शहरं
Join us  
Trending Stories
1
"ड्रग्ज... शिंदे... माजी पोलीस अधिकारी..., राज्याचं राजकारण नशेबाज झालंय!"; राऊतांचा फडणवीसांवर निशाणा
2
गोपनीय बैठका अन् भाजपाच्या 'एकहाती' सत्तेला खिंडार पाडण्याची रणनीती; जळगावात 'कणकवली पॅटर्न'?
3
ऑनलाइन सेवा विस्कळीत होणार? 'या' ९ मागण्यांसाठी डिलिव्हरी बॉईजचे देशव्यापी आंदोलन
4
महापालिका निवडणूक: मतांचे विभाजन कोणाच्या पथ्यावर? काँग्रेसचे गणित बिघडण्याची शक्यता! 
5
Shyam Dhani Industries IPO: मसाला बनवणाऱ्या कंपनीनं मागितलेले ₹३८ कोटी, गुंतवणूकदारांनी झोळीत टाकले ₹२५,००० कोटी; पाहा डिटेल्स
6
कंपनीच्या CEO चा कारनामा, आयटी मॅनेजरसोबत गँगरेप; कारच्या डॅशकॅम सगळं रेकॉर्ड झालं, मग...
7
New Year 2026: २०२६ मध्ये तुमचे प्रत्येक स्वप्न होईल पूर्ण; त्यासाठी वापरा '३६९ मॅनिफेस्टेशन' टेक्निक 
8
कॅनडात दोन आठवड्यात दोन भारतीयांची हत्या; कोण होते शिवांक अवस्थी आणि हिमांशी खुराणा?
9
Vijay Hazare Trophy: किंग कोहलीचं शतक हुकलं! पण 'फिफ्टी प्लस'च्या 'सिक्सर'सह पुन्हा दाखवला क्लास
10
२०२५ वर्षाची सांगता: ७ राशींना शुभ काळ, धनलाभ; पद-पैसा-प्रतिष्ठा, इच्छापूर्तीचे उत्तम योग!
11
BSNL ग्राहकांसाठी महत्वाची बातमी! 3G सेवा कायमची बंद केली जाणार; तुम्हाला मोबाईल अन सिम बदलावे लागणार...
12
गणपती बाप्पा मोरया… २०२६ मध्ये किती वेळा अंगारक योग जुळून येणार? ‘या’ अंगारकी चतुर्थी खास!
13
AI मुळे नोकरी गेली, खर्च भागवण्यासाठी कपल बनलं 'बंटी-बबली'; १५ लाखांच्या चोरीची पोलखोल
14
Travel : 'या' देशात मुस्लिम  बहुसंख्य, पण नोटांवर आहे गणपती! भारतातून १००००० रुपये घेऊन जाल तर कोट्यधीश व्हाल
15
"आता ट्रम्प आणि फ्रान्सचे अध्यक्ष मॅक्रॉनही जाणार यांच्या पक्षात, कारण...!"; राऊतांचा भाजपाला बोचरा टोमणा 
16
"माणूसकीचा विसर पडण्याच्या आत...", बांगलादेशमध्ये हिंदू युवकाची हत्या, जान्हवी कपूर संतापली
17
करोडपती होण्याचे स्वप्न आता आवाक्यात! दरमहा इतक्या रुपयांची SIP; पाहा चक्रवाढ व्याजाची कमाल
18
महायुतीत खदखद वाढली, इच्छुकांच्या नाराजीचा भूकंप?; काठावर बसलेले मविआच्या संपर्कात
19
कॅनडात आणखी एका भारतीय विद्यार्थ्याची हत्या, शिवांकला विद्यापीठ परिसरातच घातल्या गोळ्या
20
बांगलादेशात क्रूरतेचा कळस! दीपू दास हत्याकांडात ४ आरोपींची गुन्ह्याची कबुली; पोलीस म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

महसूलच्या अतिरिक्त मुख्य सचिवांसह जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षकांना समन्स

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2019 02:39 IST

आदिवासींच्या अज्ञानाचा गैरफायदा घेऊन जमीन बळकावल्याप्रकरणी लोकमतने वेळोवेळी वृत्त प्रसिद्ध करून प्रशासनाचे लक्ष वेधले आहे.

