शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

हा उन्हाळाही पाण्याविनाच, दीड वर्ष उलटले तरी निविदा त्रुटीत अडकलेली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2019 00:43 IST

आजमितीस २७ गावांना ५० दशलक्ष लीटर पाणीपुरवठा केला जातो, असे प्रशासनाचे म्हणणे आहे. प्रत्यक्षात किती पाणीपुरवठा केला जातो. एमआयडीसीकडून किती पाणी पुरवले जाते, याचे काहीएक मोजमाप नाही.

कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीत समाविष्ट झालेल्या २७ गावांचा पाणीप्रश्न सोडवण्यासाठी केंद्र सरकारच्या अमृत योजनेंतर्गत पाणीपुरवठा योजना मंजूर झाली. योजना मंजूर होऊन दीड वर्ष उलटून गेले, तरी योजना निविदा त्रुटीत अडकली आहे. त्यातच दोन वर्षांपासून योजनापूर्तीचे आश्वासन सत्ताधारी पक्षाकडून दिले जात आहे. प्रत्यक्षात योजना कागदावरच असल्याने उन्हाळा पाण्यावाचून जात असल्याची प्रतिक्रिया २७ गावांतून व्यक्त होत आहे.

कल्याण-डोंबिवली महापालिकेची १५० दशलक्ष लीटर क्षमतेची स्वत:ची पाणीपुरवठा योजना आहे. त्याचबरोबर नेतिवली, बारावे आणि मोहिली येथे जलशुद्धीकरण केंद्र आहे. ही योजना २७ गावे महापालिकेत समाविष्ट होण्यापूर्वी राबवली गेली. त्यामुळे २७ गावांसाठी वेगळा विचार करण्याचा प्रश्नच त्यावेळी नव्हता. १ जून २०१५ रोजी २७ गावे महापालिकेत समाविष्ट झाली. या गावांना एमआयडीसीकडून ३० दशलक्ष लीटर पाणीपुरवठा केला जात आहे. हा पाणीपुरवठा अपुरा असल्याची ओरड सुरू झाली. तसेच २७ गावांतील पाण्याचा प्रश्न प्रकर्षाने समोर आला.

आजमितीस २७ गावांना ५० दशलक्ष लीटर पाणीपुरवठा केला जातो, असे प्रशासनाचे म्हणणे आहे. प्रत्यक्षात किती पाणीपुरवठा केला जातो. एमआयडीसीकडून किती पाणी पुरवले जाते, याचे काहीएक मोजमाप नाही. २७ गावांत पुरेसे पाणी दिले जाते. मात्र, वितरणव्यवस्था योग्य नसल्याने पाण्याची समस्या आहे. एमआयडीसीकडून करण्यात येणाऱ्या पाणीपुरवठ्याचे पाण्याचे बिल महापालिका भरते. हे बिल वर्षाला १२ कोटींच्या आसपास आहे. २७ गावांसाठी केंद्र आणि राज्य सरकारने अमृत योजनेंतर्गत १८० कोटींची पाणीपुरवठा योजना मंजूर केली. ही योजना २०१७ मध्ये मंजूर झाली. या योजनेंतर्गत २७ गावांत पाणीसाठवणुकीचे जलकुंभ उभारणे, जलवाहिन्या टाकून वितरणव्यवस्था उपलब्ध करून देणे, आदी कामे केली जाणार आहेत. योजना मंजूर झाल्यानंतर सहा महिन्यांपूर्वी या योजनेसाठी राज्य सरकारने आणखीन वाढीव निधी दिला. जवळपास १३ कोटींची वाढ केली. त्यामुळे योजनेच्या मंजूर निधीची एकूण रक्कम १९३ कोटींच्या आसपास गेली आहे.

योजना महापालिकेच्या २७ गावांच्या हद्दीत मंजूर केली असली, तरी त्याचे काम महाराष्ट्र जीवन प्राधिकरण करणार आहे. २०१७ पासून गेल्या दीड वर्षात योजनेसाठी आतापर्यंत नऊ वेळा निविदा काढल्या आहेत. सगळ्यात आधी सरकारने पहिली निविदा रद्द केली. त्यानंतर दिवा-पनवेल रेल्वेमार्गावरील काटई रेल्वे उड्डाणपुलावरील मार्गातून जलवाहिनी टाकण्याचे काम अडचणीचे असल्याने कंत्राटदारांनी नकार दर्शवला. दोन भाग करून हे काम देण्यात आले. नव्याने निविदा काढली. तरीही, त्याला प्रतिसाद आला नाही. नवव्या निविदेपश्चात दोन कंत्राटदारांचा प्रतिसाद आला. त्यांच्याकडून निविदा भरली गेली. मात्र, त्यांच्या काही त्रुटी असल्याने त्यातील त्रुटी करण्याचा मुद्दा सध्या प्रलंबित आहे. पालिकेने या त्रुटी दूर करण्यासाठी निविदा प्राधिकरणाकडे पाठवल्या आहेत.आतातरी योजना मार्गी लावण्याची मागणीआचारसंहिता संपली आहे. त्यामुळे आता तरी ही तपासणी मार्गी लावून पाणीपुरवठा योजनेचा मार्ग मोकळा करणे गरजेचे आहे. अन्यथा, पुन्हा तीन महिन्यांनी साधारणत: सप्टेंबर महिन्यातच विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होऊ शकते आणि निविदेचा मसला आचारसंहितेच्या कचाट्यात सापडू शकतो. २०१७ सालापासून केवळ निविदेच्या गर्तेतही योजना गटांगळ्या खात आहे. ती मार्गी लावली जात नाही. यंदा २७ गावांची योजना पूर्ण झाल्यावर पाणीप्रश्न राहणार नाही. तो सुटण्यास मदत होईल, असा दिलासा दरवर्षी उन्हाळ्याआधी दिला जातो. प्रत्यक्षात उन्हाळा संपून जातो. तरीही, काम मार्गी लागत नाही. हा उन्हाळाही पाण्याविना गेला. किमान पुढच्या उन्हाळ्याच्या आधी योजना मार्गी लागणार की नाही, असा सवाल योजनापूर्तीच्या प्रतीक्षेत असलेल्या २७ गावांतील नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिका