शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
2
‘जिल्हा परिषदां’ना बळ मिळेल? पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा होता
3
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक
4
मी शिवभक्त, विष गिळून टाकतो, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; काँग्रेसने घुसखोरांना प्रोत्साहन दिले, गरिबांना नाकारले
5
महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान
6
मोबाइलमध्ये अडकलेली तरुणाई सरस्वतीच्या दरबारात नेणार : विश्वास पाटील
7
प्रभादेवी तिकीट कार्यालयाचे स्थलांतर कुठे? २ ते ३ दिवसांमध्ये जागा निश्चित करणार
8
बांधकामातील बदल, कराने वाढला कोस्टल रोडचा खर्च; महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यात २ हजार कोटींची वाढ
9
नेपाळच्या आगीत कोण आपली पोळी भाजते आहे?
10
साहित्य संमेलनाध्यक्षपदी ‘पानिपत’कार विश्वास पाटील ; १ ते ४ जानेवारीदरम्यान संमेलन होणार
11
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
12
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
13
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
14
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
15
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
16
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
17
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
18
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
19
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)

केजरीवाल यांच्या मागणीचे आश्चर्य वाटले, आमदार राजू पाटील म्हणाले...

By प्रशांत माने | Updated: October 27, 2022 21:59 IST

...पण ते असे भावनिक राजकारण करायला लागले याचे वाईट वाटते.

डोंबिवली - नोटांवरील फोटोंवरुन एकीकडे  राजकारण शिगेला पोहोचले असताना, दुसरीकडे केजरीवालांनी केलेल्या मागणीचे आश्चर्य वाटले. जो माणूस एवढे चांगले काम करतो त्याला चांगले बोलायला काही हरकत नाही. शाळांचा चांगला कायापालट त्यांनी दिल्लीत केला आहे. पण ते असे भावनिक राजकारण करायला लागले याचे वाईट वाटते असे मत मनसेचे आमदार राजू पाटील यांनी व्यक्त केले आहे. 

नोटांवर फोटो कोणाचा असावा यावरून राजकारण रंगले असताना आमदार पाटील यांनी सकाळी ट्विट करून आपले परखड मत मांडले आहे. याबाबत बोलताना ते म्हणाले आपल्या देशात, राज्यात इंधनाच्या किंमती ज्या वाढल्या आहेत. त्याचा एकत्रित परिणाम सर्व गोष्टींवर होतो सर्व गोष्टी महाग होत चालल्यात बळीराजावर पावसाची अवकृपा झाली आहे. शेतकरी सुखी नाहीये, आपल्याकडे रस्ते चांगले नाही, आरोग्यवस्था चांगली नाही आणि अशा वेळी आपण कशावर भांडतो आणि राजकारण करतो तर नोटांवर फोटो कोणता पाहिजे. लोक त्रासले आहेत, लोक बोलतात त्यांच्या भावना काय समोर येतात त्याच्याकडे कोणाचे लक्ष नाही आहे. एवढे असंवेदनशील होऊन, असे राजकारण सध्या चालू आहे. असे राजकारण होऊ नये. कुठेतरी वाईट वाटले म्हणून ते ट्विट केल्याकडेही आमदार पाटील यांनी लक्ष वेधले.

 

टॅग्स :Raju Patilराजू पाटीलArvind Kejriwalअरविंद केजरीवालMNSमनसे