोरगरिबांच्या घरांमध्ये अनधिकृतरित्या बिऱ्हाड थाटणाऱ्या बोगस सदनिकाधारकांचा मनसेने पर्दाफाश केला होता. ठाण्याच्या धर्मवीर नगर येथील बीएसयुपी योजनेतील घरांचा हा भोंगळ कारभार मनसेने चव्हाट्यावर आणताच खडबडून जागे झालेल्या पालिका प्रशासनाने अनधिकृतरित्या राहणाऱ्या रहिवाशांच्या नावे नोटीसा काढल्या आहेत. मात्र केवळ नोटीसा काढून न थांबता पालिका प्रशासनाने या बेकायदा भाडेकरूंचे 'आश्रयदाते' असणाऱ्या अधिकाऱ्यांचे तात्काळ निलंबन करावे, या सदनिकांमधील बोगस भाडेकरूंकडून वसुली करणारी आर्थिक साखळी कोण, याचीही चौकशी करण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शिष्टमंडळाने आज ठाणे पालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांची भेट घेऊन केली. 

धर्मवीर नगर येथील तुळशीधाम परिसरातील बीएसयुपी योजनेतील घरे आणि वादाची मालिका थांबतच नसून येथील आनंदकृपा सोसायटी इमारत क्रमांक २३ मध्ये ६०३, ८०२, ८०४, ८०५ व ८०७ या सदनिकांचा काही रहिवाशांनी अनधिकृतरित्या ताबा घेतला आहे. याबाबतची तक्रार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विभागाध्यक्ष संदीप पाचंगे यांच्याकडे आली होती. सोसायटीच्या रहिवाशांनी या प्रकरणी पालिका प्रशासनाकडे तक्रार करूनही संबंधित विभागाने बोटचेपी धोरण स्वीकारल्याने मनसे विभागाध्यक्ष संदीप पाचंगे यांनी रहिवाशांच्या शिष्टमंडळासह पालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांची भेट घेतली होती. अखेर मनसेच्या पाठपुराव्याला यश आले. या प्रकरणी ठाणे पालिकेच्या कार्यकारी अभियंत्यांनी बेकायदा पद्धतीने राहणाऱ्या रहिवाशांना नोटीस धाडल्या.

सात दिवसात सदनिका मोकळी करून द्यावी. अन्यथा फौजदारी गुन्हा दाखल करून पुढील कायदेशीर कारवाई केली जाईल. यासोबतच सामान जप्त केले जाईल, असेही या नोटिशीत नमूद करण्यात आले होते. केवळ नोटिसा काढून आणि बोगस भाडेकरूंना हुसकावून लावणे, अशी थातुरमातुर कारवाई केल्यास मूळ 'वसुलीकिंग' मोकाट राहतील. पालिका प्रशासनाने त्यांचाही शोध घेणे आवश्यक असून कर्तव्यात कसूर करणाऱ्या अशा अधिकाऱ्यांचे निलंबन करून त्यांना घरी बसवावे, अशी मागणी मनसेचे विभागाध्यक्ष संदीप पाचंगे यांनी आज आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांच्या भेटीदरम्यान केली.      आठ वर्षांचा हिशोब द्या... 

बीएसयुपीच्या या इमारतीमधील घरांचे टाळे तोडून आठ वर्षांपासून रहिवाशी बेकायदा पद्धतीने याठिकाणी वास्तव्याला आहेत. या आठ वर्षांच्या भाड्याच्या रकमेवर कोणी डल्ला मारला, असा सवाल मनसेचे संदीप पाचंगे यांनी उपस्थित केला आहे. तसेच आजतागायत या इमारतीची निबंधक सहकारी संस्थेकडे नोंदणी न केल्याने इमारतीची डागडुजीही रखडली आहे. भविष्यात इमारत कोसळून जीवितहानी झाल्यास जबाबदार कोण, असाही प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जात आहे.

टॅग्स :thaneठाणे