शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack : मोठं यश...! पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या मोहम्मद कटारियाला अटक; असा पकडला
2
३ दिवस भारताचे मंत्री, अधिकारी अमेरिकेत तळ ठोकून; ट्रेड डील, ट्रम्प टॅरिफ, H1B व्हिसावर चर्चा
3
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भाजपा खासदार, आमदारांचा मोठा निर्णय, एक महिन्याचे वेतन देणार!
4
IND vs BAN : बांगलादेशच्या नव्या कॅप्टननं नशीब काढलं, पण तो गडबडला! सूर्या म्हणाला, आमच्या मनासारखं झालं
5
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
6
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
7
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
8
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
9
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
10
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
11
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
12
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन
13
“बॅगवरचा फोटो कसला पाहता, मदत पाहा”; एकनाथ शिंदे शेतकऱ्यांच्या बांधावर, केली नुकसानीची पाहणी
14
बापासमोरच दोन वर्षाच्या मुलाला जबड्यात धरून बिबट्या पसार; १५० जवानांकडून शोधमोहिम, मृतदेह सापडला
15
आपली मुलगी राजकारणात येणार? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले, म्हणाले...
16
लवकरच बाजारात येतेय Toyota ची Mini Fortuner! महाराष्ट्रातल्या 'या' शहरात होणार उत्पादन; किती असू शकते किंमत? जाणून घ्या
17
तंत्रज्ञानाची किमया! सॅमसंगने AI Home केलं लाँच; आता घर होईल स्मार्ट, फक्त एक क्लिक अन्...
18
तांत्रिक बिघाड की मोसादचा हात? संयुक्त राष्ट्रांत पॅलेस्टाईनवर चर्चा होताच ४ बड्या नेत्यांचा माईक बंद  
19
पद्मश्री ज्येष्ठ लेखक एस. एल. भैरप्पा काळाच्या पडद्याआड; पंतप्रधान मोदींसह राष्ट्रपतींनी वाहिली श्रद्धांजली
20
लडाखमधील आंदोलनाला हिंसक वळण, जाळपोळ, लेहमध्ये ४ जणांचा मृत्यू, ७० जण जखमी 

हा उन्हाळाही पाण्याविनाच, दीड वर्ष उलटले तरी निविदा त्रुटीत अडकलेली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2019 00:43 IST

आजमितीस २७ गावांना ५० दशलक्ष लीटर पाणीपुरवठा केला जातो, असे प्रशासनाचे म्हणणे आहे. प्रत्यक्षात किती पाणीपुरवठा केला जातो. एमआयडीसीकडून किती पाणी पुरवले जाते, याचे काहीएक मोजमाप नाही.

कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीत समाविष्ट झालेल्या २७ गावांचा पाणीप्रश्न सोडवण्यासाठी केंद्र सरकारच्या अमृत योजनेंतर्गत पाणीपुरवठा योजना मंजूर झाली. योजना मंजूर होऊन दीड वर्ष उलटून गेले, तरी योजना निविदा त्रुटीत अडकली आहे. त्यातच दोन वर्षांपासून योजनापूर्तीचे आश्वासन सत्ताधारी पक्षाकडून दिले जात आहे. प्रत्यक्षात योजना कागदावरच असल्याने उन्हाळा पाण्यावाचून जात असल्याची प्रतिक्रिया २७ गावांतून व्यक्त होत आहे.

कल्याण-डोंबिवली महापालिकेची १५० दशलक्ष लीटर क्षमतेची स्वत:ची पाणीपुरवठा योजना आहे. त्याचबरोबर नेतिवली, बारावे आणि मोहिली येथे जलशुद्धीकरण केंद्र आहे. ही योजना २७ गावे महापालिकेत समाविष्ट होण्यापूर्वी राबवली गेली. त्यामुळे २७ गावांसाठी वेगळा विचार करण्याचा प्रश्नच त्यावेळी नव्हता. १ जून २०१५ रोजी २७ गावे महापालिकेत समाविष्ट झाली. या गावांना एमआयडीसीकडून ३० दशलक्ष लीटर पाणीपुरवठा केला जात आहे. हा पाणीपुरवठा अपुरा असल्याची ओरड सुरू झाली. तसेच २७ गावांतील पाण्याचा प्रश्न प्रकर्षाने समोर आला.

