शहरं
Join us  
Trending Stories
1
दबावापुढे झुकणार नाही, विद्यार्थ्यांचेच हित बघणार; आम्ही इगो न ठेवता जीआर रद्द केले; फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं
2
वेटिंग रेल्वे तिकीट कन्फर्म झाले का? आरक्षणाचा तक्ता आता चार नव्हे आठ तास आधी होणार तयार
3
एसटीच्या तिकिटाचे आरक्षण करणाऱ्या प्रवाशांना आजपासून मिळेल १५ टक्के सूट
4
मुंबई विमानतळाजवळील निर्धारित उंचीपेक्षा अधिक उंचीच्या इमारतींवर काय कारवाई केली?
5
रवींद्र चव्हाण भाजप प्रदेशाध्यक्षपदी, आज अधिवेशनात सूत्रे स्वीकारणार
6
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ५७,५०९ कोटींच्या पुरवणी मागण्या
7
उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या कार्यालयाला जागा मिळेना, विधानभवनात दालन आहे, पण कार्यालय मात्र नाही
8
एकनाथ शिंदे यांच्यावर पुन्हा विश्वास; पक्षनेतेपदी फेरनिवड, आगामी निवडणुकीचे सर्वाधिकार शिंदेंकडेच
9
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले हीच सर्वांत मोठी उपलब्धी, महायुतीची सत्ता आली: चंद्रशेखर बावनकुळे
10
जून महिन्यात मुंबईने दिला १ हजार कोटींचा महसूल; मुंबईत एक महिन्यात झाली ११,५२१ मालमत्तांची नोंदणी
11
शेफाली जरीवाला मृत्यू प्रकरणी पोलिसांकडून १४ जणांचे जबाब
12
कल्याण आरटीओचा अजब कारभार, स्टॅंडऐवजी दरपत्रक साेशल मीडियावर
13
ऑपरेशन सिंदूरवेळी पाकिस्तानचा प्रत्येक वार ज्यानं हाणून पाडला, आता ते शस्त्र खरेदीसाठी हा मोठा देशही आतूरलेला, करणार 'बिग डील'!
14
राजा रघुवंशीच्या हत्येनंतर, पर्यटकांसाठी नवा नियम; मेघालयात जाणाऱ्यांसाठी आता 'ही' एक गोष्ट असणार अनिवार्य!
15
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
16
कोल्हापुरातील वराच्या फिर्यादीवरून जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल
17
प्रेयसी मुलासोबत लाॅजमधून बाहेर येताना दिसली, प्रियकराने संपवले जीवन
18
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
19
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
20
कुटुंबियांना फोन करून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचला व्यावसायिकाचा जीव

असाही आदर्श, ६७ वर्षाच्या बळीराजाचा

By admin | Updated: September 25, 2015 02:04 IST

शहापूर गावाचे दिवसेंदिवस शहरीकरणात रुपांतर होत असताना परिसरातील गावातील शेती नजरेआड होत असताना चेरपोली पाड्यातील रमेश गणपत देशमुख (६८) हे आपल्या ७ एकर जागेत नानाविध

भातसानगर शहापूर गावाचे दिवसेंदिवस शहरीकरणात रुपांतर होत असताना परिसरातील गावातील शेती नजरेआड होत असताना चेरपोली पाड्यातील रमेश गणपत देशमुख (६८) हे आपल्या ७ एकर जागेत नानाविध पिकांबरोबर इतर जोडधंद्याचे व्यवसाय करीत असून हा हाडाचा शेतकरी खऱ्या कौतुकापासून वंचित राहिला आहे.आपल्या जमिनीत पावसाळी व उन्हाळी या दोन मोसमामध्ये कालव्याच्या पाण्याचा उपयोग करून पाच एकर जागेत तो भात श्ेती पिकवितो. उर्वरित दोन एकर जागेत राहते घर. घरीच डॉक्टरांच्या सल्ल््याने आणलेल्या १० संकरीत गायीपासून रोज ५० लीटर दूध शहापुरात ठरलेल्या उकडेवाल्यांना वर्षानुवर्ष देतो. तर मोकळ्या जागेत शेकडो गावठी कोंबड्यांचे बिनखर्ची उत्पादन घेतो. तसेच घराच्या पाठीमागे ३ हजार कोंबड्यांचा पोल्ट्री फार्म चालवतो.उर्वरीत जागेत आंबे, चिकू, नारळ, कढीपत्ता, गवतीचहा आदींचे मोठे उत्पादन प्रती वर्षी सुरु आहे. यापासून १ लाख रुपयांपर्यंतचे उत्पादन त्यांना मिळते.उन्हाळ्यात कालव्याच्या पाण्यावर झाडांमधील मोकळ्या जागेत कांदे, गहू, वाल, हरभरा, तूर याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. त्यामुळे महागड्या डाळी त्यांना विकत घ्याव्या लागत नाहीत. विशेष म्हणजे या उत्पादनासाठी त्यांनी कोणत्याही प्रकारचे कर्ज काढलेले नाही. केवळ पहाटे साडेचार ते रात्री उशिरापर्यंत ते वयाच्या ६८ व्या वर्षीही मेहनत घेतात. त्यांच्या या कष्टात आपल्या कुटुंबाचा मोठा असल्याचे ते सांगतात. खेड्या पाड्यात शेतीत आज मजा राहिली नाही किंवा ती फायद्याची नाही. ती परवडेनाशी झाली आहे असे म्हणणाऱ्यांच्या या आजोबांनी मात्र अंजन घातले आहे. मात्र, पंचायत समिती, जिल्हा परिषद,महाराष्ट्र शासन यांच्याकडून दिल्या जाणाऱ्या आदर्श शेतकरी या पुरस्कारापासून ते वंचितच राहिल्याची खंत सर्वत्र व्यक्त होत आहे.