शहरं
Join us  
Trending Stories
1
अबब! ३५ लाख जप्त, २० लाखांची रोकड जाळली; सरकारी इंजिनिअरचा 'काळा' प्रताप उघड, नेमकं काय घडलं?
2
'पाकिस्तान अजूनही डंपर, असीम मुनीरनेही कबूल केले', राजनाथ सिंह यांनी मर्सिडीजच्या विधानाची खिल्ली उडवली
3
"मुख्यमंत्र्यांनी मला फोन केला होता, मात्र मी त्यांना..."; फडणवीसांसोबत शरद पवारांचा काय झाला संवाद?
4
बीडमध्ये खळबळ! सरकारी वकिलाने कोर्टातच संपवले आयुष्य, न्यायाधीशासह दोघांवर गुन्हा; प्रकरण काय?
5
लवकरच ममता बॅनर्जींचे सरकार जाणार अन्..; कोलकात्यातून PM मोदींचा हल्लाबोल
6
पुणे हादरले! 'तुला किंमत चुकवावी लागेल', मानलेल्या बहिणीच्या प्रियकरानेच केली इंजिनिअर सौरभची हत्या
7
चीनची मोठी तयारी! या देशाविरोधात लढणार,समुद्रात १४ लढाऊ जहाजे उतरवले; लष्कर हाय अलर्टवर
8
६० कोटींचा सायबर फ्रॉड, ९४३ बँक खात्यांचा वापर; मुंबई पोलिसांनी १२ आरोपींना घेतले ताब्यात
9
संपूर्ण देशाची फेव्हरिट बनली ही ₹9 लाखाहून कमी किंमतीची SUV; नेक्सन, पंच, फ्रोंक्सला टाकलं मागे; विक्री घटूनही ठरली नं. 1
10
विवाह नोंदणी कार्यालयात हायव्होल्टेज ड्रामा; मेहुणीसोबत दाजी करणार होता लग्न, तितक्यात...
11
भारतीय ड्रायव्हर्संना डोनाल्ड ट्रम्प यांचा झटका! वर्कर व्हिसा मिळणार नाही, अमेरिकेतील नोकऱ्या जाणार
12
या मल्टीबॅगर स्टॉकला मिळालं 499.95 कोटींचं काम, रेल्वे सेक्टरशी संबंधित आहे नवी वर्क ऑर्डर; जाणून घ्या सविस्तर
13
Pune: हनी ट्रॅप प्रकरणातील प्रफुल लोढाचे आणखी एक कांड; पिंपरी पोलिसांनी केली अटक; महिलेच्या तक्रारीत काय?
14
जोधपूरला जाणारे एअर इंडियाचे विमान अचानक परतले, मुंबई विमानतळावर गोंधळ! नेमकं झालं काय?
15
'कॅस्पियन समुद्र' गायब होतोय का? पाच वर्षात ३ फूट पाणी कमी झालं; 'या' ५ देशांना धोका, कारण...
16
डी-गँगच्या 'ड्रग्ज फॅक्टरी'वर धाड, 92 कोटींचे एमडी ड्रग्ज जप्त, मुंबई-ठाण्याचंही कनेक्शन
17
Rain Alert : गणपतीच्या आगमनाला पावसाचा 'ताशा'! पुढचे काही दिवस 'मुसळधार' कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना इशारा?
18
सलग ६ दिवसांच्या तेजीला ब्रेक! गुंतवणूकदारांचे २ लाख कोटींचे नुकसान, एशियन पेंट्समध्ये सर्वाधिक आपटला
19
इथेनॉलयुक्त पेट्रोलमुळे गाड्या खराब होतात; कोण पसरवतोय गैरसमज? नितीन गडकरीनी स्पष्टच बोलले
20
Shani Amavasya 2025: शनीची वक्री चाल 'या' ५ राशींचे पुढील २ महिने करणार हाल; जाणून घ्या उपाय!

शेती समृद्ध न झाल्याने आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2017 03:30 IST

आपल्या देशातील ८० टक्के शेती पावसावर अवलंबून आहे. बदलत्या हवामानाने शेतीला दगा दिला आहे.