आजमितीस २७ गावांना ५० दशलक्ष लीटर पाणीपुरवठा केला जातो, असे प्रशासनाचे म्हणणे आहे. प्रत्यक्षात किती पाणीपुरवठा केला जातो. एमआयडीसीकडून किती पाणी पुरवले जाते, याचे काहीएक मोजमाप नाही. २७ गावांत पुरेसे पाणी दिले जाते. मात्र, वितरणव्यवस्था योग्य नसल्याने पाण्याची समस्या आहे. एमआयडीसीकडून करण्यात येणाऱ्या पाणीपुरवठ्याचे पाण्याचे बिल महापालिका भरते. हे बिल वर्षाला १२ कोटींच्या आसपास आहे. २७ गावांसाठी केंद्र आणि राज्य सरकारने अमृत योजनेंतर्गत १८० कोटींची पाणीपुरवठा योजना मंजूर केली. ही योजना २०१७ मध्ये मंजूर झाली. या योजनेंतर्गत २७ गावांत पाणीसाठवणुकीचे जलकुंभ उभारणे, जलवाहिन्या टाकून वितरणव्यवस्था उपलब्ध करून देणे, आदी कामे केली जाणार आहेत. योजना मंजूर झाल्यानंतर सहा महिन्यांपूर्वी या योजनेसाठी राज्य सरकारने आणखीन वाढीव निधी दिला. जवळपास १३ कोटींची वाढ केली. त्यामुळे योजनेच्या मंजूर निधीची एकूण रक्कम १९३ कोटींच्या आसपास गेली आहे.

योजना महापालिकेच्या २७ गावांच्या हद्दीत मंजूर केली असली, तरी त्याचे काम महाराष्ट्र जीवन प्राधिकरण करणार आहे. २०१७ पासून गेल्या दीड वर्षात योजनेसाठी आतापर्यंत नऊ वेळा निविदा काढल्या आहेत. सगळ्यात आधी सरकारने पहिली निविदा रद्द केली. त्यानंतर दिवा-पनवेल रेल्वेमार्गावरील काटई रेल्वे उड्डाणपुलावरील मार्गातून जलवाहिनी टाकण्याचे काम अडचणीचे असल्याने कंत्राटदारांनी नकार दर्शवला. दोन भाग करून हे काम देण्यात आले. नव्याने निविदा काढली. तरीही, त्याला प्रतिसाद आला नाही. नवव्या निविदेपश्चात दोन कंत्राटदारांचा प्रतिसाद आला. त्यांच्याकडून निविदा भरली गेली. मात्र, त्यांच्या काही त्रुटी असल्याने त्यातील त्रुटी करण्याचा मुद्दा सध्या प्रलंबित आहे. पालिकेने या त्रुटी दूर करण्यासाठी निविदा प्राधिकरणाकडे पाठवल्या आहेत.आतातरी योजना मार्गी लावण्याची मागणीआचारसंहिता संपली आहे. त्यामुळे आता तरी ही तपासणी मार्गी लावून पाणीपुरवठा योजनेचा मार्ग मोकळा करणे गरजेचे आहे. अन्यथा, पुन्हा तीन महिन्यांनी साधारणत: सप्टेंबर महिन्यातच विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होऊ शकते आणि निविदेचा मसला आचारसंहितेच्या कचाट्यात सापडू शकतो. २०१७ सालापासून केवळ निविदेच्या गर्तेतही योजना गटांगळ्या खात आहे. ती मार्गी लावली जात नाही. यंदा २७ गावांची योजना पूर्ण झाल्यावर पाणीप्रश्न राहणार नाही. तो सुटण्यास मदत होईल, असा दिलासा दरवर्षी उन्हाळ्याआधी दिला जातो. प्रत्यक्षात उन्हाळा संपून जातो. तरीही, काम मार्गी लागत नाही. हा उन्हाळाही पाण्याविना गेला. किमान पुढच्या उन्हाळ्याच्या आधी योजना मार्गी लागणार की नाही, असा सवाल योजनापूर्तीच्या प्रतीक्षेत असलेल्या २७ गावांतील नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिका