शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध; कतारने क्षेपणास्त्रे हवेतच रोखली, जीवितहानी झाली नसल्याचा दावा
2
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी
3
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
4
“त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
5
ENG vs IND : फलंदाजांनी आपलं काम केलं! टीम इंडियानं हा मंत्र जपला तर विजय पक्का, पण...
6
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
7
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
8
कुर्ला-सायनदरम्यान ओव्हरहेड वायर तुटली; मध्य रेल्वेच्या जलद फेऱ्या ठप्प, प्रवाशांचे हाल
9
"...तेलाच्या किमती कमी ठेवा, मी बघतोय!" इराण-इस्रायल युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान
10
ENG vs IND: KL राहुल-पंतच्या सेंच्युरीनंतर जड्डूची उपयुक्त खेळी! इंग्लंडसमोर ३७१ धावांचे टार्गेट
11
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
12
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
13
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
14
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
15
"तमीज से खेलने के चक्कर में..." कडक खेळी शिवाय पंतची 'मन की बात' चर्चेत (VIDEO)
16
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
17
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
18
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
19
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार
20
“विकासासाठीचा प्रत्येक रुपया सर्वसामान्यांपर्यंत पोहोचला पाहिजे”: DCM एकनाथ शिंदे

शेती समृद्ध न झाल्याने आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2017 03:30 IST

आपल्या देशातील ८० टक्के शेती पावसावर अवलंबून आहे. बदलत्या हवामानाने शेतीला दगा दिला आहे.

डोंबिवली : आपल्या देशातील ८० टक्के शेती पावसावर अवलंबून आहे. बदलत्या हवामानाने शेतीला दगा दिला आहे. जोडधंदे विकसित करून शेती समृद्ध करण्याची रचना २५ वर्षांत झालेली नाही. त्यामुळेच शेतकरी आत्महत्या करत आहेत, अशी खंत ज्येष्ठ पत्रकार उदय निरगुडकर यांनी व्यक्त केली.‘चतुरंग प्रतिष्ठान’, डोंबिवली शाखेच्या ३१ व्या वर्धापन दिनानिमित्त मुक्तसंध्या या कार्यक्रमांतर्गत ‘बातमी अशी सापडते, दिसते, करता येते’ या विषयावर गप्पागोष्टीमय मुलाखतीचा कार्यक्रम रविवारी माधवाश्रम मंगल कार्यालयात झाला. या वेळी निरगुडकर बोलत होते. ‘लोकमत’चे कार्यकारी संपादक (डिजिटल) चंद्रशेखर कुलकर्णी यांनी त्यांच्याशी संवाद साधला.निरगुडकर म्हणाले, हवामान बदलत आहे, हमीभाव स्थिर नाही. धरण आहे तिथे पाट नाही, पाट आहे तिथे पाणी नाही, पाणी आहे तिथे बियाणे नाही. सोलापुरात तिसºयांदा पेरणीची वेळ आली आहे. शेतकरी आत्महत्या करत आहे. ते कमकुवत मनाचे आहेत, असे बोलले जाते. पण, त्यांना आशेचा एकतरी किरण दिसला पाहिजे. आज ११४ तालुक्यांत १० टक्के पाऊस नाही. अनेक तालुके ओस पडले आहेत. तेथील नागरिक कसे जगणार. खरीप हंगाम गेला. रब्बी हंगामाचे काही माहीत नाही. ५० ते ६० लोक शेतीवर अवलंबून आहेत. हा प्रश्न सामाजिक प्रतिष्ठेचा आहे. मराठा मोर्चाची शिस्त वाखाणण्याजोगी होती. या मोर्चाची मांडणी खोलवर आहे. एवढे आमदार, खासदार अशी मांडणी करता येणार नाही. एवढी सोपी मांडणी करू नका. यांची मांडणी खोलवर आहे.प्रत्येक समाजात काळानुसार बदल झाला पाहिजे. आता शेतकरी होणे, हे शाप आहे. शेतकरी दैन्यावस्थेत जगत असतात. इतके दारिद्रय मी कधी पाहिले नाही.शेतीला लागणाºया पायाभूत सोयीसुविधा जोपर्यंत आपण विकसित करत नाही, तोपर्यंत हा आक्रोश असाच येत राहणार आहे. यामागे अर्थकारण आहे. त्याला कोणताही जातीचा रंग आपण लावू नये, असे आवाहन त्यांनी केले.मराठा समाज हा लढवय्या आहे. ज्यांचे जीवन शेतीवर अवलंबून आहे. लाखालाखांचे मराठ्यांचे मोर्चे निघाले तशी इतर समाजांचीही संमेलने झाली. पाटीदारांची आंदोलने झाली, अशी अनेक उदाहरणे देता येतील. कारण, समाजाची अर्थरचना आणि समाजरचना बदलत गेली. शेतीचे तुकडे झाले आणि शेती अव्यवहार्य झाली, असे ते म्हणाले.तेच खरे रियल हिरोचित्रपटातील तारेतारका मला हीरो वाटत नाही. त्यापेक्षा उल्हासनगरमधील प्रांजल पाटील मला रिअल हीरो वाटतात. सैराट चित्रपटात जो मुलगा दाखवला आहे, त्याचे पुढे काय झाले, कोणाला माहीत नाही. पण, सागर रेड्डी नावाच्या मुलाबाबतीत अशीच घटना घडली होती. १८ वर्षांनंतर अनाथालयातून अनुदान मिळत नाही. म्हणून बाहेर पडावे लागते.महाराष्ट्रात १० हजार मुले अनाथाश्रमातून बाहेर पडतात. त्यांच्या पुढील भवितव्याचे काय? सागरला अनाथालयातून बाहेर पडल्यावर चांगली व्यक्ती मिळाली. त्याने इंजिनीअरचे शिक्षण घेतले. परदेशात जाण्याची संधी आली असूनही ती नाकारली. सागरने वयाच्या ३१ व्या वर्षी ४० मुलींचे कन्यादान केले. हे खरे रिअल हीरो आहेत, असे निरगुडकर यांनी नमूद केले.बातमीशी प्रामाणिक असावेवृत्तवाहिन्या बातम्या मनोरंजक करतात, असे आरोप केले जातात. पण, हा माध्यमांचा दोष नाही. प्रेक्षक हे पाहणे बंद करतील, त्या दिवशी वाहिन्या रंजकता बंद करतील. आपण बातमीशी प्रामाणिक असले पाहिजे.विरोधी पक्ष जेव्हा बातम्या उचलत नाही, तेव्हा ते काम आम्हाला करावे लागते. बातम्या करताना धमक्या येत असतात.मात्र, आपण त्यांची जाहिरात करायची नसते. हा या क्षेत्राचा साइड इफेक्ट आहे. ते सहन करण्याची शक्ती तुमच्याकडे पाहिजे. वृत्तवाहिन्या नागरिकांना आधार वाटतात, याकडे निरगुडकर यांनी लक्ष वेधले.