डोंबिवली : आपल्या देशातील ८० टक्के शेती पावसावर अवलंबून आहे. बदलत्या हवामानाने शेतीला दगा दिला आहे. जोडधंदे विकसित करून शेती समृद्ध करण्याची रचना २५ वर्षांत झालेली नाही. त्यामुळेच शेतकरी आत्महत्या करत आहेत, अशी खंत ज्येष्ठ पत्रकार उदय निरगुडकर यांनी व्यक्त केली.‘चतुरंग प्रतिष्ठान’, डोंबिवली शाखेच्या ३१ व्या वर्धापन दिनानिमित्त मुक्तसंध्या या कार्यक्रमांतर्गत ‘बातमी अशी सापडते, दिसते, करता येते’ या विषयावर गप्पागोष्टीमय मुलाखतीचा कार्यक्रम रविवारी माधवाश्रम मंगल कार्यालयात झाला. या वेळी निरगुडकर बोलत होते. ‘लोकमत’चे कार्यकारी संपादक (डिजिटल) चंद्रशेखर कुलकर्णी यांनी त्यांच्याशी संवाद साधला.निरगुडकर म्हणाले, हवामान बदलत आहे, हमीभाव स्थिर नाही. धरण आहे तिथे पाट नाही, पाट आहे तिथे पाणी नाही, पाणी आहे तिथे बियाणे नाही. सोलापुरात तिसºयांदा पेरणीची वेळ आली आहे. शेतकरी आत्महत्या करत आहे. ते कमकुवत मनाचे आहेत, असे बोलले जाते. पण, त्यांना आशेचा एकतरी किरण दिसला पाहिजे. आज ११४ तालुक्यांत १० टक्के पाऊस नाही. अनेक तालुके ओस पडले आहेत. तेथील नागरिक कसे जगणार. खरीप हंगाम गेला. रब्बी हंगामाचे काही माहीत नाही. ५० ते ६० लोक शेतीवर अवलंबून आहेत. हा प्रश्न सामाजिक प्रतिष्ठेचा आहे. मराठा मोर्चाची शिस्त वाखाणण्याजोगी होती. या मोर्चाची मांडणी खोलवर आहे. एवढे आमदार, खासदार अशी मांडणी करता येणार नाही. एवढी सोपी मांडणी करू नका. यांची मांडणी खोलवर आहे.प्रत्येक समाजात काळानुसार बदल झाला पाहिजे. आता शेतकरी होणे, हे शाप आहे. शेतकरी दैन्यावस्थेत जगत असतात. इतके दारिद्रय मी कधी पाहिले नाही.शेतीला लागणाºया पायाभूत सोयीसुविधा जोपर्यंत आपण विकसित करत नाही, तोपर्यंत हा आक्रोश असाच येत राहणार आहे. यामागे अर्थकारण आहे. त्याला कोणताही जातीचा रंग आपण लावू नये, असे आवाहन त्यांनी केले.मराठा समाज हा लढवय्या आहे. ज्यांचे जीवन शेतीवर अवलंबून आहे. लाखालाखांचे मराठ्यांचे मोर्चे निघाले तशी इतर समाजांचीही संमेलने झाली. पाटीदारांची आंदोलने झाली, अशी अनेक उदाहरणे देता येतील. कारण, समाजाची अर्थरचना आणि समाजरचना बदलत गेली. शेतीचे तुकडे झाले आणि शेती अव्यवहार्य झाली, असे ते म्हणाले.तेच खरे रियल हिरोचित्रपटातील तारेतारका मला हीरो वाटत नाही. त्यापेक्षा उल्हासनगरमधील प्रांजल पाटील मला रिअल हीरो वाटतात. सैराट चित्रपटात जो मुलगा दाखवला आहे, त्याचे पुढे काय झाले, कोणाला माहीत नाही. पण, सागर रेड्डी नावाच्या मुलाबाबतीत अशीच घटना घडली होती. १८ वर्षांनंतर अनाथालयातून अनुदान मिळत नाही. म्हणून बाहेर पडावे लागते.महाराष्ट्रात १० हजार मुले अनाथाश्रमातून बाहेर पडतात. त्यांच्या पुढील भवितव्याचे काय? सागरला अनाथालयातून बाहेर पडल्यावर चांगली व्यक्ती मिळाली. त्याने इंजिनीअरचे शिक्षण घेतले. परदेशात जाण्याची संधी आली असूनही ती नाकारली. सागरने वयाच्या ३१ व्या वर्षी ४० मुलींचे कन्यादान केले. हे खरे रिअल हीरो आहेत, असे निरगुडकर यांनी नमूद केले.बातमीशी प्रामाणिक असावेवृत्तवाहिन्या बातम्या मनोरंजक करतात, असे आरोप केले जातात. पण, हा माध्यमांचा दोष नाही. प्रेक्षक हे पाहणे बंद करतील, त्या दिवशी वाहिन्या रंजकता बंद करतील. आपण बातमीशी प्रामाणिक असले पाहिजे.विरोधी पक्ष जेव्हा बातम्या उचलत नाही, तेव्हा ते काम आम्हाला करावे लागते. बातम्या करताना धमक्या येत असतात.मात्र, आपण त्यांची जाहिरात करायची नसते. हा या क्षेत्राचा साइड इफेक्ट आहे. ते सहन करण्याची शक्ती तुमच्याकडे पाहिजे. वृत्तवाहिन्या नागरिकांना आधार वाटतात, याकडे निरगुडकर यांनी लक्ष वेधले.