शहरं
Join us  
Trending Stories
1
IND W vs PAK W "म्हारी छोरियां छोरो से कम है के.." हरमनप्रीत ब्रिगेडनंही पाकची जिरवली!
2
'अमेरिकेसोबत काही मुद्दे सोडवायला हवेत', ट्रेड डील आणि टॅरिफबाबत जयशंकर यांचे मोठे विधान
3
मुंबईतील राजकीय नेत्याच्या मुलाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार, शौचालयात गाठले आणि...
4
IND vs AUS : बढती मिळताच अय्यरनं टीम इंडियाला जिंकून दिली ट्रॉफी; घरच्या मैदानात कांगारुंची शिकार
5
गाझातील सत्ता सोडण्यास नकार दिल्यास हमासची धुळधाण उडवू, डोनाल्ट ट्रम्प यांची ताकिद 
6
नेपाळमध्ये हाहाकार... मुसळधार पावसाचा कहर! आतापर्यंत 51 जणांचा मृत्यू; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलं दुःख, म्हणाले - भारत...!
7
Muneeba Ali Controversial Run Out : हुज्जत घालून पाक क्रिकेटच्या इज्जतीचा फालुदा; असं काय घडलं?
8
हिमालयात दार्जिलिंगपासून माऊंट एव्हरेस्टपर्यंत विध्वंस, ६० हून अधिक मृत्यू, कारण काय?
9
IND vs AUS : ३०० पारच्या लढाईत अभिषेक-तिलकनं तलवार केली म्यान; वादळी शतकासह प्रभसिमरन सिंगची हवा
10
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
11
प्रवाशांनी भरलेली विरार ते पालघर रो-रो बोट जेट्टीवर अडकली; हायड्रॉलिक पाईप तुटल्याने मनस्ताप
12
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
13
’अमित शाह महाराष्ट्रात आले पण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत शब्दही बोलले नाहीत’, काँग्रेसची टीका   
14
Irani Cup 2025: नागपूरच्या मैदानात फुल्ल राडा! यश धुलला तंबूत धाडल्यावर ठाकूर त्याच्या अंगावर धावला (VIDEO)
15
ऑटो कंपनीची 'कमाल', गुंतवणूकदारांना केलं मालामाल...! 1 वर्षात पैसा डबल; सोमवारी दिसणार चमत्कार?
16
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
17
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
18
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
19
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 
20
सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार

असाही आदर्श, ६७ वर्षाच्या बळीराजाचा

By admin | Updated: September 25, 2015 02:04 IST

शहापूर गावाचे दिवसेंदिवस शहरीकरणात रुपांतर होत असताना परिसरातील गावातील शेती नजरेआड होत असताना चेरपोली पाड्यातील रमेश गणपत देशमुख (६८) हे आपल्या ७ एकर जागेत नानाविध

भातसानगर शहापूर गावाचे दिवसेंदिवस शहरीकरणात रुपांतर होत असताना परिसरातील गावातील शेती नजरेआड होत असताना चेरपोली पाड्यातील रमेश गणपत देशमुख (६८) हे आपल्या ७ एकर जागेत नानाविध पिकांबरोबर इतर जोडधंद्याचे व्यवसाय करीत असून हा हाडाचा शेतकरी खऱ्या कौतुकापासून वंचित राहिला आहे.आपल्या जमिनीत पावसाळी व उन्हाळी या दोन मोसमामध्ये कालव्याच्या पाण्याचा उपयोग करून पाच एकर जागेत तो भात श्ेती पिकवितो. उर्वरित दोन एकर जागेत राहते घर. घरीच डॉक्टरांच्या सल्ल््याने आणलेल्या १० संकरीत गायीपासून रोज ५० लीटर दूध शहापुरात ठरलेल्या उकडेवाल्यांना वर्षानुवर्ष देतो. तर मोकळ्या जागेत शेकडो गावठी कोंबड्यांचे बिनखर्ची उत्पादन घेतो. तसेच घराच्या पाठीमागे ३ हजार कोंबड्यांचा पोल्ट्री फार्म चालवतो.उर्वरीत जागेत आंबे, चिकू, नारळ, कढीपत्ता, गवतीचहा आदींचे मोठे उत्पादन प्रती वर्षी सुरु आहे. यापासून १ लाख रुपयांपर्यंतचे उत्पादन त्यांना मिळते.उन्हाळ्यात कालव्याच्या पाण्यावर झाडांमधील मोकळ्या जागेत कांदे, गहू, वाल, हरभरा, तूर याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. त्यामुळे महागड्या डाळी त्यांना विकत घ्याव्या लागत नाहीत. विशेष म्हणजे या उत्पादनासाठी त्यांनी कोणत्याही प्रकारचे कर्ज काढलेले नाही. केवळ पहाटे साडेचार ते रात्री उशिरापर्यंत ते वयाच्या ६८ व्या वर्षीही मेहनत घेतात. त्यांच्या या कष्टात आपल्या कुटुंबाचा मोठा असल्याचे ते सांगतात. खेड्या पाड्यात शेतीत आज मजा राहिली नाही किंवा ती फायद्याची नाही. ती परवडेनाशी झाली आहे असे म्हणणाऱ्यांच्या या आजोबांनी मात्र अंजन घातले आहे. मात्र, पंचायत समिती, जिल्हा परिषद,महाराष्ट्र शासन यांच्याकडून दिल्या जाणाऱ्या आदर्श शेतकरी या पुरस्कारापासून ते वंचितच राहिल्याची खंत सर्वत्र व्यक्त होत आहे.