शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
6
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
7
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
8
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
11
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
12
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
13
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
14
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
15
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
16
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
17
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
18
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
19
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
20
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...

सर्वसामान्यांना आडोशाचाच सहारा; पालघरकरांची व्यथा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2018 03:25 IST

एकही सुलभ शौचालय नसताना होणार दंड वसूली

- हितेन नाईकपालघर : सार्वजनिक ठिकाणी लघुशंका, शौच, थुंकल्यास तात्काळ दंड वसूल करण्याची मोहीम आता नगरविकास विभागाच्या आदेशान्वये पालघर नगरपरिषदेकडून राबविण्याची शक्यता आहे. परंतु नगरपरिषदेने आज पर्यंत शहरात एकही सुलभ सार्वजनिक शौचालयाची उभारणीच केली नसल्याने मिळेल त्या आडोशाचा सहारा सर्वसामान्यांना घ्यावा लागत असल्याने कोणत्या अधिकाराने नगरपरिषद दंड वसुली करणार आहे? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.राज्यातील नगर पालिका, महानगर पालिका, क्षेत्रात सार्वजनिक ठिकाणी लघुशंका केल्यास १०० रु पये,शौचास बसल्यास ५०० रुपये, थुंकल्यास १०० रुपये, घाण टाकल्यास १५० रुपये जागीच दंड म्हणून वसूल करण्यात यावेत असे आदेश नगरविकास विभागाने शुक्र वारी काढले. घनकचरा व्यवस्थापन नियम २०१६ मधील कलम १५ नुसार नगरपालिका, महानगर पालिका ह्यांना स्वच्छते बाबतच्या तरतुदींचे पालन न करणाऱ्या व्यक्ती,संस्थांना दंड करणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त करीत तात्काळ कारवाई करण्याचे आदेश संबंधिताना देण्यात आले आहेत.पालघर नगरपरिषदेची स्थापना १९९८ मध्ये करण्यात आली असून पालघर जिल्ह्याची निर्मिती होऊन ४ वर्षाचा कालावधी उलटल्यानंतर शहराचा विस्तार झपाट्याने वाढत चालला आहे. अशा परिस्थितीत २० वर्षाचा कालावधी उलटून गेल्या नंतरही पालघर शहरात एकही सार्वजनिक शौचालयाची उभारणी करण्यात निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींना यश मिळालेले नाही. पालघर स्टेशन ते मनोर, माहीम, टेम्भोडे, बोईसर अशा चारही दिशेच्या प्रमुख रस्त्यावर एकही शौचालय नसल्याने पालघर शहरात आलेल्या नागरिकांना आडोश्या शिवाय अन्य कुठलाही पर्याय शिल्लकच ठेवण्यात आलेला नाही.प्रथम पायाभूत सोयी करा, मगच कारवाई करा - नगराध्यक्षांचा टोलापालघरचा शुक्र वार बाजार मागील अनेक वर्षांपासून माहीम रस्त्यावर भरवला जात असून मुंबई, भिवंडी, मुंब्रा, गुजरात आदी भागातून मोठ्या प्रमाणात विक्रेते आपली उत्पादने विक्र ीसाठी घेऊन येत असतात. त्याच्या खरेदी साठीही जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात नागरिक येत असतात. अशावेळी नगरपालिका लाखो रुपयांचा कर वसूल करीत असताना मात्र त्या जमलेल्या ८ ते १० हजार लोकांना पिण्याचे पाणी, शौचालय, वैद्यकीय उपचार आदी कुठलीही व्यवस्था नगरपरिषदे कडून करण्यात येत नाही.नगर विकास विभागाने प्रथम कर वसूल करणाºया नागरिकांना सुलभ शौचालय, चांगले रस्ते, कचराकुंडी, पिकदानी आदी सोयीसुविधा निर्माण करण्याचे सक्तीचे आदेश नगरपालिका, महानगर पालिका यांना दिले आहेत. त्यामुळे पहिले पायाभूत सुविधा निर्माण करा आणि नंतरच कारवाईचे बघा आसा टोला नगराध्यक्ष उत्तम पिंपळे यांनी नागरविकासच्या आदेशावर लगावला.पालघर हे जिल्ह्याचे ठिकाण असल्याने हजारो लोकांचे मोर्चे नेहमी येत असतात. अशावेळी जव्हार, मोखाडा आदी भागातून आलेल्या मोर्चेकºयांसाठी एकही सुलभ शौचालय नाही. अशावेळी नागरिकांना आडोश्या शिवाय कुठलाही पर्याय नसल्याने शहराला बकाल स्वरूप प्राप्त होत शहराचे आरोग्य धोक्यात आले आहे.शहरातील विविध पाडे आदी भागात शौचालये उभारली आहेत. कारवाई साठी फिरती पथके नेमण्याबाबत सर्वानुमते निर्णय घेऊ.- उत्तम पिंपळे, नगराध्यक्ष, पालघरशहरात एकही सुलभ शौचालय नाही. नगर परिषद करापोटी लाखो रु पये वसुली करते. त्यामुळे पहिले उपाय योजना निर्माण करा नंतरच दंड वसुलीचे बघा.- अरु ण माने, माजी नगरसेवक

टॅग्स :palgharपालघर