ठाणे : कांबा-वाघेरापाडा, ता. कल्याण येथील आदिवासी शेतकऱ्यांची शेकडो एकर शेतजमीन उल्हासनगर येथील व्यापारी व विकासकांनी बनावट शेतकरी दाखल्यांद्वारे हडपल्याचा आरोप आहे. यावरील कारवाईत हलगर्जी केल्यामुळे राजस्थान येथील महसूलच्या अतिरिक्त मुख्य सचिवांसह ठाणे जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक यांना राष्ट्रीय अनुसूचित जाती-जमाती (एससी-एसटी) आयोगाने समन्स बजावल्याने प्रशासनात खळबळ उडाली आहे.आदिवासींच्या अज्ञानाचा गैरफायदा घेऊन जमीन बळकावल्याप्रकरणी लोकमतने वेळोवेळी वृत्त प्रसिद्ध करून प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. मात्र, त्यावर ठोस कारवाई न केल्यामुळे परिहत चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष विशाल गुप्ता यांनी आदिवासी शेतकरी विठ्ठल शिद, बाळाराम शिद यांची बाजू मांडली आहे. याची दखल घेऊन आयोगाने राजस्थानच्या महसूल विभागाचे सचिव, सिरोहीचे जिल्हाधिकारी यांच्यासह ठाणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, पोलीस अधीक्षक डॉ. शिवाजी राठोड यांना ‘समन्स’ बजावून १२ जुलै रोजी नवी दिल्ली येथे सुनावणीसाठी हजर होण्याचे आदेश जारी केले आहेत. आयोगाने या प्रकरणाची दखल घेऊन सुनावणी लावल्यामुळे प्रशासनात एकच खळबळ उडाली आहे.कांबा-वाघेरापाडा येथील स.नं. ४७/१, ४७/२, १०८/३ १२१/१ आदी शेतजमीन उल्हासनगर येथील व्यापारी बिल्डर प्रकाश बुधरानी, नीशा बुधरानी, शीतल बुधरानी, गिरीश बुधरानी, विशाल बुधरानी यांनी राजस्थान राज्यातील शिवगंज, सिरोही, गाव ‘मनाधर’ येथील शेतकरी असल्याचा बोगस दाखला सादर करून खरेदी केल्याचा दावा केला आहे. याविरोधात तक्रार दाखल करूनही फेरफार नोंदी केल्याची मनमानीदेखील प्रशासनाने केली आहे. याशिवाय, याप्रकरणी कल्याण न्यायालयातदेखील प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. कल्याण तहसीलदारांनी या जमीनप्रकरणी गंभीर बाब आहे, असा अभिप्राय देऊन जिल्हाधिकाऱ्यांकडे कारवाईसाठी पाठवलेले आहे. दरम्यान, बुधरानीसह शांतिलाल पोरिया, अश्विनीकुमार शहा आणि जमीनमालक विष्णू फडके यांच्या वारसाविरोधात अ‍ॅट्रॉसिटी अ‍ॅक्टनुसार गुन्हाही दाखल करण्यात आलेला आहे. या कालावधीतच प्रशासनाने फेरफार नोंदवण्याची मनमानी केल्याचा आदिवासी शेतकºयांचा आरोप आहे.जमीन तिस-या व्यक्तीला विकण्याची चलाखीया शेकडो एकर जमिनीचे प्रकरण न्यायप्रविष्ट असताना प्रकाश बुधरानी यांनी स.नं. १०८/३, १२०/१, १२१/१ ही जमीन योगेश नारायण देशमुख यांना विकल्याचा आरोपही शेतकºयांनी केला आहे.न्यायप्रविष्ट या जमीन प्रकरणात तत्कालीन तहसीलदार व उपविभागीय अधिकारी यांनी या दोषी व्यक्तींना मोठ्या प्रमाणात मदत करून विधानसभेतील लक्षवेधी सूचनेलादेखील उलटसुलट उत्तरे दिल्याचा आरोप आहे.यानंतरच्या वेळोवेळी झालेल्या चौकशीनंतरही देशमुख यांनी ही जमीन तिसºया म्हणजे गुणवंत प्रेमराज भंगाळे, नरेश भाटिया आणि नोतदास तनवाणी यांना विकून फेरफार नोंदणी केल्याचे गुप्ता यांनी स्पष्ट केले आहे. या जमिनीवर अनधिकृत बांधकाम सुरू केले आहे.नियमाविरोधात शिफारसी करण्यात आल्या असून परवानगीदेखील ज्या अटीशर्तींनुसार देण्यात आली आहे. तिचे पालन होताना दिसत नसल्याचे गुप्ता यांनी निदर्शनास आणून दिले आहे.

टॅग्स :thaneठाणे